शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:28 IST

उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.

वाडा/पारोळ : जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळासोबत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. सतत तीन दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, त्यानंतर जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.वाडा तसेच वसई या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर शेतकºयांना बसलाच आहे. पण, कोरोनाच्या भीतीमुळे जव्हार, मोखाडा, तलासरी, नाशिक येथील शेतमजूरही येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या वर्षी शेतमजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. काही केल्या संकटे शेतकºयांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. या वर्षी शेती करणे कठीण होऊन बसले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे शेतकरी बबन वारघडे यांनी सांगितले.रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भातरोपांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाºया कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकांमधील रोपे करपण्याची शक्यता शेतकरी घनश्याम आळशी यांनी व्यक्त केली.वसईत पेरणी झालेल्या सर्व भागातही हीच समस्या उद्भवली आहे. पावसात रोपे टिकाव धरतात, मात्र मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागत आहे. अधूनमधून एखादी सर पडते. तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत.>शेतकºयांचे आर्थिकगणित बिघडणारवसई क्षेत्रावर भातरोपलागवड झाली आहे. सर्व क्षेत्रांत चांगली रोपे उगवली असून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पैसे मोजून बी-बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे मान्सून अधिक काळ लांबल्यास शेती व शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.