शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

तरखडच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पडली फूट; काँग्रेस आघाडी संपुष्टात, बविआचे दोन सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 02:09 IST

तरखड व आक्टण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली असून एका गटाने शिवसेना आणि जनआंदोलनाची कास धरली आहे. त्यामुळे अधिकृत काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत.

- शशी करपे ।तरखड व आक्टण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली असून एका गटाने शिवसेना आणि जनआंदोलनाची कास धरली आहे. त्यामुळे अधिकृत काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. या गोंधळात सत्ताधारी जनआंदोलन समिती आणि कांँग्रेस आघाडी संपुष्टात आली असून बहुजन विकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांना धक्का बसला आहे.तरखड व आॅक्टण ग्रामपंचायतीच्या ९ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने सात जागांसाठी येत्या २६ सप्टेंबरला निवडणुका होत आहेत. बहुजन विकास आघाडीने दोन जागा बिनविरोध जिंकून बाजी मारली असतानाच काँग्रेसची मात्र अडचण झाली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव बिपीन कुटीन्हो यांनी जनआंदोलन समिती व शिवसेनेशी हातमिळवणी करीत स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. या पॅनलने सरपंचासह सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कुटीन्हो यांनी कांँग्रेसी असलेल्यांनाच निवडणुकीत उतरवले आहे. विशेष म्हणजे सध्या प्रचारात स्व. मायकल फुर्ट्याडो यांच्या फोटोचाही त्यांनी वापर केला आहे. तसेच काँग्रेस जनआंदोलन व शिवसेना पुरस्कृत उमेदवार असाच प्रचार त्यांनी सुरु ठेवला आहे.दुसरीकडे, कुटीन्हो यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. काँग्रेसनेही आपल्या प्रचारात स्व. मायकल फुर्ट्याडो यांच्या फोटोचा वापर केला आहे. दोन्ही गट कांँग्रेसच्या नावावरच मते मागत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.दरम्यान, मावळत्या ग्रामपंचायतीत काँग्रेस आणि जनआंदोलन युतीची सत्ता आहे. मात्र, अधिकृत काँग्रेस स्वतंत्र निवडणुक लढवत आहे. कुटीन्हो गट काँग्रेस पुरस्कृत असल्याचा दावा करीत असला तरी काँग्रेसने अधिकृतपणे तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी जनआंदोलन आणि काँग्रेस आघाडी संपुष्टात आली आहे. काँग्रेसच्या दोन्ही गटाचे उमेदवार आमने सामने उभे राहिले आहेत. या गोंधळाचा फायदा मात्र बहुजन विकास आघाडीला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आघाडीचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.कुटीन्हो यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेता स्वत:चे पॅनल उभे केले आहे. त्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुक लढवीत असून उमेदवार उभे केले आहेत. जनआंदोलन, शिवसेना आणि कांँग्रेसची युती झालेली नाही. मतदारांची दिशाभूल करीत असलेल्या कुटीन्हो यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून बंडखोरांवर कारवाई केली जाईल.- किरण शिंदे,वसई विरार जिल्हा मिडीया प्रमुख