शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, जीवघेण्या आजाराचे नवीन रुग्ण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:49 IST

CoronaVirus News in Palghar district : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत.

पालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरीच्या काळात खूपच वाढला होता. अद्यापर्यंत एकूण बाधितांच्या संख्येने ४१ हजारांचा टप्पा पार केलेला आहे. कोरोनाचा सामाजिक संसर्ग होऊन बाधितांची संख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता होती, मात्र प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेने दिवस-रात्र मेहनत घेऊन या जीवघेण्या आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. यामुळे आता नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असून त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या जीवघेण्या आजारात १ हजार ४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यामध्ये वसई-विरार महानगरपालिका परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मुंबई-ठाणेच्या नजीक असलेल्या या महानगरातील लोक मुंबई-ठाणे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जात असल्याने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला हे उघड आहे.वसई-विरारमध्येच २६ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने मध्यंतरी चिंता व्यक्त होत होती, मात्र आता या परिसरातही बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरारमधील २५ हजार ६७० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. वसई-विरार परिसरात या आजारात ७५६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या वसई-विरारमध्ये केवळ ५६४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्याच वेळी एकूण रुग्णसंख्या आणि बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचेच दिसून येत आहे. अर्थात यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत खूपच महत्त्वाची आहे.महत्त्वाची आहे.

तलासरी कोरोनामुक्तपालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये शुक्रवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच या तालुक्यात एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. तालुक्यात एकूण २५५ रुग्ण बाधित आढळलेले होते. मात्र त्यापैकी २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील ४ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस