शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

सातपाटीचा धूप प्रतिबंधक बंधारा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 05:23 IST

‘वायू’ चक्रीवादळ : दगड लाटांच्या माऱ्यांनी उखडून निघून फेकले गेले

हितेंन नाईक 

पालघर : ‘वायू’ चक्रीवादळाच्या फटकाºयाने निर्माण झालेल्या महाकाय लाटांनी रौद्ररूप धारण करीत सातपाटी गावाचा धूप प्रतिबंधक बंधारा ओलांडायला सुरुवात केल्याने किनाºयावर राहणाºया लोकांच्या मनात धडकी भरायला सुरुवात झाली आहे.

सातपाटीच्या पश्चिमेकडील समुद्रातून निर्माण झालेल्या लाटा किनाºयावरील घरांना धडकू लागल्यानंतर किनाºयालगत २०१२ मध्ये १५०० मीटर्स बंधारा बांधण्यात आला होता. कालपरत्वे या बंधाºयातील दगड लाटांच्या माऱ्यांनी उखडून निघून बाहेर फेकले गेले होते. त्यामुळे या बंधाºयाला ठिकठिकाणी भगदाडे पडून मागील अनेक वर्षांपासून गावात पाणी शिरायला सुरुवात झाली होती. त्यामुळे सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतीनी नव्याने बंधारा बांधण्याच्या मागणीवरून सातपाटी येथे नव्याने ४२५ मीटरचा बंधारा मंजूर झाला होता. परंतु हा बंधारा हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेमुळे आणि सीआरझेडच्या कचाट्यात सापडला होता.मागील दोन वर्षांपासून सातपाटीमधील घरात समुद्राचे पाणी शिरू लागल्याने शेकडो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या शिरलेल्या पाण्यामुळे गावातील घरांना मोठा धोका निर्माण झाल्याने खासदार राजेंद्र गविताच्या प्रयत्नासह ग्रामपंचायत, सहकारी संस्थानी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. लोकांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाल्याने न्यायालयाने या बंधाºयाच्या बांधणी संदर्भात काही नियमावलीत शिथिलता आणण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकाºयांनी राष्ट्रीय आपत्ती कायदा २००५ मधील ३० (२) व कलम ७२ मधील तरतुदींच्या त्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करीत बंधाºयाच्या पुनर्बांधणीचे आदेश काढण्यात यश मिळविले.समुद्राच्या महाकाय लाटांचा मारा सहन करता यावा यासाठी बंधाºयांत सुमारे ५०० ते १००० किलोचे दगड वापरण्यात येत असल्याचेही पतन विभागाचे सहाय्यक अभियंता एन.यु.चौरे यांनी सांगितले. सध्या ५०० मीटर्सच्या बंधाºयाचे काम पूर्ण होत असून फोकलँडच्या सहाय्याने इतरत्र विखुरलेले दगड बंधाºयाला पडलेल्या भगदाडात टाकून गावात शिरणारे समुद्राचे पाणी रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.८० मीटर लांबीच्या वाढीव बंधाºयाला मान्यतासध्या ४२० मीटर लांबीच्या आणि ५ कोटी किमतीच्या बंधाºयाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने त्याचे काम सुरू असून अन्य १ कोटी किमतीच्या आणि ८० मीटर लांबीच्या वाढीव बंधाºयालाही मान्यता मिळाल्याची माहिती पतन विभागाचे सहाय्यक अभियंता एन.यु.चौरे यांनी लोकमतला सांगितले. एकूण १ हजार ३०० मीटर्सच्या बंधाºयांची मागणी करण्यात आली असून समुद्रसपाटीपासून ८ मीटर्सची उंची राहणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर