शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

वसई-विरार मेट्रोसाठी डी.एम.आर.सी. सल्लागार, ९ महिन्यात अहवाल येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:20 IST

घोडबंदर पूल ते वसई-विरार असा मार्ग : अंदाजित लांबी २४ किलोमीटर

वसई : वसई-विरार मेट्रो चालू करण्याबाबत विस्तार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉपोरेशन (डी.एम.आर.सी.) यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून काम प्रगतीपथावर आहे. हा अहवाल तयार करण्याकरिता सुमारे ९ महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून घोडबंदर पूल ते वसई-विरार असा मार्ग असून त्यांची अंदाजित लांबी २४ कि.मी. आहे, ही बाब आमदार ठाकूर व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रस्तावित व प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी दुपारी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महापौर, नेते मंडळी यांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार ठाकूर यांनी बापाणे ते नायगांव पश्चिम रस्ता आणि उड्डाणपूल या कामाबाबत रेल्वेच्या अधिकारी वर्गाला पूर्व-पश्चिम विभागाची कामे पूर्ण झाली असल्याचे सांगून आता उड्डाणपुलाचे काम बाकी असल्याचे स्पष्ट केले. याबाबतीतील चर्चेत रेल्वेच्या सर्व परवानगी प्राप्त झाल्याचे सांगून रेल्वला पावसाळ्यानंतर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या, तर पावसाळ्यानंतर काम सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे ही आश्वासन दिले.दरम्यान प्रस्तावित व विलंब होत असलेला वसई -भार्इंदर खाडीवरील पूल बांधणे हे काम १५०१ कोटी रुपयाचे असून त्याबाबत निविदा मागविण्यात आली असून अंतिम निविदा १ जुलै २०१९ पर्यंत मागविण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी अनेक परवानग्या प्राप्त झाल्या असून वनविभाग व मिठागर खात्याच्या परवानग्या प्रलंबीत आहेत. मात्र त्या परवानग्या मिळविण्याचे प्रयत्न प्राधिकरणामार्फत चालू आहेत.एकूणच चर्चेत झालेल्या सर्व प्रलंबित कामांबाबत सर्व परवानग्या मिळाल्यानंतर निविदा मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरु वात ही करण्यात येईल, असेही यावेळी अधिकाºयांनी सांगितले. नायगांव ते वैतरणा पूर्व पश्चिम रिंगरूट रस्त्याचे २६०० कोटी रुपयांचे प्रस्तावित काम राज्याचे मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आले असून यापैकी ११३६ कोटी रुपयाचे पश्चिमेकडील काम प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर प्राधान्याने करता येईल. याबरोबरच वसई-विरार शहरास भविष्यात होणारा १८५ एम.एल.डी. पाणीपुरवठा व वसई-विरार अलिबाग कॅरीडॉर या संबंधातही सविस्तर चर्चा झाली.आमदारांसोबत जम्बो शिष्टमंडळ : या चर्चेत सहभागी म्हणून बविआ अध्यक्ष तथा वसईचे आम.हितेंद्र ठाकूर यांच्या समवेत वसई-विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव, माजी महापौर नारायण मानकर, अजय खोखाणी, प्रफुल साने, रमेश कोटी, तर अधिकाºयांमध्ये स्वत: महानगर आयुक्त आर.ए.राजीव, अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी, अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे मूर्ती, डांगे असे अनेक वरिष्ठ अधिकारी हजर होते. यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMetroमेट्रो