शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

वसईकरांच्या नशिबी मरणही क्लेशदायी, लाकडे नाहीत, साठवण सुविधा नाहीत, दिवे नाहीत, गॅसदाहिनी रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:17 IST

वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही

शशी करपे वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही. वसईतील मृतदेहांच्या व त्यांच्या आप्तांच्या नशिबी येणा-या क्लेशदायी वस्तुस्थितीचा पर्दाफाश महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला आहे.वसई विरार महापालिका हद्दीत ८५ स्मशानभूमी असून त्यापैेकी ७७ वापरात आहेत. तर आठ पडून आहेत. पाणी, दिवाबत्ती, लाकडे आदी पायाभूत सुविधा बºयाच स्मशानभूमींमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब किरण चेंदवणकर यांनी स्मशानभूमींना प्रत्यक्ष भेट देऊन चव्हाट्यावर आणली आहे.महापालिकेने चालू आर्थिक वर्षात स्मशानभूमीच्या विकासासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात अगदी नगण्य खर्च करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांना परदेशात बसून थेट अंत्यसंस्कार पाहता यासाठी स्मशानभूमींमध्ये कॅमेरे लावण्याची घोषणा करणारी महापालिका बºयाच स्मशानभूमींमध्ये नळजोडणी, दिवाबत्ती, लाकडांसाठी गोदाम देऊ शकली नसल्याचा आरोप त्यांनी केला.महापालिका मोफत लाकडे देते. मात्र, ३३ स्मशानभूमींमध्ये लाकडे ठेवण्यासाठी गोदामे नाहीत. परिणामी दूरवर ठेवलेली लाकडे अंत्यसंस्कारासाठी येणाºया लोकांना वाहून न्यावी लागत आहेत. तर ४१ स्मशानभूमींमध्ये सध्या लाकडे उपलब्ध नाहीत. विरारमधील नारंगी स्मशानभूमीत नळ आहे पण पाणी नाही. चिता रचण्यासाठीचे स्टॅण्ड नाहीत. कार्यरत असलेल्या स्मशानभूमीत दोन ते चार स्टॅण्ड आहेत. पण, प्रत्येक स्मशानभूमीतील स्टॅण्ड तुटलेले आहेत. गास गावातील बंदरवाडी टाकीपाडा स्मशानभूमीत असे स्टॅण्ड नसल्याने दगडाच्या चौथºयावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.२७ स्मशानभूमींमध्ये दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात मोबाइलच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावा लागत आहे. प्रभाग समिती क मधील फणसपाडा आणि कोशिंबे स्मशानभूमीत दिवे आहेत, पण ते कायम बंदच असतात. ७७ स्मशानभूमींसाठी केवळ ५१ कायमस्वरुपी कर्मचारी आहेत. तुळींज स्मशानभूमीत नालासोपारा जनसेवा संस्थेचे चार कर्मचारी काम करीत आहेत. कर्मचारी नसल्याने उमराळे आणि उमराळे ब्राम्हण आळीतील स्मशानभूमीत ग्रामस्थ अंत्यविधी करतात. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत स्वतंत्र कर्मचारी नसल्याने महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांनाच काम करावे लागत आहे. बहुतेक स्मशानभूमींमध्ये राख काढण्याचे साहित्य नाही. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी महापालिकेने नालासोपारा समेळ पाडा आणि एव्हरशाईन आचोळे येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवलेली आहे. त्यासाठी लाखो रुपयांची तरतूदही केली आहे. पण, या दोन्ही गॅस दाहिन्या काम अपूर्ण असल्याने बंद आहेत. या गॅस दाहिनीत प्रत्येकी ४८ सिलेंडर्स आहेत. पण, वापर होत नसल्याने सिलेंडर्सना गंज चढलेला आहे. गरीबांनी गॅस दाहिनीचा वापर केल्यास त्यांना एक हजार रुपये घरपोच देण्याची महापालिकेने घोषणा केली पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. महापालिकेचे स्वत:चे एकही शवविच्छेदन केंद्र आणि शवागर नाही. केवळ एकच शववाहिनी आहे. करदात्यांचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.>दफनभूमी, कब्रस्तानच्या वाट्यालाही उपेक्षाचमाणिकपूर शहरात सनसिटी येथे मुस्लीम बांधवांसह इतर धर्मींयासाठी दफनभूमीसाठी जागा आरक्षित केली आहे. त्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा खर्चही करण्यात आलेला आहे. मात्र, याठिकाणची कामे अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाहीत. प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मींयांसाठीची दफनभूमी अद्याप कागदावरच आहे.