शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

डहाणूतील शेतकऱ्यांचा संकरीत बियाणे खरेदीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:23 AM

मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे.

बोर्डी : मान्सून आगमनच्या संकेताने बळीराजा सुखावला असून, भात पेरणीपूर्व मशागतीची कामेही अंतिम टप्यात आली आहेत. दरम्यान शेतक-यांना अनुदानावर मिळणार्?या बियाण्यांचा एकमेव पर्याय उपलब्ध असला तरी त्यांचा कल संकरीत बियाणे खरेदीकडे वाढला आहे. दरम्यान संकरीत बियाण्यांच्या खरेदीतील फसवणुकीचा धोका टाळण्याकरिता योग्य मार्गदर्शनाची गरज व्यक्त होत आहे.कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ विभाग पडतात. त्यापैकी कोकण विभागामध्ये तीन विभाग येतात. कोकणाचे शेती व पीकपद्धती ठरविण्यामध्ये समुद्रकिनाºयापासूनचे अंतरसुद्धा महत्वाचे आहे. त्यानुसार किनाºयापासून १५ ते २० किमी खलाटी, २० ते ६० किमी वलाटी आणि त्यानंतर घाटमाथा असे हे तीन प्रकार आहेत. डहाणू तालुक्याला ३५ किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी लाभली असून, तालुक्याचा समावेश प्रामुख्याने खलाटी आणि वलाटी क्षेत्रात होतो. तालुक्यात खरीप हंगामात १५००० हेक्टर क्षेत्रावर भात शेती केली जाते. त्यामध्ये हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० हेक्टर असे लागवड क्षेत्र आहे. डहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर फक्त कर्जत ७ या ११५ ते १२० दिवसाच्या कालावधीच्या भात बियाण्यांचे वाटप केले जाते आहे. या हंगामात २०० क्विंटल साठा कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. २० किलोच्या पोत्याची किंमत ८५९ रु पये आहे. मात्र सवलतीच्या दरात ४२५ रु पये आकारले जातात. या करिता लाभार्थी शेतकºयांकडे ७/१२ उतारा आवश्यक आहे. जास्तीतजास्त शेतकºयांनी या बियाण्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. जमिनीच्या प्रकारानुसार भात वाणाच्या अन्य जातींचे पर्याय उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र ते उपलब्ध नसल्याने किमती अधिक असूनही संकरीत बियाणांकडे शेतकरी वळला आहे.बिल जपा पिशवी उघडा टॅगच्या विरुद्ध दिशेने, उगवण कमी तर करा तक्रारभात बियाणे खरेदी केल्यानंतर तसेच पेरणीपूर्वी शेतकºयांनी योग्यती खबरदारी घेतल्यास सदोष बियाण्यांच्या फसवणुकीचा धोका टाळता येतो. त्यानुसार बियाण्यांची पिशवी टॅगच्या विरूद्ध दिशेने फोडावी, बियाण्यांचा नमुना पिशवीत राखून ठेवावा, बिलाची सत्यप्रत जपून ठेवावी, साधारणत: ५ ते ७ दिवसात बियाणे उगवते. मात्र उगवण क्षमता कमी आढळल्यास खरेदी केलेल्या लॉटच्या बियाण्याच्या नमुन्याची तपासणी पंचायत समितीच्या सक्षम अधिकाºयास करण्यास सांगावे. बियाण्यांची उगवण क्षमता कमी आढळल्यास बियाणे कायदा १९६६ कलम १९ नुसार कारवाई होऊ शकते. तालुकास्तरावर बियाणे तक्र ार समतिी गठीत केलेली असते. त्यासाठी शेतकºयांनी बियाणे खरेदी केल्यानंतर, पेरणीपूर्व तसेच पीक तयार झाल्यानंतर योग्य व अभ्यासपूर्ण निरीक्षण व नोंदी ठेवणे गरजेचे आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार