शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

‘त्या’ डॉक्टरवर कारवाईसाठी दोन तास गराडा, सिव्हील सर्जनवर प्रश्नांची सरबत्ती, श्वानदंश झालेल्या मुलाला रुग्णवाहिका न दिल्याने मृत्यू झाल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 06:03 IST

पालघर येथील दिलखुश दिलीप मंडल (९) या श्वानदंश झालेल्या मुलाला अत्यवस्थ असतांना उपचारासाठी मुंबईला हलवतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाकारणा-या डॉ. राजेश राय यांच्यामुळे वेळीच उपचारा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

पालघर  -  येथील दिलखुश दिलीप मंडल (९) या श्वानदंश झालेल्या मुलाला अत्यवस्थ असतांना उपचारासाठी मुंबईला हलवतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नाकारणाºया डॉ. राजेश राय यांच्यामुळे वेळीच उपचारा न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ह्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी करीत जिल्हा शल्य चिकित्सकांना त्यांच्या कार्यालयातच दोन तासभर गराडा घातला होता.पालघर कोर्टा समोरील ओस्तवाल ड्रीमसीटी मध्ये एक किराणा दुकान चालविणारा दिलीप मंडल हा आपली पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली सह रहात होता. दिलखुश हा पालघरच्या आर्यन एज्युकेशन शाळेत शिकत होता. त्याला २७ डिसेंबर ला एका कुत्र्याने चावा घेतल्या नंतर त्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात आणण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी त्याला तपासून एक रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिले आणि अन्य दोन इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात पुन्हा आणण्या बाबत सूचना केल्या होत्या. दरम्यानच्या काळात त्याला दुसरेही इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर तिसºया इंजेक्शन देण्याच्या तारखे आधी दिलखुशमध्ये रेबीज झाल्याची (हायड्रोफोबिया) ची लक्षणे दिसत असल्याने तात्काळ मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर १०८ नंबरच्या रु ग्ण वाहिकेला फोन केला. त्या रु ग्णवाहिकेत उपस्थित असलेल्या डॉ. राजेश राय ह्यांनी कुत्रा चावलेल्या रुग्णासाठी ही रु ग्णवाहिका देता येणार नाही असे सांगितले. परंतु माझ्या मुलाला मुंबईच्या रु ग्णालयात तात्काळ दाखल केले नाही तर उपचारा अभावी त्याचा मृत्यू होऊ शकतो अशी विनवणी मृत मुलाच्या वडिलांनी करूनही डॉ. रॉय ह्यांना पाझर फुटला नाही. शेवटी त्यांनी खाजगी रु ग्णवाहिकेतुन त्यांनी गुजरात मधील वलसाड येथील रुग्णालय गाठले. मात्र, अधिक काळ योग्य उपचारा अभावी त्याला रहावे लागल्याने त्याला मृत्यूने गाठले. डॉ.रॉय ह्यांनी तात्काळ १०८ रु ग्णवाहिका उपलब्ध करून दिली असती तर माझ्या मुलाचे प्राण वाचू शकले असते अशी प्रतिक्रि या त्याचे दिलीप मंडल ह्यांनी दिली. त्या मुलास तात्काळ उपचार मिळवून देण्याचा कामात हलगर्जी पणा केल्याचा आरोप करीत डॉ. राय, रु ग्णवाहिकेचा चालक व ग्रामीण रु ग्णालयातील इतर कर्मचाºयां विरोधात निलंबनाची व फौजदारी गुन्ह्याची कारवाई साठी मृतांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वानेरे ह्यांच्या कार्यालयात शिरून त्यांना गराडा घातला.ट्रॉमा सेंटरच्या घोषणेला झाली ३ वर्षेपालघर जिल्हा निर्मितीला ३ वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतर ही आज जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या योग्य सोई-सुविधा मिळत नसल्याने त्यांना नाईलाजाने गुजरात, सिल्वासा येथील रु ग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो. ही प्रशासन आणि इथल्या लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत लांच्छनास्पद बाब असल्याची ओरड जिल्ह्यात होऊ लागली आहे.ट्रॉमा सेंटर, जिल्हारु ग्णालय उभारायच्या घोषणेला दीड वर्षाचा कालावधी उलटून गेल्या नंतर अजून त्याची एक वीट ही रचली गेली नाही. त्यामुळे दिलखुश सारख्या किती मुलांचे निष्पाप बळी इथली निष्क्रिय व्यवस्थाघेणार आहे. असा थेट प्रश्न मृत मुलाचे नातेवाईक प्रशासनाला विचारीत होते. 

टॅग्स :doctorडॉक्टरVasai Virarवसई विरार