शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

CoronaVirus वसई-नालासोपाऱ्यात गर्भवती महिलेसह दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 06:10 IST

ज्येष्ठ नागरिकाने गमावले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कवसई/नालासोपारा : वसईमधील एका कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिकाचा तसेच एका गर्भवती महिलेचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली असून वसई-नालासोपारामध्ये तीन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे.नालासोपारा पूर्वेकडील एका ३८ वर्षीय गर्भवती महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या महिलेचा ४ एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच वसईतील कोरोनाग्रस्त ज्येष्ठ नागरिक रुग्णाचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. वसईच्या ओमनगर भागात वास्तव्यास असलेल्या या ६५ वर्षीय रुग्णावर पाच दिवसांपासून नालासोपारास्थित एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सोमवारी पहाटे त्यांचे निधन झाले. वसई-नालासोपारा परिसरात कोरोनाग्रस्त तीन रुग्णांचे बळी गेल्यामुळे आरोग्य यंत्रणा व पोलिसांच्या चिंतेत वाढ झाली आहे.सोमवारी मृत्यू पावलेला रुग्ण मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करीत होता. त्याचे मुंबईत डायलिसीसही सुरू होते, परंतु लॉकडाऊननंतर त्या रुग्णाने नालासोपारा येथे डायलिसीस करण्याचे ठरविले. मात्र खबरदारी म्हणून या रुग्णांची कोविड-१९ ची वैद्यकीय तपासणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर दोन दिवसांपूर्वी या रुग्णाची प्रकृती बिघडली आणि सोमवारी पहाटे या रुग्णाचा हॉस्पिटलमध्येच मृत्यू झाल्याची माहिती महापौरांनी दिली.पालकमंत्री दादा भुसेंनी घेतली आढावा बैठकवसई, विरार, नालासोपारा परिसरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी दुपारी आढावा बैठक घेतली. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात चार बळी गेल्यानंतर कोरोनाविषयी पहिलीच आढावा बैठक घेतली हे विशेष. या आढावा बैठकीदरम्यान त्यांनी वसई-विरार महापालिका प्रशासन व त्यांच्या आरोग्य यंत्रणेचे सर्व डॉक्टर व अधिकारीवर्ग यांची ही भेट घेऊन माहिती व उपाययोजना जाणून घेतल्या.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस