शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus News: नालासोपारात सामाजिक अंतराचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 1:01 AM

महानगरपालिकेची केवळ बघ्याची भूमिका : नागरिकांमध्ये बेफिकिरी कायम

नालासोपारा : मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने वसई-विरारमध्ये एन्ट्री घेत जनजीवन हादरवून सोडले आहे. रोजच्या रोज वाढणारे कोरोना रुग्णांचे आकडे पाहता राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचा परिणाम व्यवसाय आणि मानवी जीवनावर होत आहे. दुसरीकडे नालासोपारा-विरारमधील कोरोनाचा उद्रेक प्रचंड आहे, मात्र नागरिक कोरोनाला अजिबात गांभीर्याने वागत नसल्याने सामाजिक अंतराचे तीनतेरा उडत असून कोरोनाला आयतेच निमंत्रण मिळू लागले आहे.नालासोपारा पूर्व परिसरात तर सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते. येथे भरणाऱ्या बाजारात नागरिकांची होणारी गर्दी कोरोनाच्या उद्रेकाला कारणीभूत ठरू शकते.वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील कोरोनाची स्थिती भयंकर झाली असून गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार ४ हजार ४८२ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांचा आकडादेखील हळूहळू वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र तरीही बहुसंख्य नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने चिंता वाढली आहे.मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाला मज्जाव करण्यासाठी कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती. हळूहळू कोरोनाबाबतीतील भय नागरिकांमधून कमी होत गेल्याने कोरोनाला गांभीर्याने घेतले जात नाही. नालासोपाऱ्यात तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यासारखेच नागरिक वागत आहेत. नालासोपाऱ्यातील सध्याची स्थिती अत्यंत भयावह आहे. नालासोपारा-विरार ही दोन्ही शहर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली असताना नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाला निमंत्रण मिळत आहे.