शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

Coronavirus : ५० टक्के प्रवासी भरण्याचे आदेश, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:01 IST

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे.

- हितेन नाईकपालघर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसमध्ये फक्त ५० टक्केच प्रवासी घेण्याचे शासनाचे आदेश एस.टी. विभागाच्या आर्थिक उत्पनावर घाला घालणारे ठरणारे आहेत. आर्थिक उत्पनाच्या चक्रव्यूहात आधीच रुतलेले एसटीचे चाक या आदेशाने अधिक खोलवर रुतणार आहे. या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचे आव्हान आता पालघर परिवहन विभागासमोर उभे ठाकणार आहे.कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्याच्याशी अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने रेल्वे, मेट्रो, एसटी बसेस, खाजगी बसेस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे. एस.टी.मधील उभ्या असणाऱ्या प्रवाशांना आता एस.टी.मध्ये प्रवेश नाकारला जाणार असून क्षमतेपेक्षा अर्ध्या (फक्त २१) प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.पालघर परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ आगार असून या आगारांतून दररोज एस.टी. बसच्या ३ हजार ३७४ फेºयासह १ लाख ४३ हजार किमीचा प्रवास केला जात असून यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाखांचे उत्पन्न मिळत असते. पालघर आगारातून ६९२ फेºयाद्वारे दररोज २१ हजार १३८ किमीचा प्रवास पार केला जातो तर सफाळे आगराच्या ४२७ फेऱ्यांद्वारे ७ हजार ६७६ कि.मी., वसई आगराच्या ३५८ फेºयांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेºयांद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेºयांद्वारे १६ हजार ०.४०.६ किमी, जव्हारच्या ४५७ फेºयांद्वारे १९ हजार ६३६.३ कि.मी., बोईसर आगाराच्या ५५५ फेºयांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपाराच्या १४६ फेºयांद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा प्रवास पार पाडत एस.टी.चे चालक आणि वाहक एस.टी. विभागाला सुमारे ४५ लाखाचे उत्पन्न मिळवून देत आहेत.१० लाख रुपयांचा तोटापालघर जल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केल्याने एस.टी. बसने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांची मोठी संख्या घटली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस, लग्न समारंभ, राजकीय समारंभ, धार्मिक समारंभ, यात्रा रद्द करण्यात आल्याने प्रवासी घटले असून गुरुवारी पालघर विभागाला सुमारे १० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती एस.टी.चे विभागीय नियंत्रक आशीष चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी