शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

ग्रामीण भागात गवतविक्रीतून मिळतो रोजगार; सगळा नफा व्यापाऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:15 IST

कामगार व जमीनमालक मात्र लाभापासून वंचित

विक्रमगड : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या गवत विक्रीच्या रूपाने रोजगार लाभला आहे. विक्रमगड तालुक्यातील खेडो-पाडी गणपती सणानंतर गवत खरेदी विक्रीचा व्यवसाय तेजीत सुरू झाला आहे.

रोजगारासाठी या भागातील मजुरांना वणवण भटकावे लागते. रोजगार नसल्याने कधी कधी मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा पर्याय अनेकांना निवडावा लागतो. पावसाळ्यात खेडो-पाडी रोजगाराचा आधार असलेली महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे काहीअंशी बंद आहेत. या पावसाळ्याच्या चार महिन्यात माळरानावर, जंगलात नैसर्गिक उगवणारे गवत विकून मजुरांना थोडा फार रोजगार उपलब्ध होतो आहे. भाद्रपद महिन्यात गौरी-गणपती आणि नंतर पुढे दसरा-दिवाळी हे सण येत असल्याने सर्वांनाच पैशांची चणचण भासत असते. या सर्व संकटांवर मात करुन सोन्याचे दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय तंगीत सापडलेल्या मजुरांसाठी मोठा आधार आहे. तालुक्यातील डोंगर-माळरानावर, जंगलात उगवणारे गवताचे भारे बांधून विकण्याचा व्यवसाय सध्या तालुक्यात विक्रमगड तालुक्यातील दादडे, केव, महासरोली, साखरा, उपराले, येथे तो सुरू झाला आहे.

तंगीच्या काळात गवतातून रोजगारया व्यवसायात गवताच्या लहान ४ जुड्यांची १ धडी व प्रत्येक धडीला ५ ते ६ रु पये गवत कापणाºयास तर जागा मालकास ६ रूपये मिळतात. मजुरांना या गवत कापणीच्या दिवसभरातून १२० ते १५० रूपये मिळतात तर जागा असलेल्या मालकाला क्विंटल मागे केवळ ९० ते १०० रूपये मिळतात. तर तेच व्यापाऱ्यांना विक्री केल्यावर क्विंटलमागे अंदाजे ५०० ते ७०० रूपये मिळतात. त्यामुळे या व्यवसायात व्यापाºयाचाच फायदा जास्त असल्याचे शेतकºयांकडून बोलले जात आसून सध्याचा काळात गवताने भरलेले ट्रकचे ट्रक मुंबईच्या दिशेने जाताना पहावयास मिळत आहेत. खरेदी केलेल्या गवताला मुंबई, वसई, विरार, नालासोपारा, बोरिवली, भिवंडी येथील तबेल्यांमध्ये मोठी मागणी असल्याने हा व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत आहे. सणाच्या दिवसात औषधोपचार व आठवडा बाजारासाठी, मुलांचा शिक्षणासाठी गवत विक्र ीचा व्यवसाय मजुरांना आधार बनला आहे.