शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
3
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
4
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
5
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
6
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
7
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
8
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
9
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
10
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
11
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
12
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
13
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
14
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
15
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
16
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
17
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
18
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
19
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
20
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
Daily Top 2Weekly Top 5

सातपाटीचा धूप प्रतिबंधक बंधारा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 05:23 IST

‘वायू’ चक्रीवादळ : दगड लाटांच्या माऱ्यांनी उखडून निघून फेकले गेले

हितेंन नाईक 

पालघर : ‘वायू’ चक्रीवादळाच्या फटकाºयाने निर्माण झालेल्या महाकाय लाटांनी रौद्ररूप धारण करीत सातपाटी गावाचा धूप प्रतिबंधक बंधारा ओलांडायला सुरुवात केल्याने किनाºयावर राहणाºया लोकांच्या मनात धडकी भरायला सुरुवात झाली आहे.

सातपाटीच्या पश्चिमेकडील समुद्रातून निर्माण झालेल्या लाटा किनाºयावरील घरांना धडकू लागल्यानंतर किनाºयालगत २०१२ मध्ये १५०० मीटर्स बंधारा बांधण्यात आला होता. कालपरत्वे या बंधाºयातील दगड लाटांच्या माऱ्यांनी उखडून निघून बाहेर फेकले गेले होते. त्यामुळे या बंधाºयाला ठिकठिकाणी भगदाडे पडून मागील अनेक वर्षांपासून गावात पाणी शिरायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतीनी नव्याने बंधारा बांधण्याच्या मागणीवरून सातपाटी येथे नव्याने ४२५ मीटरचा बंधारा मंजूर झाला होता. परंतु हा बंधारा हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेमुळे आणि सीआरझेडच्या कचाट्यात सापडला होता.मागील दोन वर्षांपासून सातपाटीमधील घरात समुद्राचे पाणी शिरू लागल्याने शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या शिरलेल्या पाण्यामुळे गावातील घरांना मोठा धोका निर्माण झाल्याने खासदार राजेंद्र गविताच्या प्रयत्नासह ग्रामपंचायत, सहकारी संस्थानी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. लोकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाल्याने न्यायालयाने या बंधाºयाच्या बांधणी संदर्भात काही नियमावलीत शिथिलता आणण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाºयांनी राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ मधील ३० (२) व कलम ७२ मधील तरतुदींच्या त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत बंधाºयाच्या पुनर्बांधणीचे आदेश काढण्यात यश मिळविले.समुद्राच्या महाकाय लाटांचा मारा सहन करता यावा यासाठी बंधाºयांत सुमारे ५०० ते १००० किलोचे दगड वापरण्यात येत असल्याचेही पतन विभागाचे सहाय्यक अभियंता एन.यु.चौरे यांनी सांगितले. सध्या ५०० मीटर्सच्या बंधाºयाचे काम पूर्ण होत असून फोकलँडच्या सहाय्याने इतरत्र विखुरलेले दगड बंधाºयाला पडलेल्या भगदाडात टाकून गावात शिरणारे समुद्राचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.८० मीटर लांबीच्या वाढीव बंधाºयाला मान्यतासध्या ४२० मीटर लांबीच्या आणि ५ कोटी किमतीच्या बंधाºयाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने त्याचे काम सुरू असून अन्य १ कोटी किमतीच्या आणि ८० मीटर लांबीच्या वाढीव बंधाºयालाही मान्यता मिळाल्याची माहिती पतन विभागाचे सहाय्यक अभियंता एन.यु.चौरे यांनी लोकमतला सांगितले. एकूण १ हजार ३०० मीटर्सच्या बंधाºयांची मागणी करण्यात आली असून समुद्रसपाटीपासून ८ मीटर्सची उंची राहणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर