शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

उपवन संरक्षक कार्यालयाने बांधले १५० बंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 00:30 IST

वन्यजीव आणि नागरिकांना मिळणार दिलासा

डहाणू: डहाणू उपवन संरक्षक कार्यालयातर्फे दहा वन परिक्षेत्राअंतर्गत लोकसहभागातून १५० वनराई बंधारे बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. आगामी काळात त्यामुळे परिसरातील जलसाठा वाढून वन्यजीवांसह नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी उपयोग होणार आहे.

पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केल्यानंतर डहाणू उपवन संरक्षक अधिकारी विजय भिसे यांनी हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाºया डहाणू, बोर्डी, कासा, उधवा, बोईसर, दहिसर, सफाळे, पालघर, मनोर आणि भाताने या वन परिक्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह योजनाबद्धरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

हा उपक्रम राबविताना लोकसहभाग केंद्रस्थानी होता. स्थानिकांच्या मदतीने भौगोलिक परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर उपक्रम राबवण्यात आला. त्यानुसार नैसर्गिकरित्या तयार झालेल्या आणि पाणी असलेल्या ओहळावर रिकाम्या पोत्यांचा वापर करून त्यामध्ये पाण्याच्या प्रवाहासह आलेली माती भरण्यात आली. याकरिता वन कर्मचाºयांसह त्या-त्या भागातील महिला-पुरुष, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शासकीय विभागातील कर्मचारी यांनी श्रमदानातून बंधारे बांधले. यावेळी मातीचा वापर करण्यात आल्याने, ओहळाचे खोलीकरण होऊन पुढील काळात पावसाचे अधिक पाणी अडवता येणार आहे. दरम्यान, दहा वनपरीक्षेत्रांपैकी पालघर येथे सर्वाधिक ४०, बोईसर ३८, उधवा २१, कासा १३ आणि दहिसर १० यांनी दोन अंकी आकडा गाठला असून अन्य ठिकाणी २८ असे एकूण १५० वनराई बंधारे बांधण्यात आले.पालघर जिल्ह्यात पश्चिम घाटाच्या रांगा असून पावसाळ्यात डोंगरावरून समुद्राकडे वाहून नेणारे अनेक ओहळ आहेत.

पावसाळा संपल्यानंतर त्यापैकी काही बंधारे हिवाळ्यातही वाहत असल्याने त्यावर बांध घातल्याने पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढून विहिरी, कूपनलिकाद्वारे नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार नाही. शिवाय गुरा-ढोरांप्रमाणेच रब्बी हंगामातील शेतीलाही त्याचा लाभ होणार आहे. येथील जंगलात असलेल्या बिबट्या, तरस, भेकर, रानडुकर अशा विविध वन्यजीव, पशू - पक्ष्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

काही वर्षांपासून ‘नाम’ आणि ‘पानी’ फाउंडेशनद्वारे राज्यातील विविध ठिकाणी वॉटरकप तसेच बंधारे बांधले गेले. सिनेकलावंतांनी त्यामध्ये पुढाकार घेतल्याने सामान्य नागरिकांना या योजनेची प्रेरणा मिळाली. त्यामुळे सर्वचस्तरातील नागरिक फावडा, घमेलं घेऊन वनकर्मचाºयांसह श्रमदानाकरिता एकवटले होते.

जिल्हाधिकाºयांच्या आवाहनानंतर या विभागाअंतर्गत १० वनपरीक्षेत्रात लोकसहभागाला महत्त्व देऊन श्रमदनातून १५० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. त्याचा फायदा वन्यजीव आणि नागरिकांना शेती व पिण्याकरिता होणार आहे.- विजय भिसे, उपवन संरक्षक, डहाणू 

टॅग्स :riverनदीVasai Virarवसई विरार