शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
4
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
5
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
6
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
7
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
8
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
9
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
10
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
11
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
12
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
13
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
14
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
15
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
16
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
17
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
18
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
19
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
20
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका, भाजीपाल्याचे भाव गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 01:32 IST

कोरोनामुळे दादर येथील फूल बाजारही बंद केल्याने फूल शेतकरी अडचणीत सापडला असून फूल नाशिवंत असल्याने त्यांचे करायचे काय प्रश्न फूल शेतक-यांपुढे आहे.

पारोळ : कोरोना व्हायरसमुळे वसई, विरार, नालासोपारा या भागातील गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडे बाजार बंद केल्यामुळे आपण पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणेच भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आल्याने आता कोरोनाचा फटका बळीराजा ही बसला आहे.वसई तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात फूलशेती होत असल्याने आणि कोरोनामुळे दादर येथील फूल बाजारही बंद केल्याने फूल शेतकरी अडचणीत सापडला असून फूल नाशिवंत असल्याने त्यांचे करायचे काय प्रश्न फूल शेतक-यांपुढे आहे. तालुक्यात पावसाळी भातशेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिर्ची, कारली, वांगी, काकडी, पीक शेतकरी घेतात जर भाजीला भाव चांगला असेल तर फायदा शेतक-यांना होतो. पण या वर्षी भात शेती वाया गेल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली. बी बियाणे, खते, औषधे व मजुरी महाग व या वर्षी ढगाळ हवामान यामुळे शेतीच्या खर्चात वाढ झाली. गेल्या वर्षी टोमॅटो या पिकाला भाव चांगला मिळाल्याने शेतक-यांना फायदा झाल्याने, आडणे, भाताणे, उसगाव, शिरवली, कळभोंण इ. गावात टोमॅटो व इतर भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. पण आडणे गावात रोज दहा हजार किलोच्या वर रोज टोमॅटो निघतो, पण या वर्षी टोमॅटो पीक तयार होताच कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव झाल्याने परदेशात जाणारा माल बंद करण्यात आला. त्यामुळे टोमॅटो दर कमी झाला. तरी पण स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्याने कमी दराने पण भाजी पीक विकले जात होते. आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व आठवडे बाजार बंद केल्याने आता हातात आलेल्या भाजी पिकांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे.टोमॅटो पीक तयार झाले असून मागील वर्षी २५ किलोला ५०० रुपयांच्या वर दर होता. पण या वर्षी दर कमी असतानाही टोमॅटोला कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या मालाचे करायचे काय?- उमेश पाटील, शेतकरी, आडणेफूल बाजार बंद असल्याने राहिलेल्या फुलांचा कोणताही उपयोग होत नसल्याने फूल शेतकºयांचे मोठे नुकसान होते, असे असतानाही या भागातील शेतकरी आत्महत्यासारखे पाऊल उचलत नसून कोरोनापासून लढण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत आहोत.- सुभाष भट्टे, फूल शेतकरी, वसइ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेतीVasai Virarवसई विरार