शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

CoronaVirus News : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात, जीवघेण्या आजाराचे नवीन रुग्ण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 23:49 IST

CoronaVirus News in Palghar district : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत.

पालघर : वसई-विरारसह पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरीच्या काळात खूपच वाढला होता. अद्यापर्यंत एकूण बाधितांच्या संख्येने ४१ हजारांचा टप्पा पार केलेला आहे. कोरोनाचा सामाजिक संसर्ग होऊन बाधितांची संख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता होती, मात्र प्रशासकीय यंत्रणेसह आरोग्य यंत्रणेने दिवस-रात्र मेहनत घेऊन या जीवघेण्या आजारावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले आहे. यामुळे आता नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण खूपच कमी झालेले असून त्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ४१ हजार ३७५ वर पोहोचली आहे, मात्र त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे यातील ३९ हजार४४५ रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे या जीवघेण्या आजारात १ हजार ४३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यामध्ये वसई-विरार महानगरपालिका परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मुंबई-ठाणेच्या नजीक असलेल्या या महानगरातील लोक मुंबई-ठाणे येथे मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी जात असल्याने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला हे उघड आहे.वसई-विरारमध्येच २६ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आल्याने मध्यंतरी चिंता व्यक्त होत होती, मात्र आता या परिसरातही बरे होऊन घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरारमधील २५ हजार ६७० रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. वसई-विरार परिसरात या आजारात ७५६ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या वसई-विरारमध्ये केवळ ५६४ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्याच वेळी एकूण रुग्णसंख्या आणि बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचेच दिसून येत आहे. अर्थात यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने घेतलेली मेहनत खूपच महत्त्वाची आहे.महत्त्वाची आहे.

तलासरी कोरोनामुक्तपालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यामध्ये शुक्रवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तसेच या तालुक्यात एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नाही. तालुक्यात एकूण २५५ रुग्ण बाधित आढळलेले होते. मात्र त्यापैकी २५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यातील ४ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस