शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आदिवासींची मान्सूनपूर्व खरेदीसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:45 PM

पावसाळा पूर्व खरेदी हा पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील दरवर्षीचा परिपाठ असून त्यासाठी विविध आठवडा बाजारामध्ये मोठी गर्दी दिसत आहे

विक्रमगड : पावसाळा पूर्व खरेदी हा पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील दरवर्षीचा परिपाठ असून त्यासाठी विविध आठवडा बाजारामध्ये मोठी गर्दी दिसत आहे. एकदा का पाऊस सुरु झाला की येथील शेतकरी शेतीच्या कामांना सुरुवात करतो. त्याला या काळात वेळ नसतो. त्यामुळे ग्रामिण भागामध्ये या आघोटच्या खरेदीला मोठे महत्व असते.मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्ये अशा गरजेच्या वस्तूंबरोबर सुकी मच्छीही तीन ते चार महिने पुरेल इतका साठा करुन ठेवण्यात येतो. पावसाळयाच्या हंगामाला शेतकरी अगोट म्हणून संबोधत असतात़ पाऊस केरळमध्ये दाखल झाल्याची वार्ता बुधवारी धडकल्याने खरेदी विक्रीची ही घाई जाणवू लागली आहे. या खरेदी-विक्रीलाही महागाईची झळ असली तरी विक्रमगड, वाडा व जव्हार येथील ग्राहकांना ही खरेदी आवश्यक असते. हा डोंगरी व दऱ्या खोºयांचा भाग असल्याने बºयाचदा पावसाळ्यात संपर्क तुटतो.अशावेळी माचिस सारखी जिणस सुद्धा महत्वाची ठरते.सक्की मासळी ही येथील आदिवासी व इतर समाजाच्या अन्नातील महत्वाचा घटक असल्याने सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदीविण भागातुन मासळी विक्रेत्या महिला विक्रमगड, व परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा आदी विविध खेडया पाडयात गावात आठवडी बाजारात येऊन आपले दुकानें थाटले आहे. यामध्ये बोंबील, कोलीम, आंबडकाड, बांगडे, सुरमई, बगीसुकट, मांदीला, सुकट, खारे अशा विविध प्रकारच्या मासळीचा समावेश असतो. दिवसभर पावसात भिजुन आलेल्या गडयांला बांगडा भाजुन दिला की, त्याच्या चेहºयावरचे समाधान पाहण्या जोगे असते़शिवाय कांद्यात तळलेल्या कोलीमबरोबर शेताच्या बांधावर बसुन केलेल्या न्याहारीची चव काही वेगळीच असते.सुक्या मावºयाचे भाव दुपटीने वाढलेउन्हाळयात विकली न गेलेली मासळी कोळी सुकवतात तेसच मे महिन्यात सुकवलेली सुकी मासळी ते विक्रीसाठी घेऊन येतात. ़विक्रमगडच्या नाक्यावर परिसरात तसेच आसपासच्या खेडयावरील परिसरात साखरा, दादडे, तलवाडा, आलोंडा, मलवाडा, जव्हार परिसरात अशीच सुकी मासळी सध्या मोठया प्रमाणात विक्रीसाठी येत आहे़ पालघर, वसई, सातपाटी, केळवे, डहाणु येथून सुकी मासळी घेऊन आलेल्या महिला बाजारात सुकी मच्छी विकत आहेत.़ तसेच स्थानिक कोळी महिलाही गावात पाडयात सुकी मच्छी विकतांना दिसत आहेत़गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही (मावरा) बसला आहे़ बोंबील किलोमागे शंभर रुपये माहगलेले आहेत़ तर बागडा, आंबडकाड, मांदेली, लोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढलेले दिसत आहेत़ सुक्या मासळीचे भाव गतवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले असले तरी पावसाळयात सुकी मासळीही ग्रामीण भागातील शेतकºयांची मुखत्वे येथील खेडया-पाड्यातील आदिवासींची गरज आहे़