शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

समुद्रकिनारी घोड्यांना क्रूर वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:08 IST

वसईतील सुरुची बाग येथील प्रकार; क्षमतेपेक्षा कोंबले जातात जास्त प्रवासी

वसई : येथील समुद्रकिनारी असलेल्या सुरुची बाग येथे पर्यटकांना रपेट घडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांना क्रूर वागणूक देत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका घोडागाडीत दहा प्रवासी बसवून रपेट घडविली जात आहे. वाळू माफियांनी केलेल्या वाळू चोरी मुळे हा किनारा पार खचून गेला आहे. तरीही पर्यटकांचा ओघ हा घटलेला नाही, याउलट तो दिवसागणिक वाढतोच आहे. मुख्य रस्त्यापासून किनाºयावर जाण्यासाठी ३ कि. मीटर चा तुटका रस्ता आहे.वाढत्या पर्यटनामुळे या रस्त्यावरून किनाºयावर जाण्यासाठी तीन चाकी आणि चार चाकी गाड्यांना बंदी घातली आहे. त्यामुळे येथे फक्त दुचाकी आणि घोडागाडी पर्यटकांना या सुरुची बाग किनाºयावर पोहोचविण्याचे काम करते. विशेष म्हणजे वसई सोडून इतर भागातून येणारे पर्यटक मजा म्हणून या घोडागाडीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. हे पाहता घोडागाडीचा चालक एका सवारीवर ९ ते १० पर्यटकांना एकाच वेळी बसवून प्रवास घडवित आहे. एकूणच या राबणाºया घोड्यांसाठी मात्र हा जीवघेणा प्रवास असून तो दररोज या किनाºयावर पहावयास मिळत आहे. रविवारी सायंकाळी १० पर्यटकांनी भरलेली घोडागाडी अचानक खाली कोसळली. जास्त वजन असल्याने या घोड्याला ते झेपले नाही आणि शेवटी ही गाडीच कोसळली.या अपघातात घोड्याच्या पायाला जबर दुखापत झाली तरी देखील या घोड्याला पुन्हा टांग्याला जुंपले गेले असल्याने प्राणीमित्रांत हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत घोडागाडी चालकास विचारणा केली असता त्याने उडवाउडवी ची उत्तरे दिली. तसेच हा घोडा दहा जणांचे वजन पेलवू शकतो म्हणून आम्ही जास्त प्रवासी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु मुक्या घोड्यांवर राजरोस अत्याचार करणाºयावर मात्र कोणाचाही लगाम नसल्याची मोठी खंत व्यक्त होत आहे. याबाबत कुणाकडे आणि कशी तक्रार करावी असा प्रश्न येथील प्राणीमित्रांना पडला आहे. मालक घोड्यांची कोणतीही काळजी घेत नाहीत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार