शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Coronavirus : कोरोनामुळे तारापूरच्या उद्योगांचे कंबरडे मोडणार, उद्योग ठप्प होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 00:54 IST

आधीच मंदीचे सावट असताना आता जगामध्ये थैमान घालून भारतातही पसरलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूच्या संकटामुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.

- पंकज राऊतबोईसर : पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विविध प्रकारच्या कारवाईच्या टांगती तलवारीबरोबरच आधीच मंदीचे सावट असताना आता जगामध्ये थैमान घालून भारतातही पसरलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूच्या संकटामुळे तारापूरच्या बहुसंख्य उद्योगांचे अक्षरश: कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट लांबल्यास हजारो कोटींच्या नुकसानीबरोबरच कंत्राटी कामगारांची अवस्था दयनीय होऊन एकूणच त्याचा उत्पादनावर गंभीर परिणाम होऊन आर्थिक स्थिती कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योग प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई व इतर अनेक कारणे व समस्यांमुळे अनिश्चितता व अस्थिरतेत असतानाच कोरोना हा विषाणू देशात येऊन धडकल्याने आता चहूबाजूने आलेल्या संकटाला तोंड कसे द्यायचे, या विवंचनेत येथील उद्योजक असून उद्योगांची चाके अधिक रुतून विकासाची गती मंद होण्याची शक्यता आहे. देशावर येऊ घातलेल्या संभाव्य संकटाला समर्थपणे तोंड देऊन ते परतवण्याचे तारापूरच्या उद्योजकांच्या संघटनेने (टीमा) उद्योजकांना आवाहन केले आहे.तारापूर येथे रासायनिक, औषधे, स्टील टेक्स्टाईल असे लहान, मध्यम व मोठे मिळून सुमारे साडेअकराशे उद्योग असून त्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, अधिकारी आणि उद्योगांची जोडधंदा व्यवसायाशी संबंधित असे डायरेक्ट व इनडायरेक्ट मिळून अडीच ते तीन लाखापर्यंत लोकांचा रोजगार अवलंबून आहे.उत्पादन करणाºया कारखान्यात ‘वर्कफ्रॉम होम’ शक्य नाही तसेच मुळातच कमीत कमी अथवा आवश्यक तितकेच कामगार, सुपरवायझर व इतर स्टाफचा वापर करून सध्या सर्वत्र काम केले जात असतानाच निम्म्या कामगारांच्या उपस्थितीत उत्पादन घेणे अशक्य तर आहेच, त्यातच धोकादायक रासायनिक कारखान्यात मुळातच कमी असलेली कामगार कपात करून उत्पादन घेणे हे सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी टाळायची असेल तर धोका पत्करून उद्योग सुरू ठेवण्यापेक्षा ते तात्पुरते बंद ठेवणे हा एकमेव पर्याय असून त्यामुळे उद्योगांबरोबरच कामगारांनाही आर्थिक संकटाशी सामना करावा लागणार आहे, परंतु राष्ट्रीय हित व सर्वांच्या आरोग्याला असलेला धोका पाहता सर्व संकटाला समर्थपणे तोंड देणे गरजेचे आहे.तारापूर एमआयडीसीमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी हे ठाणे, मुंबई, वसई, विरार, पालघर, डहाणूपासून ते वापी येथून येत असतात.कोरोनामुळे जगभरातील उद्योगाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. खरे तर इतर देशातील जनता भारतात घेतल्या जाणाºया दक्षतेचे कौतुक करीत आहे. आपणही शासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. मोठे संकट टाळण्यासाठी उद्योगांनी सर्वतोपरी काळजी घ्यावी.- डी.के.राऊत, अध्यक्ष,तारापूर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्था