शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

‘मी वसईकर अभियान’ : आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:08 IST

‘मी वसईकर अभियान’ : पालघर पोलिसांच्या प्रतिमेची मिरवणूक काढल्याचे प्रकरण

नालासोपारा : ११ कोटींच्या दफनभूमीच्या कामातील घोटाळ्याप्रकरणी महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करणाºया पोलिसांविरोधात शनिवारी संध्याकाळी पालघर पोलिसांच्या प्रतिमेची मिरवणूक काढणाºया ‘मी वसईकर अभियाना’च्या ३५ ते ४० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर माणिकपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात मनाई आदेश असतानाही मिरवणूक काढून आदेशाचा अपमान करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली.

‘मी वसईकर अभियाना’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात टाळ वाजत्रींच्या गजरात पालघर पोलिसांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून ‘पालघर पोलीस जिंदाबाद’, ‘एसपी साहेब की जय हो’, ‘अ‍ॅडिशनल साहेब झिंदाबाद’, ‘डीवायएसपी माता की जय हो’, ‘कांबळे बाबा की जय हो, माणिकपूर पोलीस ठाणे की जय हो’ अशा घोषणा दिल्या होत्या.जिल्हाधिकारी यांनी मनाई आदेश दिलेला असतानाही तसेच पोलीस निरीक्षकांनी मिरवणूक काढू नका, असा लेखी आदेश देऊनही या आदेशाची अवज्ञा करून जमाव जमवत मिलिंद खानोलकर, अशोक वर्मा, किसनदेव गुप्ता, अनिल चव्हाण, सुमित डोंगरे, देवेंद्र कुमार, हेमंत मतावणकर, सिंग, रश्मी राव आणि इतर २५ ते ३० जणांनी शनिवारी संध्याकाळी वसई पश्चिमेकडील पंचवटी नाका ते अंबाडी रोड-नवघर बस डेपो दरम्यान मिरवणूक काढली.घोटाळा नक्की कितीचा......सनसिटीमधील जमिनीवर दफनभूमीसाठी भरणी व संरक्षक भिंत बांधण्यासाठी महानगरपालिकेने साडे चार कोटीचे टेंडर काढले होते. त्यानुसार कंत्राटदाराने भरणी करून संरक्षक भिंत बांधली होती. पण हरित लवादाच्या आदेशानुसार ते बांधकाम पाडण्यात आले होते. कारवाई झाल्यामुळे साडे चार कोटींचे नुकसान झालेले असताना आंदोलनकर्त्यांकडून ११ कोटींचा चुराडा झाला असल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. नेमका हा घोटाळा कितीचा झाला आहे हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.जनतेच्या ११ कोटींचा झालेला अपव्यय यावर कसलीही करवाई न करता जनतेच्या हक्कासाठी लढणाºया आंदोलकांवर दबाव टाकण्याचे काम पालघर जिल्हा पोलिस करीत आहे. जोपर्यंत ११ कोटी खाणाºयांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असे कितीही गुन्हे दाखल करा आम्ही घाबरणार नाही. -अनिल चव्हाण (वकील आणि आंदोलनकर्ते)नेमके काय आहे प्रकरणच्वसई पश्चिमेकडील सनसिटी परिसरात सर्वधर्मीय स्मशानभूमी बांधताना ती जागा सीआरझेडमध्ये असल्याची स्पष्ट कल्पना महापालिकेतील सबंधितांना होती. कारण महानगरपालिकेकडे नगर रचना विभाग कार्यरत आहे. सीआरझेडबाबत योग्य परवानगी न घेतल्याने एनजीटीच्या आदेशाने ती स्मशान भूमी महापालिकेला तोडावी लागली होती. याव्यतिरिक्त अनेक तांत्रिक मुद्दे असल्याने महापालिकेने केलेली स्मशानभूमी वादग्रस्त व बेकायदेशीर ठरली.च्सर्वधर्मीय विशेषत: काही समाज बांधवांसाठी ती स्मशानभूमी असणे अत्यंत आवश्यक होते. बांधलेली स्मशानभूमी तोडावी लागल्याने ती बांधण्यासाठी खर्च केलेले वसईकर करदात्यांचे ११ कोटी रुपये वाया गेले आहे. ते पैसे करदात्यांच्या कष्टाचे असल्याने ते वसूल करणे आवश्यक होते. त्या बांधकामाला मंजुरी देणारे संबंधित नगरसेवक, सल्ला देणारे नगररचना विभागाचे संबंधित अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा व संगनमत करून जनतेच्या पैशाच्या अपव्ययास जबाबदार असल्याने व भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हे दाखल करावेत. या मागणीसाठी मी वसईकर अभियानाअंतर्गत दोषींना पाठीशी घालणाºया पालघर पोलिसांच्या विरोधात गेल्या १६ जुलैपासून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर