आठ तासांचे भारनियमन

By Admin | Updated: May 29, 2014 23:54 IST2014-05-29T23:45:37+5:302014-05-29T23:54:42+5:30

विक्रमगड तालुक्यातील शहरासह बर्‍याच भागात वीज मंडळाचा फारच गोंधळ उडत आहे. ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे दिवसातून तीन वेळेत बेफिकीर भारनियमन होत आहे.

Eight hours load regulation | आठ तासांचे भारनियमन

आठ तासांचे भारनियमन

तलवाडा : विक्रमगड तालुक्यातील शहरासह बर्‍याच भागात वीज मंडळाचा फारच गोंधळ उडत आहे. ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे दिवसातून तीन वेळेत बेफिकीर भारनियमन होत आहे. विक्रमगड तालुक्यात तीनवेळेस साडेआठ तासांचे सक्तीचे त्रासदायक भारनियमन चालू असतानाही वीज ग्राहकांचा अंतच पाहात असून रोज एवढे भारनियमन करुन देखील शुक्रवारी दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल साडेबारा तास भारनियमन केल्यामुळे येथील व्यवसाय ठप्प झाले आहेत. शेती व्यवसायालाही या भारनियमनामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, सोबतच या भारनियमनचा फटका आरोग्य सेवेलाही बसला असून येथील एक्सरेमशिन व विजेवर चालणारी अनेक यंत्रे बंद असल्याने त्याचा रुग्णांनाही त्रास होत आहे. अगोदरच कमी विजेच्या दाबामुळे अनेक इलेक्ट्रीक यंत्रे निट चालत नाहीत व साडेआठ तासांचे भारनियमन व त्यात शुक्रवारी पूर्ण दिवस वीज नसल्याने सर्वच व्यवहार ठप्प होत असल्याने येथील जनता या महावितरणच्या या बेफिकीर भारनियमनाला पुरती कंटाळलेली असून नाराजी व्यक्त करीत आहे़ महाराष्ट्र शासनाने संपुर्ण महाराश्ट् भारनियमन मुक्त करण्याचे आष्वासन दिले होते तर मग हे आष्वासन आहे कुठे असा सवाल विज ग्राहक विचारीत आहेत़या भारनियमनामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत असुन अनेक व्यापार बंद पडण्याच्या मार्गावर आहे, तर अनेकांचे व्यवसाय बंद पडल्याने उपासमारी ओढवली आहे.

Web Title: Eight hours load regulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.