शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
5
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
6
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
7
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
8
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
9
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
10
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
11
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
12
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
13
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
14
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
15
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
16
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
17
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
18
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
19
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
20
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट

वसईकरांच्या नशिबी मरणही क्लेशदायी, लाकडे नाहीत, साठवण सुविधा नाहीत, दिवे नाहीत, गॅसदाहिनी रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:17 IST

वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही

शशी करपे वसई : अनेक गैरसोयींमुळे विरार-वसईकरांना दररोज अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण, मृत्यूनंतरही या यातनातून त्यांची सुटका नाही. वसईतील मृतदेहांच्या व त्यांच्या आप्तांच्या नशिबी येणा-या क्लेशदायी वस्तुस्थितीचा पर्दाफाश महापालिकेतील शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी केला आहे.वसई विरार महापालिका हद्दीत ८५ स्मशानभूमी असून त्यापैेकी ७७ वापरात आहेत. तर आठ पडून आहेत. पाणी, दिवाबत्ती, लाकडे आदी पायाभूत सुविधा बºयाच स्मशानभूमींमध्ये उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब किरण चेंदवणकर यांनी स्मशानभूमींना प्रत्यक्ष भेट देऊन चव्हाट्यावर आणली आहे.महापालिकेने चालू आर्थिक वर्षात स्मशानभूमीच्या विकासासाठी २ कोटी ११ लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात अगदी नगण्य खर्च करण्यात आला आहे. मृतांच्या नातेवाईकांना परदेशात बसून थेट अंत्यसंस्कार पाहता यासाठी स्मशानभूमींमध्ये कॅमेरे लावण्याची घोषणा करणारी महापालिका बºयाच स्मशानभूमींमध्ये नळजोडणी, दिवाबत्ती, लाकडांसाठी गोदाम देऊ शकली नसल्याचा आरोप त्यांनी केला.महापालिका मोफत लाकडे देते. मात्र, ३३ स्मशानभूमींमध्ये लाकडे ठेवण्यासाठी गोदामे नाहीत. परिणामी दूरवर ठेवलेली लाकडे अंत्यसंस्कारासाठी येणाºया लोकांना वाहून न्यावी लागत आहेत. तर ४१ स्मशानभूमींमध्ये सध्या लाकडे उपलब्ध नाहीत. विरारमधील नारंगी स्मशानभूमीत नळ आहे पण पाणी नाही. चिता रचण्यासाठीचे स्टॅण्ड नाहीत. कार्यरत असलेल्या स्मशानभूमीत दोन ते चार स्टॅण्ड आहेत. पण, प्रत्येक स्मशानभूमीतील स्टॅण्ड तुटलेले आहेत. गास गावातील बंदरवाडी टाकीपाडा स्मशानभूमीत असे स्टॅण्ड नसल्याने दगडाच्या चौथºयावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.२७ स्मशानभूमींमध्ये दिवाबत्तीची सोय नाही. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारात मोबाइलच्या प्रकाशात अंत्यविधी उरकावा लागत आहे. प्रभाग समिती क मधील फणसपाडा आणि कोशिंबे स्मशानभूमीत दिवे आहेत, पण ते कायम बंदच असतात. ७७ स्मशानभूमींसाठी केवळ ५१ कायमस्वरुपी कर्मचारी आहेत. तुळींज स्मशानभूमीत नालासोपारा जनसेवा संस्थेचे चार कर्मचारी काम करीत आहेत. कर्मचारी नसल्याने उमराळे आणि उमराळे ब्राम्हण आळीतील स्मशानभूमीत ग्रामस्थ अंत्यविधी करतात. धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीत स्वतंत्र कर्मचारी नसल्याने महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांनाच काम करावे लागत आहे. बहुतेक स्मशानभूमींमध्ये राख काढण्याचे साहित्य नाही. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी महापालिकेने नालासोपारा समेळ पाडा आणि एव्हरशाईन आचोळे येथील स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवलेली आहे. त्यासाठी लाखो रुपयांची तरतूदही केली आहे. पण, या दोन्ही गॅस दाहिन्या काम अपूर्ण असल्याने बंद आहेत. या गॅस दाहिनीत प्रत्येकी ४८ सिलेंडर्स आहेत. पण, वापर होत नसल्याने सिलेंडर्सना गंज चढलेला आहे. गरीबांनी गॅस दाहिनीचा वापर केल्यास त्यांना एक हजार रुपये घरपोच देण्याची महापालिकेने घोषणा केली पण त्याची अंमलबजावणीच झाली नाही. महापालिकेचे स्वत:चे एकही शवविच्छेदन केंद्र आणि शवागर नाही. केवळ एकच शववाहिनी आहे. करदात्यांचा अंतिम प्रवास सुखकर व्हावा, यासाठी महापालिकेने उपाय योजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.>दफनभूमी, कब्रस्तानच्या वाट्यालाही उपेक्षाचमाणिकपूर शहरात सनसिटी येथे मुस्लीम बांधवांसह इतर धर्मींयासाठी दफनभूमीसाठी जागा आरक्षित केली आहे. त्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपयांचा खर्चही करण्यात आलेला आहे. मात्र, याठिकाणची कामे अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाहीत. प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मींयांसाठीची दफनभूमी अद्याप कागदावरच आहे.