शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भूकंपाने पुन्हा हादरली तलासरी परिसरातील घरे; नागरिकांत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 00:25 IST

तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला.

तलासरी : तलासरी - डहाणू परिसरात मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे पहाटे साखर झोपेत असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली. अनेक जणांनी घराबाहेर धाव घेतली. अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांची कारणमीमांसा शोधण्यास मात्र सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे.मंगळवारी सकाळी बसलेला धक्का जोरदार होता. त्याची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली. मात्र, धक्क्यांची तीव्रता बघता झालेल्या नोंदीबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे. भूकंपाच्या या जोरदार धक्क्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे महसूल विभागाने सांगितले.नियमति बसणाऱ्या या धक्क्यांनी लोकांच्या मनात स्थलांतराचा विचार डोकावतो आहे. पण उपाय योजना करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होते आहे. घरे, शाळा, अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत. या धोकादायक घरात राहणे म्हणजे जीव धोक्यात घालणे आहे.सरकारी यंत्रणेकडून मिळणारी मदत तुटपुंजी आहे, तडे गेलेल्या घरांना अवघे सहा हजार रुपये दिले जातात. हे म्हणजे आपत्तीग्रस्त लोकांच्य जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.शाळा, अंगणवाड्यांना महसूल कडून तंबूसाठी पुरविलेल्या ताडपत्र्या अडगळीत पडून वा गायब झाल्या आहेत. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांच्याकडून अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :Earthquakeभूकंपpalgharपालघर