शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

परिवहनचा संप सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 2:10 AM

कोणताही तोडगा न निघाल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले

वसई : कोणताही तोडगा न निघाल्याने वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेच्या कामगारांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाच्या दुसºया दिवशी प्रशासन अथवा ठेकेदाराने दुर्लक्ष केले. तसेच दहा कामगारांना बडतर्फ केल्याने कामगार संतापले असून आंदोलन चिघळण्याची भिती आहे.किमान वेतन, वीमा संरक्षण यासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेतील सर्व कामगारांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले होते. संध्याकाळपर्यंत महापालिका प्रशासन आणि ठेकेदाराने कामगारांशी कोणतीच बोलणी केली नाहीत. त्यामुळे बेमुदत संप करण्याचा निर्धार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी केला. त्यामुळे सोमवारपासून परिवहन सेवेचे कामगार बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था ठप्प होऊन प्रवाशांचे हाल सुरु झाले आहेत.प्रशासन आणि ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळेच बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागत असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले. कामगारांना किमान वीस हजार रुपये वेतन मिळायला हवे. त्यांना विमा संरक्षण द्यायला हवे. यासह कामगारांच्या इतर मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असे पंडित यांनी सांगितले. पण, संपाच्या दुसºया दिवशीही प्रशासन अथवा ठेकेदाराने संपकरी कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे.दरम्यान, संपावर तोडगा काढण्याऐवजी ठेकेदाराने प्रवीण देवरुखकर, राजू मुलानी, महेश पवार, सुनील चव्हाण, वैभव शिगवण, नवनाथ आहिरे, दत्तूू राजपंखे, संकेत सावंत, प्रदीप चालके आणि आबासो कोळेकर यांना मंगळवारी नोटीस बजावून परिवहन सेवेतून बडतर्फ केले. त्यामुळे कामगारांध्ये संतापाची लाट पसरली आहे. कामगारांना कामावर घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असेही संघटनेच्यावतीने प्रशासनाला बजावण्यात आले आहे.>प्रवाशांचे हाल एसटीकडून दिलासापरिवहन सेवेच्या संपाचा फटका वसईकरांना बसू लागला आहे. दोन दिवसांपासून बसेस रस्त्यावर धावत नसल्याने प्रवाशांचे हाल होऊ लागले आहेत. एसटी महामंडळाने सध्या अ़र्नाळा, नालासोपारा आणि वसई डेपोतून काही मार्गावर बसेस सोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, परिवहन संपाचा फायदा उचलत रिक्शाचालकांनी काही भागात प्रवाशांची अडवणूक करीत लुटमार सुरु केल्याचे पहावयास मिळत आहे.