शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

Coronavirus : दुबईवरून आलेले ‘ते’ सहा जण देखरेखीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:37 IST

दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

पालघर : पालघर शहरात दहा दिवसांपूर्वी दुबईवरून आलेल्या एकूण सहा नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य यंत्रणेला आज उशिराने यश आले असून त्यांची तपासणी करून त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये ताप, खोकला, सर्दीसारखी लक्षणे आढळली असून, त्यांच्या रक्ताचे नमुने उद्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. डॉ. पाटकर गल्लीत त्यातील एक व्यक्ती सापडल्यानंतर त्यांच्या तपासणीत कोरोनाबाबत कुठलीही लक्षणे आढळून आली नव्हती. त्यांच्या घरातील अन्य सर्व लोकांची तपासणी या वेळी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्या व्यक्तीसोबत अन्य ६ ते ७ लोक दुबईवरून पालघरमध्ये आल्याची माहिती कळल्यानंतर त्यांचा पत्ता माहीत नसल्याने त्यांचा शोध घेत त्यांच्या तपासणीचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले होते. शेवटी डॉ. सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने दुबईवरून आलेल्या अन्य पाच लोकांचा शोध घेण्यास यश मिळविले. त्यांच्या तपासणीदरम्यान त्यांच्यात ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आढळून आली असून त्यांच्या रक्ताचे नमुने ग्रामीण रुग्णालयात घेऊन ते तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना कोरोना विषाणूची लागण झाले की नाही हे नक्की होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.जिल्ह्यातून वाडा येथील दोन रुग्णांपैकी एका रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांच्यात कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नसल्याचा (निगेटिव्ह) अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकल्याची माहिती डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाpalgharपालघर