शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 00:28 IST

उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.

वाडा/पारोळ : जूनच्या पहिल्याच आठवड्यात निसर्ग चक्रीवादळासोबत झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले होते. सतत तीन दिवस पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, त्यानंतर जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकºयांना वाटत आहे. उगवलेल्या रोपाला पुरेसा पाऊस मिळत नसल्याने रोपाची वाढही खुंटली आहे. ही पिके कडक उन्हामुळे करपण्याची शक्यता आहे.वाडा तसेच वसई या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर शेतकºयांना बसलाच आहे. पण, कोरोनाच्या भीतीमुळे जव्हार, मोखाडा, तलासरी, नाशिक येथील शेतमजूरही येण्यास नकार देत आहेत. त्यामुळे या वर्षी शेतमजुरांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवणार असल्याचे दिसून येत आहे. काही केल्या संकटे शेतकºयांची पाठ सोडण्यास तयार नाहीत. या वर्षी शेती करणे कठीण होऊन बसले असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे शेतकरी बबन वारघडे यांनी सांगितले.रोहिणी, मृग नक्षत्रे संपली तरी मान्सून सक्रिय झालेला नाही. पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी पडून अंकुरलेल्या भातरोपांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसा पडणाºया कडक उन्हात पाण्याअभावी या रोपवाटिकांमधील रोपे करपण्याची शक्यता शेतकरी घनश्याम आळशी यांनी व्यक्त केली.वसईत पेरणी झालेल्या सर्व भागातही हीच समस्या उद्भवली आहे. पावसात रोपे टिकाव धरतात, मात्र मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सुरुवातीला पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळपेरणी केलेल्या भाताला अंकुर फुटले आहेत. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाला आणि कडक उन्हाचा सामना रोपांना करावा लागत आहे. अधूनमधून एखादी सर पडते. तेवढ्या आधारावर ही रोपे तग धरून उभी आहेत.>शेतकºयांचे आर्थिकगणित बिघडणारवसई क्षेत्रावर भातरोपलागवड झाली आहे. सर्व क्षेत्रांत चांगली रोपे उगवली असून दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पैसे मोजून बी-बियाणांची खरेदी केली आहे. त्यामुळे मान्सून अधिक काळ लांबल्यास शेती व शेतकºयांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.