शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कासा परिसरामध्ये भातकापण्या रखडल्या; पावसाच्या लपंडावाने पारंपरिक शेती तोट्यात, घरच्या माणसांकडून शेतीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:13 AM

डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत.यंदा जून महिन्याच्या सुरूवातीपासून भातपिकासाठी पोषक असा पाऊस झाला होता. रोगराईही कमी त्यामुळे भातपीक चांगले असल्याने अधिक उत्पन्न मिळणार या आशेने बळीराजा सुखावला होता. मात्र, मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व वादळी पावसामुळे कापणीच्या हंगामात आलेले भातपीक शेतातच कोलमडून आडवी पडली आणि शेती सतत पाण्याने भरून राहिल्याने काही ठिकाणी कुजून गेली. सतत ओलाव्यामुळे उशिरा भारोपणी केलेल्या पिकांचे दाने पुन्हा उगवले. अशा स्थितीतही शेतीचे मोठे नुकसान झाले असतांनाही शेतक-यांनी थोडाफार खर्च वसूलीच्या हेतूने भातकापणीस सुरूवात केली.मात्र भातकापणीस मजूराच मिळत नाहीत. मजूरांच्या टंचाईमुळे मजूरांनी जास्त मजूरीची मागणी केली. वर्षभरापूर्वी २०० ते २५० रूपय व दुपारी एकवेळचे जेवणावर असलेले मजूर आता २५० ते ३०० रुपये मजूरीची मागणी करू लागलेत. त्यातही वाडा, भिवंडी, पालघर, वसई परिसरातील शेतकºयांनी दिवसभराच्या जेवणासह ३०० ते ३५० रू मजूरी देवून कासा, सायवन, गंजाड, तलवाडा भागातील मजूर कापणीस नेल्याने कासा परिसरात मजूरांची टंचाई झाली आहे. आधीच नुकसान त्यात भातशेतीची कापणी लांबणीवर गेल्याने शेतकºयांपुढे मोठा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काही शेतकºयांनी एक दोन मजूर हाताशी घेवून घरच्या मंडळीसह भातकापणी करत आहेत. तर ज्या ठिकाणी जास्तच नुकसान झाले आहे. तेथील भातशेती कापणी न करतातच शेतकºयांनी सोडून देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार