शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

वसई-विरारमध्ये कोरोनाने 10 दिवसांत 50 मृत्युमुखी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:51 IST

चिंता वाढली : बाधितांसह मरण पावणाऱ्यांचा वाढतोय ग्राफ 

लोकमत न्यूज नेटवर्क पालघर/वसई : जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरारमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात  वाढत आहेत. कोरोनाची ही दुसरी लाट महापालिका हद्दीमध्ये कहर माजवत असून गेल्या १० दिवसांत तब्बल ७ हजार २७८ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ५० जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीसह कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा वाढता ग्राफ आरोग्य यंत्रणेची झोप उडवणारा ठरला आहे.वसई-विरार महापालिका हद्दीत मंगळवारी ८७९ नवीन रुग्ण आढळले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४३२ रुग्ण बरे झाले आहेत. त्याआधी ११ एप्रिल रोजी ७५४ नवीन रुग्ण आढळले होते, तर २४१ जण बरे होऊन घरी परतले होते. १२ एप्रिल रोजी ४९२ नवीन रुग्ण आढळले, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. ३१४ जणांनी कोरोनावर मात केली होती. १३ एप्रिल रोजी ७०६ नवीन रुग्ण, तर तीन जणांचा मृत्यू झाला होता. २६६ जण बरे झाले होते. १४ एप्रिल रोजी ६४१ जण बाधित झाले होते, तर ८ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. १५ एप्रिल रोजी ५९८ नवीन रुग्ण आढळले होते. या दिवशी एकही रुग्ण दगावला नव्हता. ३४८ जणांनी कोरोनावर मात केली होती. १६ एप्रिल रोजी ७८४ नवीन रुग्ण आढळले होते, तर ७ जणांचा मृत्यू झाला होता. ३६७ जण बरे झाले होते. १७ एप्रिल रोजी ८१४ जण बाधित ठरले होते, तर ८ जणांनी आपले प्राण गमावले होते. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ९०८ रुग्ण नवीन आढळले होते, तर ९ जणांचा मृत्यू झाला होता. ३५२ जणांनी कोरोनावर मात केली होती. १९ एप्रिल रोजी ७०८ नवीन रुग्ण आढळले होते, तर ८ जणांना आपले जीव गमवावे लागले होते आणि ४४२ जण बरे होऊन घरी परतले होते. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या दहा दिवसांतील ही वाढती आकडेवारी आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवणारी ठरली आहे.

११ एप्रिलपासून ३,०१४ जणांची कोरोनावर मात गेल्या दहा दिवसांत एकीकडे ६ हजार ३९९ रुग्ण आढळलेले असताना दुसरीकडे मात्र ३ हजार १४ जणांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. दरम्यान, वसई-विरार परिसरात वाढत असलेले नवीन रुग्ण आणि मृत्यूचा ग्राफ पाहता नियम पाळणाऱ्या नागरिकांची मात्र चिंता वाढली आहे.

आकडेवारी चिंताजनक महापालिकेने अधिकृतपणे प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतील हे आकडे आहेत. मृतांच्या आकडेवारीत लवपाछपवी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेले हे आकडे चिंताजनक आहेत.

यंत्रणेवर वाढला ताणगेल्या १० दिवसांत महानगरपालिका हद्दीत वाढत असलेल्या रुग्णसंख्येने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. अनेक रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा सुद्धा उपलब्ध होत नसल्याने नातेवाइकांची चिंता वाढली आहे.