शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

Coronavirus : ५० टक्के प्रवासी भरण्याचे आदेश, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:01 IST

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे.

- हितेन नाईकपालघर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसमध्ये फक्त ५० टक्केच प्रवासी घेण्याचे शासनाचे आदेश एस.टी. विभागाच्या आर्थिक उत्पनावर घाला घालणारे ठरणारे आहेत. आर्थिक उत्पनाच्या चक्रव्यूहात आधीच रुतलेले एसटीचे चाक या आदेशाने अधिक खोलवर रुतणार आहे. या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचे आव्हान आता पालघर परिवहन विभागासमोर उभे ठाकणार आहे.कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्याच्याशी अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने रेल्वे, मेट्रो, एसटी बसेस, खाजगी बसेस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे. एस.टी.मधील उभ्या असणाऱ्या प्रवाशांना आता एस.टी.मध्ये प्रवेश नाकारला जाणार असून क्षमतेपेक्षा अर्ध्या (फक्त २१) प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.पालघर परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ आगार असून या आगारांतून दररोज एस.टी. बसच्या ३ हजार ३७४ फेºयासह १ लाख ४३ हजार किमीचा प्रवास केला जात असून यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाखांचे उत्पन्न मिळत असते. पालघर आगारातून ६९२ फेºयाद्वारे दररोज २१ हजार १३८ किमीचा प्रवास पार केला जातो तर सफाळे आगराच्या ४२७ फेऱ्यांद्वारे ७ हजार ६७६ कि.मी., वसई आगराच्या ३५८ फेºयांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेºयांद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेºयांद्वारे १६ हजार ०.४०.६ किमी, जव्हारच्या ४५७ फेºयांद्वारे १९ हजार ६३६.३ कि.मी., बोईसर आगाराच्या ५५५ फेºयांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपाराच्या १४६ फेºयांद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा प्रवास पार पाडत एस.टी.चे चालक आणि वाहक एस.टी. विभागाला सुमारे ४५ लाखाचे उत्पन्न मिळवून देत आहेत.१० लाख रुपयांचा तोटापालघर जल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केल्याने एस.टी. बसने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांची मोठी संख्या घटली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस, लग्न समारंभ, राजकीय समारंभ, धार्मिक समारंभ, यात्रा रद्द करण्यात आल्याने प्रवासी घटले असून गुरुवारी पालघर विभागाला सुमारे १० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती एस.टी.चे विभागीय नियंत्रक आशीष चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी