शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

खासदार, आमदारांना सतत सांगूनही दातीवरेत महिन्यातून एकदाच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 13:02 IST

पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते.

- हितेन नाईकपालघर - पालघर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राजेंद्र गावित आणि बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे आमदार राजेश पाटील हे दोन मोठे नेते असूनही यांच्या मतदारसंघातील पालघर तालुक्यात दातीवरे गावात महिन्यातून एकदाच पाणी येते. खड्डा खणून तहान भागवावी लागते. गेल्या चार-पाच वर्षांपासून हीच परिस्थिती  असून आमदार-खासदारांकडे तक्रारी करुनही ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबलेली नाही.केळवा माहीम प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना १७ गावांसाठी बनवलेली आहे. १९८० मध्ये सुरू झालेल्या या योजनेतील अडचणींबाबत निवेदने, आंदोलने करूनही समस्यांकडे पाणीपुरवठा विभागाने लक्ष न दिल्याने  रडतखडत ही योजना नावापुरची सुरू आहे. योजनेत दातीवरे हे शेवटचे गाव. माहीम, केळवे, माकुनसार, दांडा खटाळी, आगरवाडी, खर्डी, नगावे, वाकसई, तिघरे, अंबोडे, कोरे, वेढी, डोंगरे, मथाने, एडवण, भादवे आणि विळंगी गावांचा समावेश आहेत. 

जमिनीत खड्डा खणून भागवावी लागते तहानगावातील ८५ वर्षीय ज्येष्ठ महिला मंजुबाई वसईकर यांच्यासह गावातील अनेक नागरिकांना जमिनीत खड्डा खणून त्यातून पाणी घ्यावे लागते. दूषित पाण्यामुळे आजारही होतात. उपचारासाठी सात किलोमीटरवर एडवन प्राथमिक आरोग्य केंद्रात पायीच जावे लागते, असे ग्रामस्थ जितेंद्र तांडेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

माझ्याकडे  ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या होत्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे उपाययोजनांसाठी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने नवीन योजना कार्यान्वित केली जात आहे.- राजेंद्र गावित, खासदार, शिंदेसेना 

गळतीमुळे योजनेतील शेवटचे गाव असलेल्या दातीवरे पर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यासाठी जीवन प्राधिकरण मार्फत १८ कोटींची योजना सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणी पोहोचविण्याची व्यवस्था करतो.- आ. राजेश पाटील, बोईसर

पाणीबिलाच्या रकमेचा गैरव्यवहार     वेढी गावाचा पाणीपुरवठा बंद असून अन्य १६ गावांची ९८ लाख ७२ हजार ७१५ रुपयांची पाण्याची थकबाकी असल्याचे पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंते संतोष शिरसीकर  यांनी ‘लोकमत’ला सांगितले.      दातीवरे ग्रामस्थांनी भरलेल्या रकमेचा ग्रामपंचायतीकडून गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनसेचे  तालुका उपाध्यक्ष चेतन वैद्य यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.      जलजीवन मिशनअंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पालघर विभागाकडून अजूनही पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दातीवरे गावाला नियमित पाणी येण्यास किमान वर्षभर वाट पाहावी लागेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :water shortageपाणीकपातpalghar-pcपालघरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४