शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:28 IST

उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.

वाडा/पारोळ : जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळासोबत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. सतत तीन दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, त्यानंतर जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.वाडा तसेच वसई या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर शेतकºयांना बसलाच आहे. पण, कोरोनाच्या भीतीमुळे जव्हार, मोखाडा, तलासरी, नाशिक येथील शेतमजूरही येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या वर्षी शेतमजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. काही केल्या संकटे शेतकºयांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. या वर्षी शेती करणे कठीण होऊन बसले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे शेतकरी बबन वारघडे यांनी सांगितले.रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भातरोपांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाºया कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकांमधील रोपे करपण्याची शक्यता शेतकरी घनश्याम आळशी यांनी व्यक्त केली.वसईत पेरणी झालेल्या सर्व भागातही हीच समस्या उद्भवली आहे. पावसात रोपे टिकाव धरतात, मात्र मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागत आहे. अधूनमधून एखादी सर पडते. तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत.>शेतकºयांचे आर्थिकगणित बिघडणारवसई क्षेत्रावर भातरोपलागवड झाली आहे. सर्व क्षेत्रांत चांगली रोपे उगवली असून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पैसे मोजून बी-बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे मान्सून अधिक काळ लांबल्यास शेती व शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.