शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

अतिवृष्टीमुळे उद्या वसई विरार शहराला पाणी पुरवठा अनियमित व कमी प्रमाणात राहणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:35 PM

Vasai Virar water supply: नागरिकांनी सहकार्य करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : मागील चार दिवस व पुन्हा दोन दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या अतिवृष्टी वादळी वाऱ्यामुळे वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मासवण पंपिंग स्टेशन व धुकंटन फिल्टर प्लांट मधील वीज खंडित असल्याने शहराला पाणी पुरवठा बुधवारी करता आला नाही 

याउलट उद्या दि 22 जुलै रोजी ही जिल्ह्यात पावसाची स्थिती अशीच राहिल्यास वसई विरार ला पाणी पुरवठा हा अनियमित व कमी प्रमाणात केला जाणार असल्याची माहिती वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्याने लोकमत ला दिली. तसेच पुढील दोन दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखिल पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे 

या संदर्भात अधिक माहिती देताना वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या पालघर तालुक्यातील मासवण पंपिंग स्टेशन  व धुकटन फिल्टर प्लांट येथे बुधवार दि 21 जुलै राजी सकाळपासूनच जोरदार वारा, वादळ,वीज गराडा सह अतिवृष्टी होत असल्याने येथील मासवण पंपिंग स्टेशन व  धुकटन फिल्टर प्लांट भागांतील म.रा.वि.म.(MSEB) चा विद्युत पुरवठा हा दिवसभर विविध वेळेत खंडित होत होता

यात तो बुधवारी सर्वप्रथम सकाळी 07:05  ते सकाळी 07:15 ,सकाळी 07:45 am ते सकाळी 08:00 , तसेच पुन्हा संध्या 06:10pm ते संध्या.06:25pm , संध्या  07:00pm ते संध्या 07:45pm, आणि थेट रात्री 08:35pm ते रात्रीचे 11:00pm  झाले तरिही हा  विद्युत पुरवठा चालू झाला नाही,असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले

दरम्यान बुधवारी दिवसभर वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्यामूळे शहरात बुधवार दि 21 जुलै व  उद्या गुरुवार दि 22 जुलै रोजी होणारा पाणी पुरवठा अनियमित व  कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे अशी ही विनंती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणी