शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर अखेर मीरा भाईंदर मध्ये दिव्यांग स्टॉलना परवाने मिळणार 

By धीरज परब | Updated: February 12, 2024 00:46 IST

मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलना परवाने देण्यास बंद केले होते.

मीरारोड - गेल्या अनेक वर्षां पासून दिव्यांगांसह गटई व दूध केंद्र स्टॉलना परवाने देण्यास चालढकल करणाऱ्या मीरा भाईंदर महापालिकेला दिव्यांग मंत्रालयाच्या उपक्रमाचे अध्यक्ष मंत्री दर्जा असलेले आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निर्देशा नंतर पालिकेने पहिल्या टप्प्यात दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. नंतर गटई व दूध केंद्र स्टॉलना परवाने दिले जाणार आहेत. 

मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात प्रशासनाने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलना परवाने देण्यास बंद केले होते. वास्तविक शासनाने पूर्वीच स्टॉल धोरण मंजूर केले असताना नव्याने धोरण करायचे सांगत चालढकल केली जात होती. तर पूर्वी दिलेल्या परवान्यांचे सुद्धा नूतनीकरण करण्यास टाळाटाळ चालली होती. या दरम्यान काही दिव्यांग, गटई कामगारांचे स्टॉल पालिकेने तोडले होते. 

न्यायालयाचे आदेश, शासन धोरण असून देखील दिव्यांग, गटई काम करणाऱ्यांना स्टॉल दिले जात नसल्या बद्दल पालिकेवर मोर्चे निघाले. आंदोलने झाली. अनेकवेळा मागण्या करण्यात आल्या. गेल्या काही काळापासून बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलने, मागण्या व बैठका पालिकेत झाल्या. दुसरीकडे शहरात सर्रास नव्याने बेकायदा स्टॉल उभारले जात असताना महापालिका मात्र बघ्याच्या भूमिकेत होती. काहींनी तर बोगस परवाने केल्याचे आरोप झाले. नंतर पालिकेने काही प्रमाणात कारवाई केली. मध्यंतरी पालिकेने शहरातील स्टॉलचे सर्वेक्षण केले असता २६८  परवानगी दिलेले स्टॉल व्यतिरिक्त सुमारे २०० च्या आसपास अनधिकृत स्टॉल आढळून आले. 

एकीकडे जुन्या स्टॉलचे परवाने नूतनीकरण नाही, नवीन स्टॉल ना परवाने बंद त्यात बेकायदा स्टॉलचा सुळसुळाट झाल्याने नाराजी व संताप व्यक्त होऊ लागला. प्रहार जनशक्ती पक्षाने दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्यासाठी आंदोलने केली. त्या नंतर देखील पालिका निर्णय घेत नव्हती. अखेर बच्चू कडू यांनी निर्देश दिल्या नंतर पालिकेने आता पहिल्या टप्प्यात दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. 

पालिकेने दिव्यांग, गटई व दूध स्टॉलसाठी धोरण ठरवून तसा प्रशासकीय ठराव केला आहे. त्या नंतर दिव्यांगांना स्टॉल परवाने देण्यासाठी अर्ज मागवले आहेत. पूर्वीच्या परवानगी मध्ये १०७ दिव्यांगांचे स्टॉल आहेत. आणखी सुमारे ४३ स्टॉल दिले जाण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. नंतरच्या टप्प्यात गटई काम व दूध विक्री केंद्र स्टॉलना परवाने दिले जाणार आहेत. त्याच बरोबर आधीच्या परवान्यांचा आढावा पालिका घेणार आहे. 

गेल्या अनेक वर्षां पासून बंद असलेले स्टॉल परवाने पुन्हा मिळणार असल्याने बच्चू कडू यांच्या सह पालिकेचे आभार दिव्यांगांसह गटई काम, दूध स्टॉल मागणाऱ्यांनी मानले आहेत.  

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूMira Bhayanderमीरा-भाईंदर