शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:08 IST

वसईतील सुरुची बाग येथील प्रकार; क्षमतेपेक्षा कोंबले जातात जास्त प्रवासी

वसई : येथील समुद्रकिनारी असलेल्या सुरुची बाग येथे पर्यटकांना रपेट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांना क्रूर वागणूक देत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका घोडागाडीत दहा प्रवासी बसवून रपेट घडविली जात आहे. वाळू माफियांनी केलेल्या वाळू चोरी मुळे हा किनारा पार खचून गेला आहे. तरीही पर्यटकांचा ओघ हा घटलेला नाही, याउलट तो दिवसागणिक वाढतोच आहे. मुख्य रस्त्यापासून किनाºयावर जाण्यासाठी ३ कि. मीटर चा तुटका रस्ता आहे.वाढत्या पर्यटनामुळे या रस्त्यावरून किनाºयावर जाण्यासाठी तीन चाकी आणि चार चाकी गाड्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे येथे फक्त दुचाकी आणि घोडागाडी पर्यटकांना या सुरुची बाग किनाºयावर पोहोचविण्याचे काम करते. विशेष म्हणजे वसई सोडून इतर भागातून येणारे पर्यटक मजा म्हणून या घोडागाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हे पाहता घोडागाडीचा चालक एका सवारीवर ९ ते १० पर्यटकांना एकाच वेळी बसवून प्रवास घडवित आहे. एकूणच या राबणाºया घोड्यांसाठी मात्र हा जीवघेणा प्रवास असून तो दररोज या किनाºयावर पहावयास मिळत आहे. रविवारी सायंकाळी १० पर्यटकांनी भरलेली घोडागाडी अचानक खाली कोसळली. जास्त वजन असल्याने या घोड्याला ते झेपले नाही आणि शेवटी ही गाडीच कोसळली.या अपघातात घोड्याच्या पायाला जबर दुखापत झाली तरी देखील या घोड्याला पुन्हा टांग्याला जुंपले गेले असल्याने प्राणीमित्रांत हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत घोडागाडी चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. तसेच हा घोडा दहा जणांचे वजन पेलवू शकतो म्हणून आम्ही जास्त प्रवासी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु मुक्या घोड्यांवर राजरोस अत्याचार करणाºयावर मात्र कोणाचाही लगाम नसल्याची मोठी खंत व्यक्त होत आहे. याबाबत कुणाकडे आणि कशी तक्रार करावी असा प्रश्न येथील प्राणीमित्रांना पडला आहे. मालक घोड्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार