शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Corona Vaccination : पालघर जिल्ह्यात फक्त 3,59,966 लसीकरण; सर्वाधिक वसई-विरारमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 09:30 IST

Corona Vaccination : वसई-विरारसह पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त असून आजवर झालेले हे लसीकरण खूपच कमी आहे.

पालघर : पालघर जिल्ह्यात आजवर ३ लाख ५९ हजार ९६६ जणांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा मागणी होत आहे. जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये २८ हजार ०३५, जव्हार ९ हजार ८१९, मोखाडा ३ हजार ४२९, पालघर ९० हजार ५५६, तलासरी ४ हजार ६०९, वसई ग्रामीण २३ हजार ९७९, विक्रमगड ७ हजार ४०, वाडा २१ हजार ८८०, तर वसई-विरार १ लाख ७० हजार ६१९ जणांचे लसीकरण झालेले आहे.वसई-विरारसह पालघर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त असून आजवर झालेले हे लसीकरण खूपच कमी आहे. जिल्ह्यात आजवर सर्वाधिक लसीकरण वसई-विरारमध्ये झालेले आहे, परंतु महापालिका क्षेत्रातील लोकसंख्याही मोठी असल्याने लसीकरणाची टक्केवारी खूपच कमी असल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात वसई-विरारनंतर पालघर तालुक्यात रुग्णसंख्या जास्त आढळलेली आहे. आता कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात आरोग्य यंत्रणा कमालीची यशस्वी ठरत असताना त्याच वेळी होत असलेल्या लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी लसीकरण झालेले चार तालुके असून जव्हार, मोखाडा, तलासरी आणि विक्रमगड या चार तालुक्यांनी १० हजारचाही टप्पा ओलांडलेला नाही. मध्यंतरी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अफवा पसरल्याचेही बोलले जात होते. त्यामुळेही जव्हार, मोखाडा, तलासरी आणि विक्रमगड या तालुक्यांतील ग्रामीण भागात लसीकरण कमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पालघर जिल्ह्यामध्ये आजवर आरोग्य विभागातील २६ हजार ३९४ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस, तर १७ हजार ३१६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.फ्रंटलाईन वर्करपैकी २८ हजार ४८५ जणांनी पहिला डोस, तर ११ हजार ५९७ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. १८ ते ४५ वयोगटातील १८ हजार २१७ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील १ लाख २७ हजार ५९१ जणांनी पहिला डोस आणि ९ हजार १२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ६० वर्षांवरील ९४ हजार ६७० जणांनी पहिला डास तर २६ हजार ६८४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसpalgharपालघरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस