शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
4
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
5
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
6
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
7
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
9
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
10
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
11
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
12
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
13
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
15
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
16
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ
17
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
18
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
19
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
20
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा

Coronavirus : लॉकडाऊनचा मालवाहतूकदारांना फटका, ट्रक चालकांनी गाडीमध्येच मांडली चूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 16:56 IST

Coronavirus : देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली

वसई - देशभरात वाहतुकीचे लहान-मोठे ट्रक विविध ठिकाणी लॉकडाऊनच्या आदेशामुळे राष्ट्रीय महामार्गावर "जैसे थे" स्थितीत उभे आहेत. महामार्गावर आजूबाजूला कुठल्याही प्रकारची खाण्यापिण्याची सोय नसल्याने आज हजारो ट्रकचालक व क्लिनरचे मात्र हाल सुरू असल्याचे चित्र सध्या वसईच्या मुंबई-अहमदाबाद स्थित चिंचोटी महामार्गावर आढळून आले आहे. विशेष म्हणजे आता या उभ्या असलेल्या वाहतूक ट्रक चालकांनी आपलं सामान ट्रकमधील मागील बाजूस गाडीत ठेवलं असून तिथे आपली जेवणाची चूल देखील मांडली आहे.

देशात लॉकडाऊन झाल्यावर महामार्गावरून विविध राज्यातील प्रवास करणारे ट्रक व त्यांची वाहतूक महामार्ग पोलिसांनी 'जैसे थे"थांबवली आणि या सर्वांनी मिळेल त्या ठिकाणी आपले मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला किंवा खुल्या जागेवर व बहुतांश पेट्रोल पंप ठिकाणी उभे केले.परिणामी लॉकडाऊननंतर ट्रक उभे करून आठ दिवस झाले आहेत. सर्वत्र महामार्ग असल्याने जवळ काहीच मिळत नाही. आजूबाजूची दुकानं, हॉटेल व इतर अत्यावश्यक बाबी ही बंद असल्याने ट्रक चालकांच्या खाण्यापिण्याचे हाल  झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे

ट्रक चालकांकडचे पैसे ही संपले असल्याने काहींचे तर जेवणाचे देखील हाल झाले आहेत. तर काहींनी ज्यांच्या जवळ ट्रकमध्ये स्टो व भांडी आहेत त्यांनी रेशन आणून गाडीतच चूल मांडून तिथे आपला संसार थाटला आहे. याउलट ज्यांच्याकडे काहीच नाही त्या ट्रक चालकांना आजूबाजूला असणाऱ्या गावातून जेवण, नाश्ता व पाणी पुरवत आहे. तर काहींजवळ असलेल्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने किंवा जवळ पैसे नसल्याने दूरवर असलेल्या घरच्यांना फोन ही करू शकत नाही.

बाहेर पडले तर पोलीस मारतात तर पूर्ण दिवस गाडीत बसून व थोडे फार ट्रक भोवती फिरून हे सामान्य ट्रक चालक आज कधी उपाशी पोटी तर मिळाले तर मिळाले जेवण असे काहीसे दिवस काढत आहेत. या संदर्भात बबली गुप्ता यांनी सांगितले, की आज आमच्याकडे पैसे नाही, पुढचे अनेक दिवस काढायचे आहेत. बिहारला पोचायचं आहे आम्ही यातून काय मार्ग काढणार अशी आर्त हाक मारत या वाहनचालकांनी त्यांची व्यथा मांडली.

सरकारने ट्रक चालकांना मदत केली पाहिजे !

नेहमीच सरकारला योग्य सहकार्य करा, दिलेल्या सर्व आदेशाचे पालन करा वाहतूक एकजूट अशीच ठेवा, असे संघटनेकडून सांगितले जाते. त्यामुळे वाहतूकदार हा देशाचा कणा आहे त्यामुळे आलेल्या कोरोना संकटाचा ते अशा प्रकारे सामना करत आहेत त्यामुळे सरकारने ही त्यांची योग्य काळजी घ्यावी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार