शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

खासदार, आमदारांना सतत सांगूनही दातीवरेत महिन्यातून एकदाच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:02 IST

पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते.

- हितेन नाईकपालघर - पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते. खड्डा खणून तहान भागवावी लागते. गेल्या चार-पाच वर्षांपासून हीच परिस्थिती  असून आमदार-खासदारांकडे तक्रारी करुनही ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही.केळवा माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० मध्ये सुरू झालेल्या या योजनेतील अडचणींबाबत निवेदने, आंदोलने करूनही समस्यांकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष न दिल्याने  रडतखडत ही योजना नावापुरची सुरू आहे. योजनेत दातीवरे हे शेवटचे गाव. माहीम, केळवे, माकुनसार, दांडा खटाळी, आगरवाडी, खर्डी, नगावे, वाकसई, तिघरे, अंबोडे, कोरे, वेढी, डोंगरे, मथाने, एडवण, भादवे आणि विळंगी गावांचा समावेश आहेत. 

जमिनीत खड्डा खणून भागवावी लागते तहानगावातील ८५ वर्षीय ज्येष्ठ महिला मंजुबाई वसईकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांना जमिनीत खड्डा खणून त्यातून पाणी घ्यावे लागते. दूषित पाण्यामुळे आजारही होतात. उपचारासाठी सात किलोमीटरवर एडवन प्राथमिक आरोग्य केंद्रात पायीच जावे लागते, असे ग्रामस्थ जितेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

माझ्याकडे  ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे उपाययोजनांसाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने नवीन योजना कार्यान्वित केली जात आहे.- राजेंद्र गावित, खासदार, शिंदेसेना 

गळतीमुळे योजनेतील शेवटचे गाव असलेल्या दातीवरे पर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यासाठी जीवन प्राधिकरण मार्फत १८ कोटींची योजना सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करतो.- आ. राजेश पाटील, बोईसर

पाणीबिलाच्या रकमेचा गैरव्यवहार     वेढी गावाचा पाणीपुरवठा बंद असून अन्य १६ गावांची ९८ लाख ७२ हजार ७१५ रुपयांची पाण्याची थकबाकी असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंते संतोष शिरसीकर  यांनी ‘लोकमत’ला सांगितले.      दातीवरे ग्रामस्थांनी भरलेल्या रकमेचा ग्रामपंचायतीकडून गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनसेचे  तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.      जलजीवन मिशनअंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पालघर विभागाकडून अजूनही पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दातीवरे गावाला नियमित पाणी येण्यास किमान वर्षभर वाट पाहावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातpalghar-pcपालघरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४