शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘पालघर जिल्हा गुजरातला जोडण्यासाठी वेगळं षडयंत्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:36 IST

मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे

पंकज राऊतबोईसर : मुंबई व पालघर जिल्हा गुजरात राज्याला जोडण्यासाठी वेगळ षडयंत्र रचले जात आहे अशी भीती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोईसर येथे व्यक्त करून वेळीच जागे व्हा असे, आवाहन केले. तसेच जिंदालच्या नियोजित नांदगांव आलेवाडी बदराच्या विरोधात भूमिपुत्रा सोबत खंबीरपणे राहीन असे आश्वासन नांदगाव येथे जाऊन दिले.आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेस चालना देण्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मंगळवार (दि १ मे) पासून त्यांनी राज्य व्यापी दौरा वसईपासून सुरू केला त्याचा आज दुसरा दिवस होता. वसई येथील प्रचंड जनसमुदायांच्या उपस्थितीत दौऱ्यावरील पहिल्या व शेवटच्या जाहीर सभेनंतर राज ठाकरे यांनी तारापूर एमआयडीसी मधील हॉटेल रियांश ग्रँट येथे वास्तव्य केले.बुधवारी सकाळी ८:३० पासून सिटीझन फोरम आॅफ बोईसर -तारापूर या सामाजिक संघटना, मुंबई-वडोदरा एक्सप्रेस विरोधी संघर्ष समिती, सूर्यापाणी बचाव समिती, जेष्ठ नागरिक बंधू भगिनी मंडळ, प्रेरित फाउंडेशन बोईसर यांच्या पदाधिकाºयांशी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पालघर पोट निवडणुकीत भाजपाविरोधी भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले.जिंदाल (जेएसडब्ल्यू) नांदगाव - आलेवाडी बंदर विरोधी संघर्ष समितीचे सदस्य, नवापुर, मुरबे, आलेवाडीचे सरपंच, भूमिपुत्र, मच्छीमार, शेतकरी यांचे कडून बंदर उभारणीनंतर उद्भवणाºया समस्या व उध्वस्त होणारे संसार आणि जीवन या संदर्भात खरी वस्तुस्थिति जेथे नियोजित बंदराची जागा आहे त्या भागात राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन समजून घेऊन प्रस्थावित बंदराला स्थानिकांच्या मनातील खदखदणारा असंतोष व प्रचंड विरोधाची भूमिका पाहून जिंदाल व्यवस्थापन लोकांना फसवत असेल तर तुमचा लढा चालू असुद्या मी तुमच्या सोबत खंबीरपणे राहीन असे सांगितले. त्या वेळी त्यांच्या सोबत नितिन सरदेसाई, बाळा नांदगांवकर, अमित ठाकरे, कुंदन संखे, समीर मोरे, धीरज गावड आदी नेते उपस्थित होते.बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, कारिडॉर हे विनाशकारी प्रकल्प उभारून पालघर जिल्हा प्रथम गुजरातशी जोडून नंतर गिळकृत करण्याचा कुटील डाव असल्याचे सांगून मुंबईवर गुजरातशी संलग्न करण्यासाठी तसेच मुंबईवर ताबा मिळविण्यासाठी प्रथम पालघर जिल्ह्याला गुजरातशी जोडले जाईल हे त्यांनी ठासून सांगितले.तारापूर औद्योगिक पट्ट्यात स्थानिकांना न मिळणारा रोजगार, नांदगाव व वाढवण बंदराला स्थानिकांचा व मच्छीमारांचा असलेला प्रखर विरोध, डहाणू-वैतरणा रेल्वे प्रवाशांच्या समस्या, ओएनजीसी सर्वेक्षणाचा मच्छीमारांना बसणारा फटका आदी विषयांवर त्यांनी आपले म्हणने मांडले.पालघर जिल्हा सिडको नवनगर मधील गैरप्रकार, जिल्हाधिकारी यांचा मनमानी कारभार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासीचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर, शौचालय व दुर्गम भागातील वीज पुरवठा व समस्या, जिल्ह्यातील आरोग्य सेवेची झालेली धूळधाण आदी विषयावर चर्चा केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या अडी-अडचणी तसेच पक्षसंघटना बांधणीच्या दृष्टीने त्यांनी चर्चा केली.