शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

चिंचणीत पारंपरिक दशावतारी नाटकांचा झाला बहारदार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:55 PM

तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

- अनिरु द्ध पाटीलबोर्डी : तालुक्यातील चिंचणी गावातील दशावतार उत्सवाला १५० वर्षांची परंपरा असून या वर्षा त्याला रसिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. या पर्यटन हंगामाचा हा उत्सव केंद्र बिंदू ठरावा याकरिता शासनाकडून विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.या गावातील सोनार आणि गुजराती कलावंतांनी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. मागील दीडशेहून अधिक वर्षांची वंशपरंपरागत बांधिलकीची धुरा आजची आधुनिक पिढी त्याच भावनेने जपतांना दिसते आहे. परंपरेने चालत आलेल्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील शुक्रवार ते रविवार या तीन दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो. या वर्षी १० ते १२ मे रोजी हा उत्सव साजरा करण्यात आला.त्यानुसार विधिवत कलश पूजनानंतर देवी-देवतांना आवाहन करून ग्रामस्थांना आमंत्रीत करण्यात आले. त्याला पंचक्रोशीतील नागरिकांचीही उपस्थिती लाभली. शनिवारी रात्री ९ वाजता प्रारंभ होऊन गणपती आणि डाबदुब्या यांचा नाच झाला. त्यानंतर शंखासूर आणि भगवान विष्णू यांचा मत्स्यअवतार यातील द्वंद्व रंगले. त्यामध्ये विष्णूंचा विजय झाला. त्यानंतर बकसुराचा वध करण्यासाठी भीम अवतरले. तर त्राटिका राक्षसीणीच्या वधाकरिता हनुमंताने विजय प्राप्त केल्यानंतर पहिल्या रात्रीची सांगता झाली. दुसºया रात्री वाली आणि सुग्रीव यांचे नृत्य रंगले, त्यानंतर गजासुर दैत्याचा वध भगवान शंकराने स्वत: प्रकट होऊन केला. दक्ष प्रजापतीचा वध भगवान शंकराच्या वीरभद्र अवताराने केला. शिवाय मणी आणि मल्ला ह्या दोन दैत्यांच्या वधावेळी उपस्थितांची उत्सुकता ताणली गेली होती. पुन्हा एकदा शंकरांनी खंडोबांचा अवतार धारण करून त्यांचा खातमा केला. हिरण्यकशपूचा वध भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन केला. तर पहाटेच्या सुमारास महिषासुर आणि भवानी यांच्यात तुल्यबळ युद्धाचा थरार रंगला.दरम्यान रविवारी पहाटे भवानी देवी महिषासुराचा वध करून समुद्रिमाता मंदिरात जाते. तिथे देवीची परंपरेनुसार पूजा पार पडल्यानंतर गावातील प्रत्येकाच्या घरी देवीची रूढी परंपरेनुसार ओटी भरून या दशाअवताराची सांगता झाली. या पारंपरिक खेळामुळे या गावाला पंचक्रोशीत विशेष ओळख प्राप्त झाली आहे. या गावच्या जाज्वल्य इतिहासाला अखंड परंपरा लाभावी म्हणून नवीन पिढी सक्रिय असल्याचे दिसून आले.गावातील पिंपळनाका येथे या उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात भाग घेणारे कलाकार वंशपरंपरागत त्याच ठरलेल्या कुटुंबातील आहेत. वडील आणि आजोबा-पणजोबांचा वारसा ही आधुनिकपिढी त्याच जबाबदारीतून सांभाळते आहे. त्यापैकी काही कलाकार नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईला स्थायिक झाले असले तरी दरवर्षी उत्सव काळात ते आपले योगदान देत आहेत.दरम्यान कोणता कलाकार कोणते पात्र वठवतोय त्याचे गुपीत आजही उलगडलेले नाही. हे येथील विशेष आहे. कारण तसे झाल्यास कुतूहल संपेल शिवाय सामाजिक जीवनात त्या पात्रावरून कलाकाराला कोणत्याही प्रकारचे बोल ऐकायला लागू नये हा उदात्तभाव स्थानिकांनी बोलून दाखवला.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार