शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गावकारभारी निवडण्यासाठी जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:20 IST

पालघर-वसईत ८१ टक्के मतदान : अटी-नियम पाळत लावल्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर/पारोळ : पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये गावचा कारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला. पालघर तालुक्यातील एक आणि वसई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी एकूण ८१.४५ टक्के मतदारांनी शुक्रवारी आपला मतदानाचा हक्क बजावला. कोरोनासंदर्भातले नियम व अटींचे पालन करीत शांततेत मतदान पार पडले.पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीसाठी ८९.३८ टक्के मतदान झाले. वसई तालुक्यातील पाली येथे ८३.१५ टक्के तर सत्पाळा येथे ७९.३३ टक्के मतदान झाले. या तीनही ग्रामपंचायतींतील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत होते. कोरोनाकाळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केली होती. यात पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश होता. पालघरमधील सागावे आणि वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी प्रशासन पूर्ण सज्ज होते. दरम्यान, वसईतील दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये १५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. ३५ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे. या दोन्ही ठिकाणी मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी उत्साह होता. 

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना ही निवडणूक होत असल्याने निवडणूक आयोगाने विशेष काळजी घेतली होती. मास्क असल्याने मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर याबाबतची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्रावर हात धुण्याची सोयही करण्यात आली हाती, तर सॅनिटायझरही ठेवण्यात आले होते. तर मतदान करताना प्रत्येक मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. मतदान करताना मतदान केंद्रावर प्रथमच व्यवस्था असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.ग्रामपंचायत निवडणूक ही वर्षातील पहिली व यापुढे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक व वसई विरार शहर महापालिका निवडणूक यांची नांदी असल्याने सर्व राजकीय पक्षांनी आपली या निवडणुकीत बाजी लावली आहे. सत्पाळ्यात बहुजन विकास आघाडी, शिवसेना, भाजप यांच्यात लढत असून, पालीमध्ये महाविकास आघाडी व बहुजन विकास आघाडी यांच्या पुरस्कृत उमेदवारांमध्ये लढत होत आहे. या सर्व उमेदवारांच्या आशा, निराशा मतपेटीत बंद झाल्याने आता तालुक्याचे लक्ष १८ तारखेला होणाऱ्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.

 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार