शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

समग्र अभियानातील विद्यार्थी सोयी-सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:08 IST

अपंग, विशेष मुलांची गैरसोय

विरार : पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणारे समग्र अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत नसल्याने अपंग, विशेष मुलांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागते आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी केवळ पाच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच सोयीसुविधा मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने या योजनेकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वसई तालुक्यात एक हजार १५० दिव्यांग आणि विशेष विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी केवळ पाच शिक्षक नेमण्यात आले आहेत. तर एकट्या वसई तालुक्यात या मुलांचा शोध घेण्यासाठी १३ केंद्रे उभारण्यात आली आहेत.

या १३ केंद्रांतर्गत भाताने २४, बोळींज ४६, दहिसर ३६, कळंब १०४, कमान २२, खानिवडे १४, मालाजीपाडा ५९, माणिकपूर ७७, पारोळ २५, पेल्हार ३२७, वालीव ७४, वसई ५१, विरार १३५ अशा शाळा येतात. या १३ केंद्रातील शाळांवर एका शिक्षकाकडे तीन केंद्रे अशा पद्धतीने हे कामकाज चालते. यामुळे शिक्षकांचा व्याप वाढत असून विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण आणि योजनांचा लाभ मिळत नाही.

अशा मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा पालक आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करते, शिबिरे राबवते. शिक्षकांना मुलांना शिकवण्यास मदत करणे, दिव्यांग आणि विशेष मुलांना त्यांच्या विकलांगतेचे प्रमाणपत्र मिळवून देणे अशी कामे करावी लागतात. मात्र ढिसाळ पद्धतीने अभियानाचे कामकाज चालत असल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही सेवा - सुविधा उत्तमरीत्या देता येत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

तपासणी केंद्राचा अभाव

शाळेतील ज्या मुलांना डोळ्यांचे व्यंग आहे, त्यांची वैद्यकीय चाचणी करणे आवश्यक आहे. पण तालुक्यात असे कोणतेही तपासणी केंद्र नसल्याने त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावे लागत असल्याची खंत वसईच्या समन्वयक पूनम ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच संपूर्ण जिल्ह्यात एकच केंद्र असल्याने वारानुसार मुलांना चाचणीसाठी घेऊन जावे लागते. परिणामी, पालक आणि शिक्षकांची तारांबळ उडते.

टॅग्स :Studentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSchoolशाळा