शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा केला अवमान? जिल्हाधिकारी, जि. प.चे सीओ, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी दोषी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:07 IST

हरित लवादाने नवापूरसह लगतच्या समुद्र व खाडी किनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशाचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पालघरचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीच्या संबंधित व जबाबदार अधिका-यांना वकिलामार्फत हरित लवादाचा अवमान केल्याची नोटीस ३१ मे रोजी बजावली आहे.

बोईसर - हरित लवादाने नवापूरसह लगतच्या समुद्र व खाडी किनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशाचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पालघरचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीच्या संबंधित व जबाबदार अधिका-यांना वकिलामार्फत हरित लवादाचा अवमान केल्याची नोटीस ३१ मे रोजी बजावली आहे.तारापूर एमआयडीसी मधून समुद्रात व इतर नाल्यावाटे खाडीत व समुद्रात जाणारे रासायनिक प्रदूषित सांडपाणी आणि पर्यावरणाच्या झालेल्या प्रचंड ºहासामुळे मच्छीमारांना व नागरिकांना प्रदूषणाचा प्रचंड होणारा त्रास त्यांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि त्या अनुषंगाने त्यांचे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये लवादाने दि. ९ सप्टें. २०१६ रोजी अंतरिम आदेश दिला होता त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पालघरच्या उपजिल्हाधिकारी यांच्यावर सोपविलेली होती परंतु फारशी अंमलबजावणी झाली नसल्याचे व त्यामुळे लवादाचा अवमान झाला असे अ. भा. मां.स.परिषदेचे म्हणणे आहे . त्यावर आता हे अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी हरित लवादाने हे दिले होते आदेशसमुद्रात सोडण्यात येणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे पर्यावरणाच्या दृष्टीने व प्रदूषण नियंत्रण मंडळाने विहीत केलेल्या प्रमाणात प्रक्रिया करून शुद्ध केलेले असावे.पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आरोग्य खाते, तहसिलदार, महिला बालकल्याण आणि मत्स्य विभाग इत्यादी विभागाच्या अधिकाºयांची एक संयुक्त कमिटी स्थापन करून तिने प्रदूषण बाधित गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पर्यावरणाचा झालेला ºहास आणि मच्छिमारांच्या आरोग्यावर झालेले दुष्परीणाम या बाबत अहवाल सादर करावा.सर्व उद्योगांचा होणारा सांडपाण्याचा निचरा ४० टक्के कमी करावा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसीच्या अधिकाºयांनी ४० टक्के पाणी कपात होते कां यावर लक्ष ठेवावे.कंपन्यातून होणारा प्रदूषित रासायनिक सांडपाण्याचा निचरा ठरविलेल्या मार्गानेच व्हावा, अन्यत्र होता कामा नये असे आढळल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा च्या अधिकाºयांनी संबंधीत उद्योगावर कठोर कारवाई करावी असे अनेक निर्देश दिले होते परंतु दुर्दैवाने त्याची फारशी अंमलबजावणी संबंधीत अधिकाºयांसह उद्योगांनीही न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेच्या पदाधिकाºयांनी काही अधिकाºयांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि लेखी तक्र ारीही केल्या परंतु फारसा प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी ९ एप्रिल २०१८ रोजी जिल्हाधिकारी, पालघर यांना इमेलद्वारे भेटीसाठी वेळ देण्याची विनंती केली परंतु काहीही हालचाल झाली नाही. अखेर अ. भा. मा. स. परिषदेने वकिल मिनाझ काकलीया यांच्या द्वारे लवादाच्या अवमानाची नोटिस दि. ३१ मे २०१८ रोजी पाठविली असून आता तरी न्याय मिळेल या प्रतीक्षेत परिषद आहे.पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून किनारपट्टी भागातील मच्छिमारांच्या आरोग्याशी खेळणाºया सर्व यंत्रणे विरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने मच्छिमारांच्या हितासाठी हा लढा शेवट पर्यंत लढण्याचा निश्चय केलेलाअसून आम्ही या लढ्यात निश्चितपणे यशस्वी होऊ याची खात्री आहे- नरेंद्र नाईक , याचिकाकर्ते वमाजी सरचिटणीस, अखिल भारतीयमांगेला समाज परिषद

टॅग्स :newsबातम्याVasai Virarवसई विरार