शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

तरखडच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पडली फूट; काँग्रेस आघाडी संपुष्टात, बविआचे दोन सदस्य बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 02:09 IST

तरखड व आक्टण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली असून एका गटाने शिवसेना आणि जनआंदोलनाची कास धरली आहे. त्यामुळे अधिकृत काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत.

- शशी करपे ।तरखड व आक्टण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली असून एका गटाने शिवसेना आणि जनआंदोलनाची कास धरली आहे. त्यामुळे अधिकृत काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. या गोंधळात सत्ताधारी जनआंदोलन समिती आणि कांँग्रेस आघाडी संपुष्टात आली असून बहुजन विकास आघाडीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांना धक्का बसला आहे.तरखड व आॅक्टण ग्रामपंचायतीच्या ९ पैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने सात जागांसाठी येत्या २६ सप्टेंबरला निवडणुका होत आहेत. बहुजन विकास आघाडीने दोन जागा बिनविरोध जिंकून बाजी मारली असतानाच काँग्रेसची मात्र अडचण झाली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा सचिव बिपीन कुटीन्हो यांनी जनआंदोलन समिती व शिवसेनेशी हातमिळवणी करीत स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. या पॅनलने सरपंचासह सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. कुटीन्हो यांनी कांँग्रेसी असलेल्यांनाच निवडणुकीत उतरवले आहे. विशेष म्हणजे सध्या प्रचारात स्व. मायकल फुर्ट्याडो यांच्या फोटोचाही त्यांनी वापर केला आहे. तसेच काँग्रेस जनआंदोलन व शिवसेना पुरस्कृत उमेदवार असाच प्रचार त्यांनी सुरु ठेवला आहे.दुसरीकडे, कुटीन्हो यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्याने काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. काँग्रेसनेही आपल्या प्रचारात स्व. मायकल फुर्ट्याडो यांच्या फोटोचा वापर केला आहे. दोन्ही गट कांँग्रेसच्या नावावरच मते मागत असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते.दरम्यान, मावळत्या ग्रामपंचायतीत काँग्रेस आणि जनआंदोलन युतीची सत्ता आहे. मात्र, अधिकृत काँग्रेस स्वतंत्र निवडणुक लढवत आहे. कुटीन्हो गट काँग्रेस पुरस्कृत असल्याचा दावा करीत असला तरी काँग्रेसने अधिकृतपणे तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी जनआंदोलन आणि काँग्रेस आघाडी संपुष्टात आली आहे. काँग्रेसच्या दोन्ही गटाचे उमेदवार आमने सामने उभे राहिले आहेत. या गोंधळाचा फायदा मात्र बहुजन विकास आघाडीला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आघाडीचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.कुटीन्हो यांनी वरिष्ठांना विश्वासात न घेता स्वत:चे पॅनल उभे केले आहे. त्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध नाही. काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुक लढवीत असून उमेदवार उभे केले आहेत. जनआंदोलन, शिवसेना आणि कांँग्रेसची युती झालेली नाही. मतदारांची दिशाभूल करीत असलेल्या कुटीन्हो यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली असून बंडखोरांवर कारवाई केली जाईल.- किरण शिंदे,वसई विरार जिल्हा मिडीया प्रमुख