शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

CoronaVirus News : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, जीवघेण्या आजाराचे नवीन रुग्ण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:49 IST

CoronaVirus News in Palghar district : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत.

पालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरीच्या काळात खूपच वाढला होता. अद्यापर्यंत एकूण बाधितांच्या संख्येने ४१ हजारांचा टप्पा पार केलेला आहे. कोरोनाचा सामाजिक संसर्ग होऊन बाधितांची संख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता होती, मात्र प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेने दिवस-रात्र मेहनत घेऊन या जीवघेण्या आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. यामुळे आता नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असून त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या जीवघेण्या आजारात १ हजार ४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यामध्ये वसई-विरार महानगरपालिका परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मुंबई-ठाणेच्या नजीक असलेल्या या महानगरातील लोक मुंबई-ठाणे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जात असल्याने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला हे उघड आहे.वसई-विरारमध्येच २६ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने मध्यंतरी चिंता व्यक्त होत होती, मात्र आता या परिसरातही बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरारमधील २५ हजार ६७० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. वसई-विरार परिसरात या आजारात ७५६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या वसई-विरारमध्ये केवळ ५६४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्याच वेळी एकूण रुग्णसंख्या आणि बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचेच दिसून येत आहे. अर्थात यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत खूपच महत्त्वाची आहे.महत्त्वाची आहे.

तलासरी कोरोनामुक्तपालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये शुक्रवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच या तालुक्यात एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. तालुक्यात एकूण २५५ रुग्ण बाधित आढळलेले होते. मात्र त्यापैकी २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील ४ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस