शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

गावठी कोलम तांदूळ नामशेष होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:08 AM

संडे अँकर । निसर्गाचा लहरीपणा : महागाई, कमी बाजार भावामुळे दुर्लक्ष

विक्रमगड : कमी कालावधीत आणि खाण्यास, गोडीस रुचकर असलेला गावठी कोलम झिनी तांदळाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घटत चालले आहे. पूर्वीप्रमाणे त्याची लागवड होत नसल्याने हा तांदूळ सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. कमी बाजार भाव, मजुरीचे वाढते दर, शेती साहित्याच्या वाढलेल्या किंमती, महागाई आणि निसर्गाच्या लहरीमुळे विक्रमगड तालुक्यातून घेतल्या जाणाऱ्या या रुचकर गावठी लहान दाण्यांच्या भात पिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे एक चांगल्या भात पिकाची जात धोक्यात आली आहे. सध्या हा तांदूळ बाजारात दुकानावर ५० ते ७० रु पये किलो दराने विकला जात आहे.

तरूणाई शेती उत्पादनाबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारित जातीच्या वाणाची लागवड केली जात असल्याने या कोलम तांदळाचे उत्पादन घटले आहे. या तांदळाच्या उत्पादनासाठी मेहनत घ्यावी लागते आणि खर्चही बराच आहे. या तांदळाचा दाणा लहान व गोडीस असल्याने निसर्गाने साथ दिली तर ठीक नाहीतर नुकसान सहन करावे लागते. परंतु या भात पिकाला पूर्वीचे गत वैभव प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे विक्रमगड येथील शेतकरी रणधीर पाटील यांनी सांगितले.विक्रमगड तालुक्यातील मृदा पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी कोलम या भात पिकाचे उत्पादन सर्व शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. एक सेंटीमीटर लांबीचा असणारा शुभ्र व आकर्षक दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा कोलम तांदूळ खाण्यासाठी अतिशय रु चकर म्हणून प्रसिद्ध आहे.

या तांदळाची सर्वत्र मोठी मागणी होती. परंतु कालांतराने शेतकरी आधुनिक युगातील नवीन व जादा उत्पादन देणाºया भात पिकाकडे वळल्याने जास्त मेहनत व खर्चिक असलेला कोलम तांदुळाचे उत्पादन घेण्याबाबत तो उदासीन झाला आहे.

पीक घेण्यास विलंब झाल्यास होते नुकसानकोलम जातीच्या भात लागवडीचा काळ मर्यादित आहे. त्याची लागवड तसेच लावणीही वेळेत होणे गरजेचे आहे. तर कधी नाही त्यामुळे हे पीक घेण्यास विलंब झाल्यास नुकसान सहन करावे लागते. आता निसर्गाचे काही खरे दिसत नसल्याने गेल्या चार पाच वर्षापासून गावठी कोलम तांदळाचे उत्पादन घट होताना दिसत आहे. तर काही शेतकरी महागाई व खर्चाचे प्रमाण पाहून आपली जमीन लागवड न करता लागवडीस दिल्या आहेत.

निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाकोलम भाताचे वाण उत्पादन घेण्यासाठी खर्चही तेवढाच करावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसतो. कारण गेल्या दोन चार वर्षात पाऊस वेळेत होत नाही व पाऊस वेळेत झाला तर तो उघडीप देण्याचे नाव घेत नाही. या सर्व गोष्टीमुळे हे चांगले पीक घेण्यासाठी केलेला खर्च वजा जाता उत्पन्न हाती लागत नसल्याने कोलम वाणाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी तितकेसे तयार नसतात.- बबन साबरे, ओंदे, शेतकरी