शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:00 IST

वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत.

 - प्रतीक ठाकूर विरार : वसई-विरारचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २०० हून जास्त झाला आहे. मात्र, हा आकडा मुंबईत दररोज कामावर जाणाऱ्या लोकांमुळे वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. त्यामुळे रोज मुंबईला कामावर जाणाºया लोकांची मुंबईतच राहण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.वसई तालुक्यात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन होत आहे, पण असे असतानाही बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून याचे कारण मुंबईला कामावर जाणाºया व्यक्ती अथवा त्यांच्या संपर्कात येणाºया लोकांची संख्या लक्षणीय आहे.वसई-विरारच्या शहर आणि ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईतील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहेत, तर अत्यावश्यक सेवेत मोडणाºया क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अनेक जणांना रोज मुंबईला कामाला कामावर जावे लागते. बँक, हॉटेल, रुग्णालय, बेस्ट, पोलीस दल आणि इतर शासकीय कर्मचारी यांचा यात समावेश असून रोज हे लोक मुंबईला ये-जा करतात.पण, सध्या मुंबई ही कोरोना महामारीचे केंद्र असल्यामुळे आणि अनेक यापैकी थेट रुग्णाच्या संपर्कात असणारी कामे करत असल्यामुळे अनेक जण बाधित होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या परिवारातील लोकांनाही कोरोनाची बाधा होत आहे.त्यामुळे वसई-विरारमध्ये मुंबईमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अलीकडेच महापौर प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनाला पत्र लिहून ज्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउन काळात मुंबईत कामासाठी जावे लागते, अशा कर्मचाºयांची सोय मुंबईतच करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या महामारीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यात येईल.या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाबंदी केली आहे, पण अशा पद्धतीने दोन जिल्ह्यांत ये-जा सुरू राहिली, तर ही महामारी पसरणारच. वसई-विरार महापालिकेनेही बाहेरून येणाºया त्यांच्या कर्मचाºयांची राहण्याची सोय वसई-विरारमध्येच केली आहे. तशी सोय मुंबई महापालिकेनेही केली पाहिजे.- रोहन राऊत, स्थानिक रहिवासीआता शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक देशांनी त्यांचे जे कर्मचारी फ्रंट लाइनवर काम करत आहेत, त्यांना घरी जाण्यास मनाई केली असून त्यांची सोय कामावरच्या ठिकाणीच केली आहे. त्यामुळे त्यांचे परिवार सुरक्षित राहतील.- विनय साठे, स्थानिक रहिवासी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMumbaiमुंबई