शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारमध्ये कोरोनाने 10 दिवसांत 50 मृत्युमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:51 IST

चिंता वाढली : बाधितांसह मरण पावणाऱ्यांचा वाढतोय ग्राफ 

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर/वसई : जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट महापालिका हद्दीमध्ये कहर माजवत असून गेल्या १० दिवसांत तब्बल ७ हजार २७८ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीसह कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा वाढता ग्राफ आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारा ठरला आहे.वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी ८७९ नवीन रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. त्याआधी ११ एप्रिल रोजी ७५४ नवीन रुग्ण आढळले होते, तर २४१ जण बरे होऊन घरी परतले होते. १२ एप्रिल रोजी ४९२ नवीन रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. ३१४ जणांनी कोरोनावर मात केली होती. १३ एप्रिल रोजी ७०६ नवीन रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. २६६ जण बरे झाले होते. १४ एप्रिल रोजी ६४१ जण बाधित झाले होते, तर ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. १५ एप्रिल रोजी ५९८ नवीन रुग्ण आढळले होते. या दिवशी एकही रुग्ण दगावला नव्हता. ३४८ जणांनी कोरोनावर मात केली होती. १६ एप्रिल रोजी ७८४ नवीन रुग्ण आढळले होते, तर ७ जणांचा मृत्यू झाला होता. ३६७ जण बरे झाले होते. १७ एप्रिल रोजी ८१४ जण बाधित ठरले होते, तर ८ जणांनी आपले प्राण गमावले होते. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ९०८ रुग्ण नवीन आढळले होते, तर ९ जणांचा मृत्यू झाला होता. ३५२ जणांनी कोरोनावर मात केली होती. १९ एप्रिल रोजी ७०८ नवीन रुग्ण आढळले होते, तर ८ जणांना आपले जीव गमवावे लागले होते आणि ४४२ जण बरे होऊन घरी परतले होते. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या दहा दिवसांतील ही वाढती आकडेवारी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी ठरली आहे.

११ एप्रिलपासून ३,०१४ जणांची कोरोनावर मात गेल्या दहा दिवसांत एकीकडे ६ हजार ३९९ रुग्ण आढळलेले असताना दुसरीकडे मात्र ३ हजार १४ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, वसई-विरार परिसरात वाढत असलेले नवीन रुग्ण आणि मृत्यूचा ग्राफ पाहता नियम पाळणाऱ्या नागरिकांची मात्र चिंता वाढली आहे.

आकडेवारी चिंताजनक महापालिकेने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतील हे आकडे आहेत. मृतांच्या आकडेवारीत लवपाछपवी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले हे आकडे चिंताजनक आहेत.

यंत्रणेवर वाढला ताणगेल्या १० दिवसांत महानगरपालिका हद्दीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा सुद्धा उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची चिंता वाढली आहे.