शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

झडपोली येथे शेतकरी मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:30 IST

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था : शाश्वत, सेंद्रीय शेती करण्याचे आवाहन

विक्रमगड : भावनादेवी भगवान सांबरे स्कूल झडपोली, विक्र मगड येथे भव्य शेतकरी मेळावाचे आयोजन करण्यात आले होते त्याला पालघर-ठाणे जिल्ह्यातील सुमारे ५५०० हून अधिक शेतकरी बंधू-भगिनी उपस्थिती होते . या शेतकरी मेळाव्यात यौगिक सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच शेतीवर अवलंबून उद्योग शेतकऱ्यांना केले पाहिजे असे आवाहन यावेळी करण्यात आले .

शाश्वत शेती व गट समूह शेती या भागात करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या ग्रामीण भागात लघु उद्योगमुळे रोजगार निर्मिती होणार आहे यासाठी शेतीतून एक ब्रँड तयार करा तरच मार्केट उपलब्ध होईल. आज मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर केला जात आहे त्यामुळे चविष्ट अन्न मिळत नसून आपले आरोग्य व जमिनीचे आरोग्य बिघडविण्याचे काम सध्या सुरू आहे या साठी सेंद्रिय खताने शेती करण्याची गरज असल्याची माहिती गोवर्धन इको व्हिलेज चे प्रभु मदनमोहन दास यांना दिली भारत शेती प्रधान देश आहे त्यामुळे शेती करणे आवश्यक आहे व शेती करतांनाही शाश्वत शेती करून उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती करा असे प्रतिपादन या मेळाव्यात करण्यात आले. तसेच शेतीला पूरक व्यवसाय होणे गरजेचे आहे शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले व तिला पूरक उद्योगाची जोड दिली तर चांगले उत्पन्न मिळू शकते. या दृष्टीकोनातून शेतकºयांनी या पुरक उद्योगांकडे बघावे अशी सूचना करण्यात आली या मेळाव्यात शेतकी गृहोद्योगाच्या उत्पादनाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या कार्यक्र मास प्रशांत नारनवरे (जिल्हाधिकारी पालघर), मिलींद बोरीकर (मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर), काशीनाथ तरकसे (जिल्हा कृषी अधिक्षक पालघर), प्रशांत कांबळे (उपआयुक्त जिल्हा पशुसंवर्धन पालघर), डॉ अजित हिरवे (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी), ब्रम्हकुमार राजूभाईजी (राष्टÑीय संयोजक ग्रामविकास प्रभाग, माऊंट अबू, राजस्थान) मदनमोहन दास (ग्रामीण विकास प्रमुख गोवर्धन इको व्हिलेज गालतरे) डॉ सनतकुमार दास प्रभुजी (अध्यक्ष गोवर्धन इको व्हिलेज गालतरे), डॉ हेमंत सवरा, मधुकर खुताडे (सभापती) तसेंच आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यात बोलतांनाजिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी शेतकाºयांसाठीच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन दिल तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी पालघर मिलिंद बोरीकर यांनी शेतकºयांना शेती व तंत्रज्ञान याविषयी माहिती दिली.

दोन्ही मान्यवरांनी जिजाऊ शैक्षणकि व सामाजिक संस्था संस्थापक निलेशजी भगवान सांबरे राबवत असलेल्या सामाजिक उपक्र मांच कौतुक करून पुढील कार्यात जिल्हा प्रशासन या सामाजिक कार्यात सर्व सहकार्य करेल अस आश्वासन दिलं. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी