शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

भीषण आग आणि एकाचा बळी जाऊनही महापालिका...; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

By धीरज परब | Updated: March 1, 2024 18:07 IST

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे.

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील मीरा भाईंदर महापालिकेच्या आरक्षणाच्या मालकी जागेत झालेल्या बेकायदा गोदाम व झोपडयांना महापालिकेनेच संरक्षण दिल्याने बुधवारी भीषण आग लागून एकाचा बळी गेला. या प्रकरणी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे आगीची घटना घडून देखील पालिका मात्र पालिकेची जागा अतिक्रमण मुक्त करण्यास अजूनही चालढकल करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

भाईंदर पूर्वेच्या आझादनगर भागातील पालिका आरक्षणाची जागा ही शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मोक्याची आहे. आरक्षणाची जागा ताब्यात घेण्यासाठी पालिकेने विकासक व जमीन मालकांना करोडो रुपयांचा मोबदला टीडीआर द्वारे दिलेला आहे.  तर एका प्रकरणात अतिक्रमण असून सुद्धा एका राजकीय व्यक्तीशी संबंधिताला पालिकेने टीडीआर देण्याचा प्रताप केला असल्याचे आरोप होत आले आहेत. येथील एक पक्के मोठे अनधिकृत धार्मिक स्थळ तोडू नये म्हणून संबंधित मुंबई उच्च न्यायालयात गेले असता तेथे त्यांना दिलासा मिळाला नाही. परंतु पालिकेने अजूनही ते बेकायदा बांधकाम तोडलेले नाही. 

न्यू गोल्डन नेस्ट कडे जाणाऱ्या रस्त्याच्या लगत ह्या पालिका भूखंडात मोठ्या प्रमाणात गोदामे , झोपड्या तसेच पक्की बांधकामे होऊन देखील महापालिकेचे प्रभाग अधिकारी पासून अतिक्रमणाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सदर जागा मोकळी करून घेतली नाही. उलट पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्याना धंदे लावण्यास तसेच राहण्यास मोकळीक दिली. 

या प्रकरणी तत्कालीन स्थानिक शिवसेना नगरसेविका तारा घरत स्नेहा पांडे आदींनी पालिके कडे आरक्षणाची जागा मोकळी करण्यासाठी तक्रारी केल्या होत्या. दोन वर्षां पूर्वी पालिकेने येथील अतिक्रमणे हटवली सुद्धा होती. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त या मोकळ्या भागात   घरत , पांडे ह्या स्थानिक नगरसेविकांनी वृक्षारोपण केले होते. परंतु काही काळाने झाडे काढून टाकून माफियांनी पुन्हा अतिक्रमणे केली. 

आझाद नगरच्या ह्या गोदाम , झोपड्याना पूर्वी देखील आग लागली होती. त्यातच पालिकेच्या मालकीची जागा असल्याने येथील अतिक्रमणे हटवली असती तर बुधवारची भीषण आग लागून एकाच बळी गेला नसता. लोक जखमी झाले नसते व लोकांचे आगी मुळे झालेले नुकसान  टळले असते. शिवाय आग विझवण्यासाठी इतकी मोठी यंत्रणा लागली नसती. 

शैलेश पांडे ( प्रवक्ता , भाजपा ) - स्थानिक नगरसेविका ताराताई घरत व स्नेहा पांडे यांच्या तक्रारी नंतर पालिका आरक्षणातील अतिक्रमण दूर करून घेतले व वृक्षारोपण केले होते. परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांना पालिकेच्या मालकीची जागा सुद्धा संरक्षित ठेवायची नाही हे शहराचे दुर्दैव आहे. भीषण आग लागून जीव जाण्यास पालिकेचे प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग जबाबदार असून त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करा. ज्या लोकांचे आगीत नुकसान झाले त्याचा खर्च ह्या अधिकारी व पालिके कडून वसूल करावा.  

कृष्णा गुप्ता ( अध्यक्ष , सत्यकाम फाऊंडेशन ) - शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ह्या भागात मोठ्या प्रमाणात झाडे लावून परिसरातील प्रदूषण कमी करण्या ऐवजी महापालिका आणि काही राजकारणी मात्र पालिकेच्या मालकी जागेवरच अतिक्रमण करण्यास संरक्षण देत आले आहेत. त्यामुळे आगीच्या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरfireआग