शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मुंबई वाढवतेय वसईतील कोरोनाचा रुग्णांचा आकडा? बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 03:00 IST

वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत.

 - प्रतीक ठाकूर विरार : वसई-विरारचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा २०० हून जास्त झाला आहे. मात्र, हा आकडा मुंबईत दररोज कामावर जाणाऱ्या लोकांमुळे वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. वसई-विरारमध्ये सापडलेले बहुसंख्य रुग्ण हे मुंबईमध्ये कामावर जाणारे असून त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याने सध्या या भागातील अनेक कुटुंबे कोरोनाबाधित ठरलेली आहेत. त्यामुळे रोज मुंबईला कामावर जाणाºया लोकांची मुंबईतच राहण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.वसई तालुक्यात लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन होत आहे, पण असे असतानाही बाधित रुग्णांचा आकडा वाढत असून याचे कारण मुंबईला कामावर जाणाºया व्यक्ती अथवा त्यांच्या संपर्कात येणाºया लोकांची संख्या लक्षणीय आहे.वसई-विरारच्या शहर आणि ग्रामीण भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईतील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करीत आहेत, तर अत्यावश्यक सेवेत मोडणाºया क्षेत्रात काम करीत असल्यामुळे अनेक जणांना रोज मुंबईला कामाला कामावर जावे लागते. बँक, हॉटेल, रुग्णालय, बेस्ट, पोलीस दल आणि इतर शासकीय कर्मचारी यांचा यात समावेश असून रोज हे लोक मुंबईला ये-जा करतात.पण, सध्या मुंबई ही कोरोना महामारीचे केंद्र असल्यामुळे आणि अनेक यापैकी थेट रुग्णाच्या संपर्कात असणारी कामे करत असल्यामुळे अनेक जण बाधित होत आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या परिवारातील लोकांनाही कोरोनाची बाधा होत आहे.त्यामुळे वसई-विरारमध्ये मुंबईमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे अलीकडेच महापौर प्रवीण शेट्टी यांनी प्रशासनाला पत्र लिहून ज्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउन काळात मुंबईत कामासाठी जावे लागते, अशा कर्मचाºयांची सोय मुंबईतच करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून या महामारीच्या प्रसारावर नियंत्रण आणण्यात येईल.या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाबंदी केली आहे, पण अशा पद्धतीने दोन जिल्ह्यांत ये-जा सुरू राहिली, तर ही महामारी पसरणारच. वसई-विरार महापालिकेनेही बाहेरून येणाºया त्यांच्या कर्मचाºयांची राहण्याची सोय वसई-विरारमध्येच केली आहे. तशी सोय मुंबई महापालिकेनेही केली पाहिजे.- रोहन राऊत, स्थानिक रहिवासीआता शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक देशांनी त्यांचे जे कर्मचारी फ्रंट लाइनवर काम करत आहेत, त्यांना घरी जाण्यास मनाई केली असून त्यांची सोय कामावरच्या ठिकाणीच केली आहे. त्यामुळे त्यांचे परिवार सुरक्षित राहतील.- विनय साठे, स्थानिक रहिवासी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारMumbaiमुंबई