शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

Coronavirus: हृदयद्रावक! जन्मताच कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 11:55 IST

Coronavirus in Maharashtra: गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला.

- हुसेन मेमन जव्हार -  लहान बालकांसाठी पालघर जिल्ह्यात आरोग्य सुविधा नसल्याने करोना लागण झालेल्या व उपचारासाठी वणवण फरफट केलेल्या पालघरमधील नवजात बाळाचा नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान करुण अंत झाला. गेले सहा दिवस हे बाळ मरणाशी झुंज देत होते. मात्र त्याची ही झुंज अपयशी ठरली आहे. शनिवारी सकाळी पाचच्या सुमारास या नवजात बालकाचा मृत्यू झाला.

प्रथम त्याला पालघरहून जव्हारच्या कुटीर रुग्णालयात  दाखल करण्यात आले होते, तेथे त्याच्यावर 24 तास उपचार सुरू होता, मात्र मुदतपूर्व प्रसूती, बाळाचे वजन कमी त्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याने दिवसेंदिवस बाळाची  प्रकृती खालावत गेली, त्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

 पालघर तालुक्यातील सफाळे  दारशेत येथील राहणाऱ्या अश्विनी काटेला यांनी सहा दिवसांपूर्वी पालघर शहरातील  एका खाजगी दवाखान्यात नवजात बाळाला जन्म दिला. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते म्हणून त्याला पालघरच्या एका दुसऱ्या दवाखान्यात उपचारासाठी हलविले गेले. तेथे बाळाची अँटीजन टेस्ट केल्यानंतर बाळ पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

 मात्र मातेची टेस्ट निगेटिव्ह आली होती. बाळाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे बालकांसाठी सुविधा नसल्याने तसेच करोना लागण झालेल्या बालकांसाठी जिल्हा प्रशासनाने कोणतीही आरोग्य सुविधा उभारली नसल्याने बाळाला उपचारासाठी फरफट करावी लागली. 

 उपचार सुरू असताना अखेर शनिवारी पहाटे 5 च्या दरम्यान बाळाने शेवटचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. या नवजात बाळाला 6 दिवसाच्या जीवन मरणाच्या झुंजात उपचारअभावी अखेर हार पतकारावी लागली हेही तितकेच खर आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसVasai Virarवसई विरारDeathमृत्यू