शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

नायगाव खाडीपुलाचे काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 12:22 AM

आता झोपड्यांचा अडथळा : पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे स्थानिकांची उत्कंठा आणि संताप

पारोळ : रडतखडत सुरू असलेल्या नायगाव खाडी पुलाचे काम पुन्हा ठप्प झाल्याने नायगाव परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा अडथळ्यांचा सामना करत सुरू असलेल्या पुलाच्या कामात काही ना काही अडथळ्यांचा खोडा येत असल्याने हा पुल कधी पूर्ण होणार,असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाची उदासीन भूमिका तसेच कंत्राटदाराकडून पुलाच्या कामात सुरू असलेला कासवछाप कारभार नागरिकांच्या संतापाला खतपाणी घालू लागला आहे. याआधी असलेल्या अडथळ्यांचा सामना करत असलेल्या नायगाव खाडीपुलाच्या उतारकामात आता येथील झोपड्यांचा नवा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे लॉकडाऊन काळात सुरू झालेल्या पुलाचे अर्धवट काम पुन्हा एकदा ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नायगाव खाडी पुुलाच्या पश्चिम बाजूस असलेल्या फेरीवाल्यांच्या झोपड्या हटवण्यावरून जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांचा वाद झाला आहे. या शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला पाहिजे आहे. याबाबत पीडब्ल्यूडी प्रशासनाने महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागास सदर शेतकºयांना मोबदला मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. नायगाव खाडी पुलाच्या बाबतीत मागील ५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे नागरिकांची उत्कंठा वाढली आहे. पूल कधी सुरू होईल यासाठी नागरिक संभ्रमात आहेत. मध्यंतरी कोरोना आपत्तीमुळे खाडीपुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र जून महिन्यात वसई-विरार महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या खाडीपुलाच्या कामालाही सुरुवात करण्याच्या हालचाली पीडब्ल्यूडी प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाऊन शिथिल असतानाही खाडीपुलाचे काम पुन्हा एकदा ठप्प करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.महापालिकेने दिला एक कोटीचा निधीवसई-विरार महापालिकेने या पुलाच्या कामासाठी १ कोटी १ लाख ७४ हजारांचा निधी दिला आहे. मात्र निधी देऊनही पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. पुलाचे काम रेंगाळल्यानंतर महापालिका प्रभाग समिती ‘जी’चे माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेले नाही तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कन्हैया भोईर यांनी दिला आहे. 

टॅग्स :vasai-acवसई