शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

वसई-विरारमध्ये कोरोनाने 10 दिवसांत 50 मृत्युमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:51 IST

चिंता वाढली : बाधितांसह मरण पावणाऱ्यांचा वाढतोय ग्राफ 

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर/वसई : जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट महापालिका हद्दीमध्ये कहर माजवत असून गेल्या १० दिवसांत तब्बल ७ हजार २७८ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीसह कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा वाढता ग्राफ आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारा ठरला आहे.वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी ८७९ नवीन रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. त्याआधी ११ एप्रिल रोजी ७५४ नवीन रुग्ण आढळले होते, तर २४१ जण बरे होऊन घरी परतले होते. १२ एप्रिल रोजी ४९२ नवीन रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. ३१४ जणांनी कोरोनावर मात केली होती. १३ एप्रिल रोजी ७०६ नवीन रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. २६६ जण बरे झाले होते. १४ एप्रिल रोजी ६४१ जण बाधित झाले होते, तर ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. १५ एप्रिल रोजी ५९८ नवीन रुग्ण आढळले होते. या दिवशी एकही रुग्ण दगावला नव्हता. ३४८ जणांनी कोरोनावर मात केली होती. १६ एप्रिल रोजी ७८४ नवीन रुग्ण आढळले होते, तर ७ जणांचा मृत्यू झाला होता. ३६७ जण बरे झाले होते. १७ एप्रिल रोजी ८१४ जण बाधित ठरले होते, तर ८ जणांनी आपले प्राण गमावले होते. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ९०८ रुग्ण नवीन आढळले होते, तर ९ जणांचा मृत्यू झाला होता. ३५२ जणांनी कोरोनावर मात केली होती. १९ एप्रिल रोजी ७०८ नवीन रुग्ण आढळले होते, तर ८ जणांना आपले जीव गमवावे लागले होते आणि ४४२ जण बरे होऊन घरी परतले होते. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या दहा दिवसांतील ही वाढती आकडेवारी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी ठरली आहे.

११ एप्रिलपासून ३,०१४ जणांची कोरोनावर मात गेल्या दहा दिवसांत एकीकडे ६ हजार ३९९ रुग्ण आढळलेले असताना दुसरीकडे मात्र ३ हजार १४ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, वसई-विरार परिसरात वाढत असलेले नवीन रुग्ण आणि मृत्यूचा ग्राफ पाहता नियम पाळणाऱ्या नागरिकांची मात्र चिंता वाढली आहे.

आकडेवारी चिंताजनक महापालिकेने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतील हे आकडे आहेत. मृतांच्या आकडेवारीत लवपाछपवी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले हे आकडे चिंताजनक आहेत.

यंत्रणेवर वाढला ताणगेल्या १० दिवसांत महानगरपालिका हद्दीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा सुद्धा उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची चिंता वाढली आहे.