शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

नगरसेवक वाढले, परंतु विकास मात्र मंदावला

By admin | Updated: October 26, 2015 01:21 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा नगरसेवक व प्रभाग समित्यांमध्ये वाढ झाली.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. यंदा नगरसेवक व प्रभाग समित्यांमध्ये वाढ झाली. ८९ चे ११५ प्रभाग झाले, तर प्रभाग समित्या ५ च्या ९ झाल्या. परंतु, परिस्थितीत मात्र कोणताही बदल झाला नाही. साफसफाईची कामे वेळेवर होत नसल्यामुळे दुपारी दोन ते अडीचपर्यंत अनेक प्रभाग समित्यांच्या क्षेत्रात कचरा साचलेला दिसतो. साफसफाईच्या कामावर नियुक्त केलेले ठेकेदार ठरवून दिलेले कर्मचारी नेमत नसल्यामुळे साफसफाईची कामे पूर्वलक्षीप्रभावाने होत नाहीत. सदर बाब नवनिर्वाचित आयुक्त सतीश लोखंडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता कठोर कारवाईस सुरुवात केली आहे. वसई-विरार उपप्रदेशात महानगरपालिका निर्माण होऊन ६ वर्षांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीमध्ये प्रामुख्याने रस्ते व गटारे इ. विकासकामे पार पडली. पाणी, आरोग्य, शिक्षण या तीन क्षेत्रांत मात्र भरीव विकासकामे होऊ शकली नाही. वाढत्या लोकसंख्येच्या या क्षेत्राला पूर्णअंशाने पाणीपुरवठा करण्याकरिता अतिरिक्त धरणाची गरज आहे. महानगरपालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे, परंतु सुसरी व देहर्जे या दोन्ही पाणीपुरवठा प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो.वसई-विरार शहर महानगरपालिकेला कर्मचारी भरतीकरिता शासनाच्या नगरविकास खात्याने पदमंजुरी दिली आहे. परंतु, अद्याप ही पदे भरण्यास सुरुवात झालेली नाही. महानगरपालिकेत काम करणारा ८५ टक्के कर्मचारी हा ठेक्यावरील कामगार आहे. कुशल व अकुशल कामगार अशी वर्गवारी न करता सरसकट भरती केल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर होत असतो. शहर साफसफाईची कामे ठेकेदारांकडे सोपवण्यात आली आहेत. परंतु, हे ठेकेदार साफसफाईच्या कामावर ठरवून दिलेल्या संख्येने कामगार लावत नसल्यामुळे साफसफाईच्या कामाचा बोजवारा उडाला आहे. प्रशासकीय कामकाजासाठी ठेक्यावरीलच कर्मचारी नियुक्त करण्यात आल्यामुळे सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे.