शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक प्रदूषण आता धरण क्षेत्र, शेतापर्यंत!, जीवघेण्या दुर्घटनेच्या दिशेने वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 01:28 IST

देशातील सर्वात जास्त प्रदूषण पसरविणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून तारापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. या प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध आराखडा आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने परिसरातील जनता विविध आजारांना बळी पडत आहे.

- हितेन नाईकपालघर : नदीनाल्यांपुरती मर्यादित राहिलेली रासायनिक प्रदूषणाची गंभीर बाब आता थेट धरण क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचली आहे. काही कारखानदारांच्या संगनमताने प्रदूषणमाफियांचे सुरू असलेले हे अतिरेकी कृत्य जिल्ह्यात जीवघेण्या दुर्घटनेच्या दिशेने चालविलेले एक मोठे पाऊल आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनाच या प्रदूषणाला जबाबदार धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.देशातील सर्वात जास्त प्रदूषण पसरविणारे औद्योगिक क्षेत्र म्हणून तारापूरने आपली ओळख निर्माण केली आहे. या प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजनबद्ध आराखडा आणि त्याची कडक अंमलबजावणी केली जात नसल्याने परिसरातील जनता विविध आजारांना बळी पडत आहे. याबाबत तक्रारींनंतर थातूरमातूर कारवाईव्यतिरिक्त जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नाही. हरित लवादात प्रदूषणाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर काही कंपन्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली होती, मात्र काही दिवस कंपनीचे उत्पादन बंद करून काही हजारांचा दंड भरून या कंपन्या पुन्हा प्रदूषण वाढवायला सज्ज होत असल्याचे दिसून आलेले आहे. या कंपनीमालकांच्या मागे काही राजकीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाºयांसोबत अनेक घटक छुपा पाठिंबा फक्त लेबर कॉन्ट्रॅक्ट, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट, प्रशासन-कंपनीमालकांमधील मध्यस्थी आदीच्या फायद्यासाठी करीत असल्याने काही कंपनीमालक कुठलीही भीती न बाळगता प्रदूषित पाणी, घनकचरा आता सार्वजनिक ठिकाणे, शेतात, धरण क्षेत्रात सोडायला मोकळे झाले आहेत. धरण क्षेत्रात ज्वलनशील घातक रसायन पाणीपुरवठा करणाºया धरणात मिसळल्यास मोठ्या जीवितहानीची घटना घडू शकते. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांमधून चोरट्या पद्धतीने रासायनिक घनकचरा व रसायनाची वाहतूक होत असल्याचे पुरावे तारापूरमधील रहिवासी हेमेंद्र पाटील यांनी पोलिसांसह प्रदूषण नियंत्रण मंडळाला अनेक वेळा दिले आहेत.तक्रारदारांनी दिलेल्या अनुषंगाने पाचपैकी चार कारखान्यांना क्लोजर नोटीस बजावल्याने ते बंद आहेत. घातक घनकचºयासंदर्भात मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.- मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, तारापूरजि.प. अध्यक्षा भारती कामडी यांच्या पत्राची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी त्यांच्या कार्यालयात संबंधित अधिकाºयांची आयोजित केलेली बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. प्रदूषणाला छुपा पाठिंबा देणाºया अधिकाºयाविरोधात आता पुरावे सादर करण्यात येणार आहेत.वेंगणी गावातील शेतात अनेक दिवसांपासून रसायन भरलेले ड्रम असल्याच्या तक्रारी २० जून रोजी स्थानिकांनी केल्या. मात्र, त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केले होते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpollutionप्रदूषण