शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

शेतकऱ्यांना कोरोनाचा फटका, भाजीपाल्याचे भाव गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 01:32 IST

कोरोनामुळे दादर येथील फूल बाजारही बंद केल्याने फूल शेतकरी अडचणीत सापडला असून फूल नाशिवंत असल्याने त्यांचे करायचे काय प्रश्न फूल शेतक-यांपुढे आहे.

पारोळ : कोरोना व्हायरसमुळे वसई, विरार, नालासोपारा या भागातील गर्दीला आळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व तालुक्यातील आठवडे बाजार बंद केल्यामुळे आपण पिकवलेला भाजीपाला विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव कमी झाल्याने आता पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणेच भाजीपाला फेकून देण्याची वेळ शेतकºयांवर आल्याने आता कोरोनाचा फटका बळीराजा ही बसला आहे.वसई तालुक्यातील पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणात फूलशेती होत असल्याने आणि कोरोनामुळे दादर येथील फूल बाजारही बंद केल्याने फूल शेतकरी अडचणीत सापडला असून फूल नाशिवंत असल्याने त्यांचे करायचे काय प्रश्न फूल शेतक-यांपुढे आहे. तालुक्यात पावसाळी भातशेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिर्ची, कारली, वांगी, काकडी, पीक शेतकरी घेतात जर भाजीला भाव चांगला असेल तर फायदा शेतक-यांना होतो. पण या वर्षी भात शेती वाया गेल्याने भाजी पिकातून काही हाती येईल या आशेवर शेतकरी वर्गाने या वर्षी मोठा खर्च करून भाजीपाल्याची लागवड केली. बी बियाणे, खते, औषधे व मजुरी महाग व या वर्षी ढगाळ हवामान यामुळे शेतीच्या खर्चात वाढ झाली. गेल्या वर्षी टोमॅटो या पिकाला भाव चांगला मिळाल्याने शेतक-यांना फायदा झाल्याने, आडणे, भाताणे, उसगाव, शिरवली, कळभोंण इ. गावात टोमॅटो व इतर भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली. पण आडणे गावात रोज दहा हजार किलोच्या वर रोज टोमॅटो निघतो, पण या वर्षी टोमॅटो पीक तयार होताच कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव झाल्याने परदेशात जाणारा माल बंद करण्यात आला. त्यामुळे टोमॅटो दर कमी झाला. तरी पण स्थानिक बाजारपेठ उपलब्ध असल्याने कमी दराने पण भाजी पीक विकले जात होते. आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व आठवडे बाजार बंद केल्याने आता हातात आलेल्या भाजी पिकांचे करायचे काय, हा प्रश्न त्याच्यासमोर आहे.टोमॅटो पीक तयार झाले असून मागील वर्षी २५ किलोला ५०० रुपयांच्या वर दर होता. पण या वर्षी दर कमी असतानाही टोमॅटोला कोरोनामुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या मालाचे करायचे काय?- उमेश पाटील, शेतकरी, आडणेफूल बाजार बंद असल्याने राहिलेल्या फुलांचा कोणताही उपयोग होत नसल्याने फूल शेतकºयांचे मोठे नुकसान होते, असे असतानाही या भागातील शेतकरी आत्महत्यासारखे पाऊल उचलत नसून कोरोनापासून लढण्यासाठी आम्ही प्रशासनासोबत आहोत.- सुभाष भट्टे, फूल शेतकरी, वसइ 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेतीVasai Virarवसई विरार