शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

प्रायोगिक तत्त्वावर वाळूचे बंधारे उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:16 IST

पहिला पायलट प्रोजेक्ट केळवे येथे; ४९ दगडी बंधाऱ्यांना न्यायालयाची स्थगिती

- हितेन नाईकपालघर : राज्यातील मंजूर झालेल्या ४९ दगडी बंधाऱ्यांना न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश निघाल्याने केंद्र शासनाने मच्छीमारांच्या घरांना धडकणाºया लाटांना थोपवून धरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाळूचे बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून केळवे येथे बंधारा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत होणाºया वाढीमुळे किनाºयावरील घरांना निर्माण झालेला धोका पाहता राज्य शासनाने राज्यातील समुद्र किनारपट्टीवर ४९ गावांना दगडी बंधारे बांधण्यास २०१६ - १७ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, गरज नसताना राजकीय लाभ उठविण्यासाठी किनाºयावर होणाºया बंधाºयाच्या उभारणीमुळे समुद्रातून होणारे रेतीचे वाहन थांबून ठिकठिकाणी रेतीचे सॅण्डबार तयार होऊ लागले. या दगडी बंधाºयामुळे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन आजूबाजूच्या भागातील किनाºयाची धूप होऊ लागल्याने ‘वनशक्ती’ या पर्यावरण रक्षणासाठी काम करणाºया संस्थेने हरित लवादात याचिका दाखल केल्याने राज्यातील ४९ बंधाºयाच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सातपाटी, कळंब, अर्नाळा, आशापुरा, एडवन, तारापूर, नवापूर, गुंगवाडा, तडीयाळे, दांडेपाडा (चिंचणी) अशा मंजुरी मिळालेल्या १० बंधाºयांच्या उभारणीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. दोन वर्षांपासून बंधारे उभारणीची कामे बंद असल्याने किनारपट्टीवरील घरांना समुद्राच्या महाकाय लाटा धडकू लागल्याने लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.जिल्ह्यातील बंधारे उभारणी बंद झाल्याने लोकांच्या जीवितास निर्माण झालेल्या धोक्याबाबत शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांनी लोकसभेत आवाज उठविल्यानंतर केंद्र शासनाने केळवे येथे ६०० मीटर्सच्या बंधाºयासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. हा वाळूचा बंधारा उभारणीचा पायलट प्रोजेक्ट हा प्रयोग राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे पतन विभागाचे अभियंते चोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सीआरझेडच्या नॉर्मप्रमाणे किनाºयापासून काही अंतरावर किनाºयावरील जमलेल्या वाळूचा वापर करून जिओ बॅगमध्ये भरून एक वाळूच्या पोत्यांची भिंत तयार करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे त्या भिंतीच्या पुढे समुद्राच्या दिशेने आणखी एक वाळूच्या पोत्यांची भिंत उभारली जाणार आहे.समुद्राच्या जवळील उभारलेल्या भिंतीमुळे लाटांचे आक्रमण थोपवले जाणार आहे. त्यामुळे दोन भिंतींच्यामध्ये असणाºया जागेत वाळू साचून एक बीच तयार होणार असून केळवे पर्यटन स्थळाला भेट देणाºया पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरणार असल्याचा दावा ठेकेदार निमित गोहेल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.