शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 17:01 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: पालघर जिल्ह्यातील वसई रोड शहरांमधून उत्तरप्रदेश मधील गोरखपूर येथे जाणारी पहिली लांब पल्ल्याची विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री 4 वाजता सोडण्यात आली.

आशिष राणे

वसई - संपूर्ण जगात व देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक व लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत कामगार- मजुरांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारच्या पश्चिम रेल्वे प्रशासनाने पालघर जिल्ह्यातील वसई रोड रेल्वे स्थानकातून उत्तरप्रदेश राज्याच्या गोरखपूर शहरासाठी (0957) पहिली विशेष रेल्वे गाडी शनिवारी रात्री उशिरा 4 वाजता रवाना झाल्याची माहिती वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांनी लोकमतला दिली.

शनिवारी मध्यरात्री रवाना झालेली ही गाडी महाराष्ट्र राज्यासह गुजरात, मध्यप्रदेश ,राजस्थान आणि उत्तरप्रदेश अशा चार राज्यांतून जाणार आहे तसेच ही गाडी साधारण 4 मे रोजी दुपारी 2 वाजता गोरखपूर स्थानकात पोहचेल.  टाळेबंदीच्या काळात पालघर जिल्ह्यांच्या विविध भागात खास करून वसई व नालासोपारात मजूर व कामगार वर्ग अडकून पडले होते. दरम्यान 22 डब्यांच्या या विशेष गाडीत एकूण 1200 प्रवासी असून या प्रवासासाठी 740 रुपये तिकीट आकारण्यात आले आहे. तर लॉकडाऊन नंतर जिल्हयात व वसई- नालासोपारात अडकलेल्या कामगार व मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी पालघर जिल्ह्यातून वसई स्थानकातून शनिवारी सुटलेली ही पहिलीच रेल्वे गाडी असल्याने या स्थलांतरीत कामगार व मजुरांनी सरकार स्थानिक प्रशासनाचे विशेष आभार ही मानले.

पालघर जिल्हा व स्थानिक पोलीस व महापालिका प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

वसईतून सुटणाऱ्या या गाडीसाठी विशेष व्यवस्था म्हणून पालघर जिल्हा तथा वसई महसूल विभाग आणि वसई विरार महापालिका व माणिकपूर पोलीस यांच्या कडून शनिवारी संध्याकाळ पासूनच चोख बंदोबस्त व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली होती. या गाडीतून स्थलांतरित केले जाणारे मजूर व कामगार यांना प्रथम विविध भागातून नवघर एस टी स्थानकात आणण्यात आले व सोशल डिस्टंसिंग पाळून त्यांची प्रथम आरोग्य तापसाणीची देखील चोख व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी या मजुरांना सोबत प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर,चेहऱ्यावर मास्क, प्रसंगी जेवण पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली होती. वसई रोड स्टेशनचे रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस  व सोबत वसई विरार मनपा, वसई महसूल चे तहसीलदार व माणिकपूर पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्याकडे अजून काही नोंदी होत आहेत आतापर्यंत 32 हजार स्थलांतरित कामगार व मजुरांच्या  नोंदी झाल्या आहेत, केंद्र व राज्य सरकारचे पुढील आदेश येतील त्यानुसार आमचे नियोजन सुरू आहे. रेल्वेचे काही आदेश आले की तशी व्यवस्था आम्ही पुन्हा करू शनिवारी सुद्धा गोरखपूरसाठी 1200  कामगार रात्री ४ वाजता रेल्वे गाडी सुटून हे रवाना झाले आहेत.

- स्वप्नील तांगडेवसई प्रांताधिकारी ,वसई उपविभाग

 

महत्त्वाच्या बातम्या

भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या

CoronaVirus News : 'असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद'; अखिलेश यादव यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र

बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये लपून-छपून भेटणं पडलं महागात, 'त्या' दोघांना गावकऱ्यांनी पाहिलं अन्...

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरारIndian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस