शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

‘पालघर जिल्हा गुजरातला जोडण्यासाठी वेगळं षडयंत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:36 IST

मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे

पंकज राऊतबोईसर : मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे अशी भीती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोईसर येथे व्यक्त करून वेळीच जागे व्हा असे, आवाहन केले. तसेच जिंदालच्या नियोजित नांदगांव आलेवाडी बदराच्या विरोधात भूमिपुत्रा सोबत खंबीरपणे राहीन असे आश्वासन नांदगाव येथे जाऊन दिले.आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेस चालना देण्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मंगळवार (दि १ मे) पासून त्यांनी राज्य व्यापी दौरा वसईपासून सुरू केला त्याचा आज दुसरा दिवस होता. वसई येथील प्रचंड जनसमुदायांच्या उपस्थितीत दौऱ्यावरील पहिल्या व शेवटच्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे यांनी तारापूर एमआयडीसी मधील हॉटेल रियांश ग्रँट येथे वास्तव्य केले.बुधवारी सकाळी ८:३० पासून सिटीझन फोरम आॅफ बोईसर -तारापूर या सामाजिक संघटना, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस विरोधी संघर्ष समिती, सूर्यापाणी बचाव समिती, जेष्ठ नागरिक बंधू भगिनी मंडळ, प्रेरित फाउंडेशन बोईसर यांच्या पदाधिकाºयांशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पालघर पोट निवडणुकीत भाजपाविरोधी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.जिंदाल (जेएसडब्ल्यू) नांदगाव - आलेवाडी बंदर विरोधी संघर्ष समितीचे सदस्य, नवापुर, मुरबे, आलेवाडीचे सरपंच, भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी यांचे कडून बंदर उभारणीनंतर उद्भवणाºया समस्या व उध्वस्त होणारे संसार आणि जीवन या संदर्भात खरी वस्तुस्थिति जेथे नियोजित बंदराची जागा आहे त्या भागात राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन समजून घेऊन प्रस्थावित बंदराला स्थानिकांच्या मनातील खदखदणारा असंतोष व प्रचंड विरोधाची भूमिका पाहून जिंदाल व्यवस्थापन लोकांना फसवत असेल तर तुमचा लढा चालू असुद्या मी तुमच्या सोबत खंबीरपणे राहीन असे सांगितले. त्या वेळी त्यांच्या सोबत नितिन सरदेसाई, बाळा नांदगांवकर, अमित ठाकरे, कुंदन संखे, समीर मोरे, धीरज गावड आदी नेते उपस्थित होते.बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, कारिडॉर हे विनाशकारी प्रकल्प उभारून पालघर जिल्हा प्रथम गुजरातशी जोडून नंतर गिळकृत करण्याचा कुटील डाव असल्याचे सांगून मुंबईवर गुजरातशी संलग्न करण्यासाठी तसेच मुंबईवर ताबा मिळविण्यासाठी प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातशी जोडले जाईल हे त्यांनी ठासून सांगितले.तारापूर औद्योगिक पट्ट्यात स्थानिकांना न मिळणारा रोजगार, नांदगाव व वाढवण बंदराला स्थानिकांचा व मच्छीमारांचा असलेला प्रखर विरोध, डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवाशांच्या समस्या, ओएनजीसी सर्वेक्षणाचा मच्छीमारांना बसणारा फटका आदी विषयांवर त्यांनी आपले म्हणने मांडले.पालघर जिल्हा सिडको नवनगर मधील गैरप्रकार, जिल्हाधिकारी यांचा मनमानी कारभार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासीचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर, शौचालय व दुर्गम भागातील वीज पुरवठा व समस्या, जिल्ह्यातील आरोग्य सेवेची झालेली धूळधाण आदी विषयावर चर्चा केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या अडी-अडचणी तसेच पक्षसंघटना बांधणीच्या दृष्टीने त्यांनी चर्चा केली.