शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

समग्र अभियानातील विद्यार्थी सोयी-सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:08 IST

अपंग, विशेष मुलांची गैरसोय

विरार : पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणारे समग्र अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत नसल्याने अपंग, विशेष मुलांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागते आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ पाच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच सोयीसुविधा मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या योजनेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यात एक हजार १५० दिव्यांग आणि विशेष विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केवळ पाच शिक्षक नेमण्यात आले आहेत. तर एकट्या वसई तालुक्यात या मुलांचा शोध घेण्यासाठी १३ केंद्रे उभारण्यात आली आहेत.

या १३ केंद्रांतर्गत भाताने २४, बोळींज ४६, दहिसर ३६, कळंब १०४, कमान २२, खानिवडे १४, मालाजीपाडा ५९, माणिकपूर ७७, पारोळ २५, पेल्हार ३२७, वालीव ७४, वसई ५१, विरार १३५ अशा शाळा येतात. या १३ केंद्रातील शाळांवर एका शिक्षकाकडे तीन केंद्रे अशा पद्धतीने हे कामकाज चालते. यामुळे शिक्षकांचा व्याप वाढत असून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण आणि योजनांचा लाभ मिळत नाही.

अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करते, शिबिरे राबवते. शिक्षकांना मुलांना शिकवण्यास मदत करणे, दिव्यांग आणि विशेष मुलांना त्यांच्या विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळवून देणे अशी कामे करावी लागतात. मात्र ढिसाळ पद्धतीने अभियानाचे कामकाज चालत असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही सेवा - सुविधा उत्तमरीत्या देता येत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

तपासणी केंद्राचा अभाव

शाळेतील ज्या मुलांना डोळ्यांचे व्यंग आहे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. पण तालुक्यात असे कोणतेही तपासणी केंद्र नसल्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावे लागत असल्याची खंत वसईच्या समन्वयक पूनम ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकच केंद्र असल्याने वारानुसार मुलांना चाचणीसाठी घेऊन जावे लागते. परिणामी, पालक आणि शिक्षकांची तारांबळ उडते.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSchoolशाळा