शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

फटाक्यांमुळे वसईतील दोन कंपन्यांना भीषण आग, दोन्ही कंपन्या भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 18:08 IST

या आगीत पुठ्ठ्याचे गोदाम जळून खाक झालं आहे. गोदामात कागदी सामान असल्याने आगीने पेट घेतला आणि पुठ्ठ्यांचे गोदाम भस्मसात झाले आहे.

वसई - ऐन दिवाळीत वसईतील महामार्गावरील दोन कंपन्यांना भीषण आग लागली. या आगीत एक पुठ्ठ्याची आणि एक रसायनांची कंपनी जळून भस्मसात झाली. या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नाही. फटाक्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई फाटा येथील रिचर्ड कंपाऊंडमध्ये अनेक औदयोगिक कंपन्या आहेत. बुधवाारी दुपारी बाराच्या सुमारास पुठ्ठा कंपनीला अचानक आग लागली. त्यापाठोपाठ त्याच्या शेजारी असलेल्या रसायनाच्या कंपनीने पेट घेतला. याबाबतची माहिती स्थानिकांनी अग्निशमन शमन दलाला दिली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पाण्याच्या पाच बंबासह घटनास्थळी दाखल झाले. औषधांच्या कंपन्यांमध्ये रसायन असल्याने आग विजविण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा येत होता. मात्र, तरीही अवघ्या दीड तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाल यश आले.  या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. कंपन्यांमधील असलेले भंगार , औषधे, पुठ्ठे , रब्बर, प्लास्टिक आदी वस्तू जळून खाक झाल्या. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfireआग