शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

ई-पुस्तके ही आजच्या काळाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 06:13 IST

प्रत्येकाने व्यक्त होणे गरजेचे; पुरु षप्रधान संस्कृतीची पकड कायम

ठाणे : ई-पुस्तके ही आजच्या काळाची गरज असून त्यामुळे जगभरातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत आपले लिखाण पोहोचवता येते. त्यामुळे आजच्या प्रकाशन संस्थांनीही त्याकडे सकारात्मकपणे पाहावे, असा सल्ला विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माजी अध्यक्षा, ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया वाड यांनी दिला. आज प्रत्येकाने व्यक्त होणे फार गरजेचे आहे. अव्यक्त राहून आपण मनात बऱ्याच आढ्या घेऊन जगतो आणि त्याचा आपल्यालाच त्रास होतो, असेही त्या म्हणाल्या.

शारदा प्रकाशनतर्फे मराठी ग्रंथसंग्रहालय येथे कवयित्री प्रज्ञा पंडित यांचे ‘व्यक्त अव्यक्त’ आणि ‘काव्य लिपी’ हे काव्यसंग्रह, कवी चारुदत्त मुंढे यांचा ‘इंद्रधनुष्य’ हा काव्यसंग्रह आणि लेखिका शकुंतला चौधरी लिखित ‘आली वादळे तरीही’ या कादंबरीचे प्रकाशन डॉ. वाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या म्हणाल्या, एकविसाव्या शतकातही पुरु षप्रधान संस्कृतीने स्वत:ची पकड ढिली होऊ दिलेली नाही. आजही अनेक स्त्रियांचे चूल, मूल आणि संसाराचा गाडा हाकण्यात उभे आयुष्य खर्च होते. या सर्व जबाबदाºया सांभाळून स्त्रियांनी जिथे जसे जमेल तसे स्वत:ला व्यक्त करण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

प्रमुख पाहुण्या डॉ. शारदा निवाते म्हणाल्या की, आजची स्त्री ही माघार घेताना दिसत नाही. घडणाºया प्रत्येक घटनेवर, समाजातल्या रूढी-परंपरांवर ती व्यक्त होते आणि गरज पडल्यास लढतेही. ही खरेच स्वागतार्ह गोष्ट आहे. कवीला कोणताही विषय वर्ज्य वाटत नाही किंबहुना आजूबाजूला घडणारी प्रत्येक संवेदनशील घटना कवीच्या जीवाला चटका लावून जाते आणि त्यातूनच कविता जन्माला येते. या सोहळ्यात कवी समाधान मोरे यांना ‘विश्वविजय’ या काव्यसंग्रहासाठी आणि कवी नवनाथ रणखांबे यांना ‘जीवनसंघर्ष’ या काव्यसंग्रहासाठी साहित्यसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

काव्यलेखन स्पर्धेचा निकाल : आॅल इंडिया पोएट्री असोसिएशन आणि तेजस्वी अ‍ॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेत कवी काळुदास कनोजे आणि सचिन गुप्ता हे उत्तेजनार्थ पुरस्काराचे मानकरी ठरले, तर कवयित्री सुलभा वासुदेव ढोके-जुवाटकर, शिल्पा नायर आणि किशोरी शंकर पाटील यांना अनुक्र मे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्र मांकाची पारितोषिके मिळाली. कार्यक्र माचे निवेदन कवी मनीष पंडित यांनी केले.

टॅग्स :Studentविद्यार्थीonlineऑनलाइन