शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

चिकू विमा घोषणेला निवडणुकीचा अडसर; बागायतदारांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 02:33 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा वगळता सहाही तालुके अंतर्भूत आहेत.

डहाणू/बोर्डी : १ जुलै ते ३० सप्टेंबर हा चिकू विमा संरक्षणाचा कालावधी असतो. मात्र निर्धारित केलेल्या हवामानाबाबतचे धोके लागू झाले अथवा नाही याविषयीच्या घोषणेला निवडणुकीमुळे विलंब होत आहे. दरम्यान, यंदा जाचक अटींचा समावेश केल्याने संरक्षण कवच मिळणार का? याबाबत बागायतदारांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना मृग बहराकारिता राज्यातील ज्या फळपिकांना लागू आहे, त्यात चिकूचा समावेश असून पालघरसह नऊ जिल्ह्यांचा अंतर्भाव आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा वगळता सहाही तालुके अंतर्भूत आहेत. या फळाचा विमा संरक्षण कालावधी १ जुलै ते ३० सप्टेंबर आहे. याकरिता जादा आर्द्रता आणि जास्त पाऊस अशा धोक्यांचा समावेश करण्यात येतो. यंदा मात्र सलग चार दिवस अथवा आठ दिवस २० मि.मी. पावसाची नोंद आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असल्यावरच दोन्हीपैकी एका विमा प्रकारातील लाभ होऊ शकतो.दरम्यान, सलग २० मि.मी. पाऊस न होताही आर्द्रता निर्माण होऊन फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी यांनी दिलेल्या क्षेत्र भेटीतून सिद्ध झाले आहे. या नव्या अटींचा समावेश करण्यापूर्वी चार वर्षांपासून उत्पादकांना विमा रकमेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचे नुकसान होते. त्यांच्या भल्याकरिता या जाचक नव्या अटींचा मुद्दामहून समावेश केल्याचा आरोप उत्पादकांनी केला आहे. त्यामुळे यंदा विम्याचे कवच मिळणार का? याबाबत त्यांना साशंकता आहे.३० सप्टेंबर हा विमा संरक्षणाचा कालावधी पूर्ण होऊन दहा दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप कृषी विभागाकडून हवामानाबाबतचे धोके लागू झाले अथवा नाही याबद्दलची घोषणा झालेली नाही. त्‘‘नव्या अटीचा समावेश केल्याने, विमा कवच मिळणार का? याविषयी उत्पादकांमध्ये साशंकता आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून पिकांचे नुकसान झाले आहे. विम्याबाबतची घोषणा त्वरित जाहीर करणे अपेक्षित असून आगामी काळात मशागत, खातं व किटकनाशक फवारणीकरिता पाऊल उचलता येईल.’’- यज्ञेश सावे, चिकू उत्पादकविधानसभा निवडणुकीच्या कामकाजाकरिता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनंतरच याविषयी सांगता येईल.’’- के.बी.तरकसे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, पालघर

टॅग्स :Vasai Virarवसई विरार