शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
3
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
4
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
5
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
6
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
7
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
8
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
9
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
10
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
11
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
12
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
13
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
14
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
15
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
16
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
17
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
18
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
19
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
20
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग

Coronavirus : दुबईवरून आलेले ‘ते’ सहा जण देखरेखीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:37 IST

दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

पालघर : पालघर शहरात दहा दिवसांपूर्वी दुबईवरून आलेल्या एकूण सहा नागरिकांचा शोध घेण्यात आरोग्य यंत्रणेला आज उशिराने यश आले असून त्यांची तपासणी करून त्यांना आपल्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये ताप, खोकला, सर्दीसारखी लक्षणे आढळली असून, त्यांच्या रक्ताचे नमुने उद्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.दहा दिवसांपूर्वी दुबई येथे फिरण्यासाठी गेलेले सहा पालघरवासीय नागरिक शहरात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेला समजताच डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक, सहाय्यक डॉक्टर यांच्या पथकाने शुक्रवारपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. डॉ. पाटकर गल्लीत त्यातील एक व्यक्ती सापडल्यानंतर त्यांच्या तपासणीत कोरोनाबाबत कुठलीही लक्षणे आढळून आली नव्हती. त्यांच्या घरातील अन्य सर्व लोकांची तपासणी या वेळी आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्या व्यक्तीसोबत अन्य ६ ते ७ लोक दुबईवरून पालघरमध्ये आल्याची माहिती कळल्यानंतर त्यांचा पत्ता माहीत नसल्याने त्यांचा शोध घेत त्यांच्या तपासणीचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहिले होते. शेवटी डॉ. सागर पाटील आणि त्यांच्या पथकाने दुबईवरून आलेल्या अन्य पाच लोकांचा शोध घेण्यास यश मिळविले. त्यांच्या तपासणीदरम्यान त्यांच्यात ताप, खोकला, सर्दी आदी लक्षणे आढळून आली असून त्यांच्या रक्ताचे नमुने ग्रामीण रुग्णालयात घेऊन ते तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना कोरोना विषाणूची लागण झाले की नाही हे नक्की होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.जिल्ह्यातून वाडा येथील दोन रुग्णांपैकी एका रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यांच्यात कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नसल्याचा (निगेटिव्ह) अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकल्याची माहिती डॉ.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवरून काम करीत असून डोळ्यात तेल घालून परदेशातून आलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे देशात आलेले परदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांनी याची माहिती न लपविता आरोग्य यंत्रणेला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाpalgharपालघर