शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नारळाचे उत्पादन निम्म्याने घटणार; बागायतदारांना आर्थिक झळ, नारळ महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 22:57 IST

कीडरोग आणि अति पावसाचा फटका

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भात, चिकू आणि नारळ इ. उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान, नारळ उत्पादनात निम्म्याने घट होऊन आगामी काळात या फळांच्या किमती दुपटीने वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे धार्मिक सण - उत्सव आणि लग्नसराई काळात किमती वाढून ग्राहकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे.

पालघर जिल्ह्यात सुमारे साडेपाच हेक्टर क्षेत्र नारळ लागवडीचे असून सागरी भागात मोठ्या प्रमाणात बागायती आहेत. रेताड जमीन, उष्ण तसेच दमट वातावरणात वेस्ट कोस्टल टॉल या जातीचे उत्पादन घेतले जाते. या फळांचा मोठा आकार, पाण्याची चव आणि आतील मलाई यासाठी दक्षिणेकडील नारळापेक्षा त्याला वाढती मागणी आहे. मात्र यंदा पावसाचे प्रमाण आणि तीव्रता अधिक असल्याने फुल आणि फळगळतीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे पक्व नारळ मिळेपर्यंत निम्मेच उत्पादन हाती येईल अशी शक्यता बागायतदारांनी वर्तवली आहे.

सध्या या झाडांवर स्पायरेलिंग व्हाईटफ्लाय या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. डहाणू आणि बोर्डी परिसरात नारळ बागांमधील अनेक झाडांवर स्पायरेलिंग व्हाईट फ्लाय नावाची ही कीड आढळली आहे. ती झावळीच्या खालच्या बाजूला राहून अंडी घालते. त्याचा आकार हा गोल रिंगणासारखा असतो. हे कीटक शरीरातून चीकट द्रव सोडत असून त्यावर sooty mold नावाची काळी बुरशी वाढल्याने प्रकाश संश्लेषण क्रि या मंदावली जाऊन अन्न निर्मितीस अडथळा येतो. दरम्यान, पोषणाच्या कमतरतेमुळे फुलाफळांचे प्रमाण कमी होऊन उत्पादन घटणार आहे. शिवाय नारळा व्यतिरिक्त पेरू, सफेद जांबु, फुलझाडे आणि शोभेची झाडे क्रोटन आदीवर ती मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

दरम्यान, नारळाचे प्रमाण कमी होऊन किंमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, आगामी सण - उत्सव आणि लग्नसराईत नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ बसणार आहे. त्याचा आर्थिक फायदा घाऊक आणि किरकोळ व्यापारी घेतील. नेहमीप्रमाणे उत्पादक वंचित राहणार असल्याने शासकीय मदत मिळणार का? याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.या किडीची ओळख, व्यवस्थापन व नियंत्रण या विषयी माहिती तसेच शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी जिल्हा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे नजीकच्या काळात दोन प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांनी किटकनाशकाची फवारणी करण्याचा अवलंब केला आहे. - प्रा. उत्तम सहाणे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाडपालघर जिल्ह्यात नारळ क्षेत्र साडेपाच हेक्टर आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने फुलगळती झाल्याने उत्पादनात निम्म्याने घटणार आहे. त्याचा आर्थिक फटका नारळ बागायतदारांना बसेल. - यज्ञेश सावे, अध्यक्ष, ठाणे जिल्हा नारळ उत्पादक हितवर्धक संस्था

टॅग्स :Rainपाऊस