शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ५० टक्के प्रवासी भरण्याचे आदेश, एसटीचे चाक आणखी आर्थिक गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 02:01 IST

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने एसटी बसेसमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे.

- हितेन नाईकपालघर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसमध्ये फक्त ५० टक्केच प्रवासी घेण्याचे शासनाचे आदेश एस.टी. विभागाच्या आर्थिक उत्पनावर घाला घालणारे ठरणारे आहेत. आर्थिक उत्पनाच्या चक्रव्यूहात आधीच रुतलेले एसटीचे चाक या आदेशाने अधिक खोलवर रुतणार आहे. या कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्याचे आव्हान आता पालघर परिवहन विभागासमोर उभे ठाकणार आहे.कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी त्याच्याशी अधिक जोमाने मुकाबला करण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळविणे अत्यावश्यक असल्याने रेल्वे, मेट्रो, एसटी बसेस, खाजगी बसेस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के प्रवासी बसविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी गुरुवारी पहाटेपासून सुरू झाली आहे. एस.टी.मधील उभ्या असणाऱ्या प्रवाशांना आता एस.टी.मध्ये प्रवेश नाकारला जाणार असून क्षमतेपेक्षा अर्ध्या (फक्त २१) प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे.पालघर परिवहन विभागांतर्गत पालघर, बोईसर, सफाळे, डहाणू, जव्हार, वसई, अर्नाळा, नालासोपारा असे एकूण ८ आगार असून या आगारांतून दररोज एस.टी. बसच्या ३ हजार ३७४ फेºयासह १ लाख ४३ हजार किमीचा प्रवास केला जात असून यातून पालघर विभागाला सुमारे ४५ लाखांचे उत्पन्न मिळत असते. पालघर आगारातून ६९२ फेºयाद्वारे दररोज २१ हजार १३८ किमीचा प्रवास पार केला जातो तर सफाळे आगराच्या ४२७ फेऱ्यांद्वारे ७ हजार ६७६ कि.मी., वसई आगराच्या ३५८ फेºयांद्वारे २० हजार १४५ किमी, अर्नाळा आगाराच्या २९८ फेºयांद्वारे २२ हजार ६५५.४ किमी, डहाणू आगाराच्या ४४५ फेºयांद्वारे १६ हजार ०.४०.६ किमी, जव्हारच्या ४५७ फेºयांद्वारे १९ हजार ६३६.३ कि.मी., बोईसर आगाराच्या ५५५ फेºयांद्वारे २२ हजार ०३८.२ किमी आणि नालासोपाराच्या १४६ फेºयांद्वारे १३ हजार ८८७ कि.मी.चा प्रवास पार पाडत एस.टी.चे चालक आणि वाहक एस.टी. विभागाला सुमारे ४५ लाखाचे उत्पन्न मिळवून देत आहेत.१० लाख रुपयांचा तोटापालघर जल्ह्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केल्याने एस.टी. बसने प्रवास करणाºया विद्यार्थ्यांची मोठी संख्या घटली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या बसेस, लग्न समारंभ, राजकीय समारंभ, धार्मिक समारंभ, यात्रा रद्द करण्यात आल्याने प्रवासी घटले असून गुरुवारी पालघर विभागाला सुमारे १० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती एस.टी.चे विभागीय नियंत्रक आशीष चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी