शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका, भाजीपाल्याचे भाव गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 01:32 IST

कोरोनामुळे दादर येथील फूल बाजारही बंद केल्याने फूल शेतकरी अडचणीत सापडला असून फूल नाशिवंत असल्याने त्यांचे करायचे काय प्रश्न फूल शेतक-यांपुढे आहे.

पारोळ : कोरोना व्हायरसमुळे वसई, विरार, नालासोपारा या भागातील गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडे बाजार बंद केल्यामुळे आपण पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणेच भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आल्याने आता कोरोनाचा फटका बळीराजा ही बसला आहे.वसई तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात फूलशेती होत असल्याने आणि कोरोनामुळे दादर येथील फूल बाजारही बंद केल्याने फूल शेतकरी अडचणीत सापडला असून फूल नाशिवंत असल्याने त्यांचे करायचे काय प्रश्न फूल शेतक-यांपुढे आहे. तालुक्यात पावसाळी भातशेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिर्ची, कारली, वांगी, काकडी, पीक शेतकरी घेतात जर भाजीला भाव चांगला असेल तर फायदा शेतक-यांना होतो. पण या वर्षी भात शेती वाया गेल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली. बी बियाणे, खते, औषधे व मजुरी महाग व या वर्षी ढगाळ हवामान यामुळे शेतीच्या खर्चात वाढ झाली. गेल्या वर्षी टोमॅटो या पिकाला भाव चांगला मिळाल्याने शेतक-यांना फायदा झाल्याने, आडणे, भाताणे, उसगाव, शिरवली, कळभोंण इ. गावात टोमॅटो व इतर भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. पण आडणे गावात रोज दहा हजार किलोच्या वर रोज टोमॅटो निघतो, पण या वर्षी टोमॅटो पीक तयार होताच कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव झाल्याने परदेशात जाणारा माल बंद करण्यात आला. त्यामुळे टोमॅटो दर कमी झाला. तरी पण स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्याने कमी दराने पण भाजी पीक विकले जात होते. आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व आठवडे बाजार बंद केल्याने आता हातात आलेल्या भाजी पिकांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे.टोमॅटो पीक तयार झाले असून मागील वर्षी २५ किलोला ५०० रुपयांच्या वर दर होता. पण या वर्षी दर कमी असतानाही टोमॅटोला कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या मालाचे करायचे काय?- उमेश पाटील, शेतकरी, आडणेफूल बाजार बंद असल्याने राहिलेल्या फुलांचा कोणताही उपयोग होत नसल्याने फूल शेतकºयांचे मोठे नुकसान होते, असे असतानाही या भागातील शेतकरी आत्महत्यासारखे पाऊल उचलत नसून कोरोनापासून लढण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत आहोत.- सुभाष भट्टे, फूल शेतकरी, वसइ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेतीVasai Virarवसई विरार