शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:00 IST

वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत.

 - प्रतीक ठाकूर विरार : वसई-विरारचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २०० हून जास्त झाला आहे. मात्र, हा आकडा मुंबईत दररोज कामावर जाणाऱ्या लोकांमुळे वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. त्यामुळे रोज मुंबईला कामावर जाणाºया लोकांची मुंबईतच राहण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.वसई तालुक्यात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन होत आहे, पण असे असतानाही बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून याचे कारण मुंबईला कामावर जाणाºया व्यक्ती अथवा त्यांच्या संपर्कात येणाºया लोकांची संख्या लक्षणीय आहे.वसई-विरारच्या शहर आणि ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईतील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहेत, तर अत्यावश्यक सेवेत मोडणाºया क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अनेक जणांना रोज मुंबईला कामाला कामावर जावे लागते. बँक, हॉटेल, रुग्णालय, बेस्ट, पोलीस दल आणि इतर शासकीय कर्मचारी यांचा यात समावेश असून रोज हे लोक मुंबईला ये-जा करतात.पण, सध्या मुंबई ही कोरोना महामारीचे केंद्र असल्यामुळे आणि अनेक यापैकी थेट रुग्णाच्या संपर्कात असणारी कामे करत असल्यामुळे अनेक जण बाधित होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या परिवारातील लोकांनाही कोरोनाची बाधा होत आहे.त्यामुळे वसई-विरारमध्ये मुंबईमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अलीकडेच महापौर प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनाला पत्र लिहून ज्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउन काळात मुंबईत कामासाठी जावे लागते, अशा कर्मचाºयांची सोय मुंबईतच करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या महामारीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यात येईल.या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाबंदी केली आहे, पण अशा पद्धतीने दोन जिल्ह्यांत ये-जा सुरू राहिली, तर ही महामारी पसरणारच. वसई-विरार महापालिकेनेही बाहेरून येणाºया त्यांच्या कर्मचाºयांची राहण्याची सोय वसई-विरारमध्येच केली आहे. तशी सोय मुंबई महापालिकेनेही केली पाहिजे.- रोहन राऊत, स्थानिक रहिवासीआता शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक देशांनी त्यांचे जे कर्मचारी फ्रंट लाइनवर काम करत आहेत, त्यांना घरी जाण्यास मनाई केली असून त्यांची सोय कामावरच्या ठिकाणीच केली आहे. त्यामुळे त्यांचे परिवार सुरक्षित राहतील.- विनय साठे, स्थानिक रहिवासी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMumbaiमुंबई