शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ डॉक्टरवर कारवाईसाठी दोन तास गराडा, सिव्हील सर्जनवर प्रश्नांची सरबत्ती, श्वानदंश झालेल्या मुलाला रुग्णवाहिका न दिल्याने मृत्यू झाल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 06:03 IST

पालघर येथील दिलखुश दिलीप मंडल (९) या श्वानदंश झालेल्या मुलाला अत्यवस्थ असतांना उपचारासाठी मुंबईला हलवतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाकारणा-या डॉ. राजेश राय यांच्यामुळे वेळीच उपचारा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पालघर  -  येथील दिलखुश दिलीप मंडल (९) या श्वानदंश झालेल्या मुलाला अत्यवस्थ असतांना उपचारासाठी मुंबईला हलवतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाकारणाºया डॉ. राजेश राय यांच्यामुळे वेळीच उपचारा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ह्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी करीत जिल्हा शल्य चिकित्सकांना त्यांच्या कार्यालयातच दोन तासभर गराडा घातला होता.पालघर कोर्टा समोरील ओस्तवाल ड्रीमसीटी मध्ये एक किराणा दुकान चालविणारा दिलीप मंडल हा आपली पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली सह रहात होता. दिलखुश हा पालघरच्या आर्यन एज्युकेशन शाळेत शिकत होता. त्याला २७ डिसेंबर ला एका कुत्र्याने चावा घेतल्या नंतर त्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात आणण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी त्याला तपासून एक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिले आणि अन्य दोन इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात पुन्हा आणण्या बाबत सूचना केल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्याला दुसरेही इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर तिसºया इंजेक्शन देण्याच्या तारखे आधी दिलखुशमध्ये रेबीज झाल्याची (हायड्रोफोबिया) ची लक्षणे दिसत असल्याने तात्काळ मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १०८ नंबरच्या रु ग्ण वाहिकेला फोन केला. त्या रु ग्णवाहिकेत उपस्थित असलेल्या डॉ. राजेश राय ह्यांनी कुत्रा चावलेल्या रुग्णासाठी ही रु ग्णवाहिका देता येणार नाही असे सांगितले. परंतु माझ्या मुलाला मुंबईच्या रु ग्णालयात तात्काळ दाखल केले नाही तर उपचारा अभावी त्याचा मृत्यू होऊ शकतो अशी विनवणी मृत मुलाच्या वडिलांनी करूनही डॉ. रॉय ह्यांना पाझर फुटला नाही. शेवटी त्यांनी खाजगी रु ग्णवाहिकेतुन त्यांनी गुजरात मधील वलसाड येथील रुग्णालय गाठले. मात्र, अधिक काळ योग्य उपचारा अभावी त्याला रहावे लागल्याने त्याला मृत्यूने गाठले. डॉ.रॉय ह्यांनी तात्काळ १०८ रु ग्णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर माझ्या मुलाचे प्राण वाचू शकले असते अशी प्रतिक्रि या त्याचे दिलीप मंडल ह्यांनी दिली. त्या मुलास तात्काळ उपचार मिळवून देण्याचा कामात हलगर्जी पणा केल्याचा आरोप करीत डॉ. राय, रु ग्णवाहिकेचा चालक व ग्रामीण रु ग्णालयातील इतर कर्मचाºयां विरोधात निलंबनाची व फौजदारी गुन्ह्याची कारवाई साठी मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे ह्यांच्या कार्यालयात शिरून त्यांना गराडा घातला.ट्रॉमा सेंटरच्या घोषणेला झाली ३ वर्षेपालघर जिल्हा निर्मितीला ३ वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतर ही आज जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या योग्य सोई-सुविधा मिळत नसल्याने त्यांना नाईलाजाने गुजरात, सिल्वासा येथील रु ग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो. ही प्रशासन आणि इथल्या लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत लांच्छनास्पद बाब असल्याची ओरड जिल्ह्यात होऊ लागली आहे.ट्रॉमा सेंटर, जिल्हारु ग्णालय उभारायच्या घोषणेला दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतर अजून त्याची एक वीट ही रचली गेली नाही. त्यामुळे दिलखुश सारख्या किती मुलांचे निष्पाप बळी इथली निष्क्रिय व्यवस्थाघेणार आहे. असा थेट प्रश्न मृत मुलाचे नातेवाईक प्रशासनाला विचारीत होते. 

टॅग्स :doctorडॉक्टरVasai Virarवसई विरार