शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

समग्र अभियानातील विद्यार्थी सोयी-सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:08 IST

अपंग, विशेष मुलांची गैरसोय

विरार : पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणारे समग्र अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत नसल्याने अपंग, विशेष मुलांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागते आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ पाच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच सोयीसुविधा मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या योजनेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यात एक हजार १५० दिव्यांग आणि विशेष विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केवळ पाच शिक्षक नेमण्यात आले आहेत. तर एकट्या वसई तालुक्यात या मुलांचा शोध घेण्यासाठी १३ केंद्रे उभारण्यात आली आहेत.

या १३ केंद्रांतर्गत भाताने २४, बोळींज ४६, दहिसर ३६, कळंब १०४, कमान २२, खानिवडे १४, मालाजीपाडा ५९, माणिकपूर ७७, पारोळ २५, पेल्हार ३२७, वालीव ७४, वसई ५१, विरार १३५ अशा शाळा येतात. या १३ केंद्रातील शाळांवर एका शिक्षकाकडे तीन केंद्रे अशा पद्धतीने हे कामकाज चालते. यामुळे शिक्षकांचा व्याप वाढत असून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण आणि योजनांचा लाभ मिळत नाही.

अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करते, शिबिरे राबवते. शिक्षकांना मुलांना शिकवण्यास मदत करणे, दिव्यांग आणि विशेष मुलांना त्यांच्या विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळवून देणे अशी कामे करावी लागतात. मात्र ढिसाळ पद्धतीने अभियानाचे कामकाज चालत असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही सेवा - सुविधा उत्तमरीत्या देता येत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

तपासणी केंद्राचा अभाव

शाळेतील ज्या मुलांना डोळ्यांचे व्यंग आहे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. पण तालुक्यात असे कोणतेही तपासणी केंद्र नसल्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावे लागत असल्याची खंत वसईच्या समन्वयक पूनम ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकच केंद्र असल्याने वारानुसार मुलांना चाचणीसाठी घेऊन जावे लागते. परिणामी, पालक आणि शिक्षकांची तारांबळ उडते.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSchoolशाळा