शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

प्रायोगिक तत्त्वावर वाळूचे बंधारे उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 23:16 IST

पहिला पायलट प्रोजेक्ट केळवे येथे; ४९ दगडी बंधाऱ्यांना न्यायालयाची स्थगिती

- हितेन नाईकपालघर : राज्यातील मंजूर झालेल्या ४९ दगडी बंधाऱ्यांना न्यायालयाकडून स्थगितीचे आदेश निघाल्याने केंद्र शासनाने मच्छीमारांच्या घरांना धडकणाºया लाटांना थोपवून धरण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाळूचे बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून केळवे येथे बंधारा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.समुद्राच्या पाण्याच्या पातळीत सतत होणाºया वाढीमुळे किनाºयावरील घरांना निर्माण झालेला धोका पाहता राज्य शासनाने राज्यातील समुद्र किनारपट्टीवर ४९ गावांना दगडी बंधारे बांधण्यास २०१६ - १७ मध्ये मंजुरी दिली होती. मात्र, गरज नसताना राजकीय लाभ उठविण्यासाठी किनाºयावर होणाºया बंधाºयाच्या उभारणीमुळे समुद्रातून होणारे रेतीचे वाहन थांबून ठिकठिकाणी रेतीचे सॅण्डबार तयार होऊ लागले. या दगडी बंधाºयामुळे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन आजूबाजूच्या भागातील किनाºयाची धूप होऊ लागल्याने ‘वनशक्ती’ या पर्यावरण रक्षणासाठी काम करणाºया संस्थेने हरित लवादात याचिका दाखल केल्याने राज्यातील ४९ बंधाºयाच्या कामांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सातपाटी, कळंब, अर्नाळा, आशापुरा, एडवन, तारापूर, नवापूर, गुंगवाडा, तडीयाळे, दांडेपाडा (चिंचणी) अशा मंजुरी मिळालेल्या १० बंधाºयांच्या उभारणीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. दोन वर्षांपासून बंधारे उभारणीची कामे बंद असल्याने किनारपट्टीवरील घरांना समुद्राच्या महाकाय लाटा धडकू लागल्याने लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.जिल्ह्यातील बंधारे उभारणी बंद झाल्याने लोकांच्या जीवितास निर्माण झालेल्या धोक्याबाबत शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांनी लोकसभेत आवाज उठविल्यानंतर केंद्र शासनाने केळवे येथे ६०० मीटर्सच्या बंधाºयासाठी २ कोटी रुपयांची मंजुरी दिली होती. हा वाळूचा बंधारा उभारणीचा पायलट प्रोजेक्ट हा प्रयोग राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे पतन विभागाचे अभियंते चोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सीआरझेडच्या नॉर्मप्रमाणे किनाºयापासून काही अंतरावर किनाºयावरील जमलेल्या वाळूचा वापर करून जिओ बॅगमध्ये भरून एक वाळूच्या पोत्यांची भिंत तयार करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे त्या भिंतीच्या पुढे समुद्राच्या दिशेने आणखी एक वाळूच्या पोत्यांची भिंत उभारली जाणार आहे.समुद्राच्या जवळील उभारलेल्या भिंतीमुळे लाटांचे आक्रमण थोपवले जाणार आहे. त्यामुळे दोन भिंतींच्यामध्ये असणाºया जागेत वाळू साचून एक बीच तयार होणार असून केळवे पर्यटन स्थळाला भेट देणाºया पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरणार असल्याचा दावा ठेकेदार निमित गोहेल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.