शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात प्रयोगशील शेतीतून शोधली विकासवाट; शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 01:07 IST

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड, आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला

अनिरुद्ध पाटील

बोर्डी : पालघर जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीआधारित आहे. त्यामुळे जिल्हा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठ यांनी एकत्रितपणे प्रयोगशील उपक्रम राबवून जिल्ह्याच्या कृषीविकासाची वाट समृद्ध केली आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत अवलंबली जात असून पारंपरिक भात शेती, भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत, मत्स्यपालन अशा उपक्रमांमुळे कृषीआधारित रोजगार निर्माण होऊ न बेरोजगारीचा बराच प्रश्न सुटला आहे.

डहाणू येथे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फेविविध उपक्र म राबवले जातात. मागील वर्षभरात जव्हार, मोखाडा यांसारख्या दुर्गम भागात कर्जत-७, कर्जत-९ या भाताच्या सुधारित जातींची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामुळे भाताच्या उत्पादनात ३२ टक्के तर नागली, वरी या सुधारित जातींच्या उत्पादनात ४१ टक्के वृद्धी झाली. गळीत धान्यपिकांमध्ये खुरासणी पिकाच्या फुले कारळा या जातीचे उत्पादन स्थानिक जातीच्या तुलनेत ५८ टक्के अधिक आढळले.

शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात पारंपरिक भात शेतीसह भाजीपाला, फुलशेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळझाडे लागवड, रोपवाटिका, गांडूळखत या घटकांचा समावेश केला आहे. तसेच सेंद्रिय पद्धतीबाबतही मार्गदर्शन केले. चिकू, नारळ, केळी आदी फळपिकांवरील कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रात्यक्षिके घेतली. तसेच शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढण्यास भाडेतत्त्वावर अवजारे उपलब्ध झाल्याने श्रम, वेळ व पैसा वाचण्यास मदत झाली आहे.

आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी पोषण आधारित शेतीपद्धती उपक्र म यशस्वी ठरला. जिल्ह्यात कृषि विज्ञान मंडळ, तालुका स्तरावर शेतकरी शास्त्रज्ञ मंच आणि ग्रामपातळीवर महिला मंडळ, शेतकरी मंडळ यांच्यामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. प्रकल्प संचालक आत्मा योजनेतून राबवलेला चारा पीक, मोगरा पिकाच्या लागवडीच्या प्रशिक्षणाचा जिल्हयातील २०० शेतकºयांना फायदा झाला. गेल्या वर्षी ८२ महिला बचतगट तयार करून महिला सबलीकरणासाठी शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले. मधमाशी पालन प्रशिक्षण दिल्याने १२०० शेतकºयांना फायदा झाला. यामध्ये १२ युवक मास्टर ट्रेनर झाले.

अळंंबी लागवड, फळ रोपवाटिका या व्यवसायाचे अनुक्र मे ४० आणि ३० युवकांना प्रशिक्षित केल्याने स्वयंरोजगार निर्मिती झाली. मत्स्यशेतीचे प्रशिक्षण मिळाल्याने २० युवकांनी मत्स्यसंवर्धन करण्यास सुरुवात केली. परंपरागत कृषी योजनेमार्फत शेतकºयांचे सेंद्रिय शेती गट तयार करण्यात आले. हवामान केंद्राद्वारे आठवड्यातून दोन वेळा शेतकरी सल्ला देण्यात येत आहे. त्याचा पीक नियोजनासाठी फायदा होत आहे. शेतकºयांना माती परीक्षण करून अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यास प्रोत्साहित केले. त्यामुळे जिल्ह्यातील १५०० शेतकºयांना त्याचा फायदा झाला. आधुनिक शेती आणि पूरक व्यवसायाबाबत जिल्ह्यातील शेतकºयांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास कृषिविज्ञान केंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे प्रमुख शास्त्रज्ञ विलास जाधव म्हणाले.शहरांची भाजीपाल्याची गरज केली पूर्ण जिल्ह्यातील १२१ शेतकºयांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटावेटर मिळाले. ९२ जणांना शेततळे दिल्याने पाण्याचा प्रश्न सुटला. जमीन आरोग्यपत्रिका पथदर्शी प्रकल्प, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबविले.कृषी विकासाचा पाया मजबूत झाल्यानेच लॉकडाऊन काळात शेतकरी गटाने पिकवलेला कृषी माल निर्यात करून महापालिका क्षेत्रातील भाजीपाल्याची निकड पूर्ण केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी दिली. 

टॅग्स :Farmerशेतकरी