शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

कुडूस नाक्यावरील वाहतूककोंडीने चालक त्रस्त; नागरिकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:20 IST

दर शुक्रवारी आठवडा बाजारातील प्रकार

वाडा : भिवंडी-वाडा महामार्गावरील कुडूस नाका येथे दुचाकी, चारचाकी वाहनचालक रस्त्यावरच गाड्या अस्ताव्यस्त लावत असल्याने व विशेषत: शुक्र वारी आठवडा बाजाराच्या दिवशी हे होत असल्याने येथे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. इतर वेळी हा रस्ता पार करायला पाच मिनिटांचाही कालावधी लागत नाही, मात्र आठवडे बाजाराच्या दिवशी जवळपास अर्धा-पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कुडूस ही तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असून मध्यवर्ती केंद्र आहे. आजूबाजूच्या परिसरातील ५२ गावांची ही मुख्य बाजारपेठ आहे. तसेच उद्योगधंद्यासाठी आलेले परप्रांतीय कामगार या परिसरात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून ते बाजारहाट करण्यासाठी येथे येत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून येथे आठवडा बाजार भरत असून या बाजारात खरेदी करण्यासाठी हजारो ग्राहक येत असतात.

बाजारहाट करण्यासाठी आलेले ग्राहक आपली दुचाकी, चारचाकी अशी वाहने ही नाक्यावरच अस्ताव्यस्त लावून बाजारात खरेदी करण्यासाठी जात असतात. त्यामुळे कुडूस नाका येथे शुक्र वारची वाहतूक कोंडी ही नेहमीची होऊन बसली आहे. नेहमीच्या कोंडीने नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे एरव्ही नाका पार करायला पाच मिनिटेही लागत नसताना कोंडीच्या काळात अर्धा तास लागत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. येथे वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसVasai Virarवसई विरारPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र